शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हालाही भासू शकते रक्ताची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST

पुणे : कोरोना काळात गेल्या दीड वर्षात रक्तदानाचे प्रमाण घटल्याने सध्या रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. रक्त कोणत्याही कारखान्यात कृत्रिम ...

पुणे : कोरोना काळात गेल्या दीड वर्षात रक्तदानाचे प्रमाण घटल्याने सध्या रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. रक्त कोणत्याही कारखान्यात कृत्रिम पद्धतीने तयार होत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करणे हे आपले कर्तव्य आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येक नागरिकाने दर तीन महिन्यांनी म्हणजे वर्षातून चार वेळा रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची साथीचे थैमान सुरू झाले आणि लॉकडाऊन लावण्यात आले. लोक घराबाहेर पडू शकत नसल्याने रक्तदानावर मोठा परिणाम झाला. पहिली लाट ओसरल्यावर आणि दुसरी लाट सुरू होण्यापूर्वीच्या मधल्या काळात काही प्रमाणात रक्तदान झाले. मात्र, रक्तदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणे आवश्यक आहे. लसीकरण झाल्यावर किंवा कोरोना होऊन गेल्यावर ठराविक कालावधीने रक्तदान करता येते. त्यामुळे कोणत्याही गैरसमजावर विश्वास न ठेवता दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येऊ शकते.

चौकट

रक्ताचा आहे तुटवडा

“रेड क्रॉस सोसायटीच्या नियमावलीनुसार लसीकरणानंतर १४ दिवसांनी आणि कोरोना होऊन गेल्यावर २८ दिवसांनी रक्तदान करता येते. कोरोनामुळे रक्त संकलन मोहिमेवर मोठा परिणाम झाला आहे. दुर्मिळ रक्तगटांच्या रक्ताचा नेहमीच तुटवडा भासतो. रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. त्यामुळे आपणच रक्तदानासाठी पुढाकार घ्यायला हवा. एका व्यक्तीने रक्तदान केले की सहा जणांना त्याचा उपयोग होतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे.”

- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

चौकट

लस घेतल्यावरही करा रक्तदान

“लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. कोरोनातून बरे झाल्यावर २८ दिवसांनी रक्तदान करता येते. ४५ किलोपेक्षा जास्त वजन आणि १२.५ मिलिग्रामपेक्षा जास्त हिमोग्लोबिन असलेल्या महिला आणि ५० किलोपेक्षा जास्त वजन आणि १३ मिलिग्रामपेक्षा जास्त हिमोग्लोबिन असलेले पुरुष रक्तदान करू शकतात. १८ ते ६० या वयोगटतील नागरिक रक्तदानासाठी पात्र ठरतात.”

- डॉ. अनिकेत देशपांडे, जनरल फिजिशियन