शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

तुम्ही फक्त प्रवेश द्या, आम्ही शिकवतो

By admin | Updated: July 26, 2014 00:29 IST

पुण्यातील शिक्षणक्षेत्रभोवतीचा खासगी कोचिंग क्लासचा (शिकवणी) विळखा घट्ट होत असून, आता थेट महाविद्यालयांबरोबर छुपा करार करण्यार्पयत काही क्लासचालकांची मजल गेली आहे.

राजानंद मोरे ञ पुणो
पुण्यातील शिक्षणक्षेत्रभोवतीचा खासगी कोचिंग क्लासचा (शिकवणी) विळखा घट्ट होत असून, आता थेट महाविद्यालयांबरोबर छुपा करार करण्यार्पयत काही क्लासचालकांची मजल गेली आहे. ‘तुम्ही फक्त विद्याथ्र्याना प्रवेश द्या; शिकवण्याचे काम आम्ही करतो,’ अशा स्पष्ट शब्दांत काही शिकवण्या महाविद्यालयांना यासाठी तयार करीत आहेत. एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानीच ‘लोकमत’शी बोलताना या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. 
पुणो विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक वाघ यांना अशाच प्रकारच्या छुप्या कराराची ‘ऑफर’ देण्यात आली होती. एका शिकवणीमधून याबाबत विचारणा करण्यात आली होती; मात्र आम्ही त्यास पूर्णपणो नकार दिला. त्यानंतर शिकवणीचालक वरिष्ठांकडे गेले. तिथेही त्यांना ठामपणो नकार देण्यात आला, असा अनुभव वाघ यांनी ‘लोकमत’ला सांगितला.
अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्याथ्र्याना आपल्या शिकवणीमध्ये घेण्यासाठी थेट महाविद्यालयांशी ‘छुपा’ करार केला जात आहे. त्यासाठी महाविद्यालयांकडून विद्याथ्र्याना वर्गात हजेरीसाठी सवलतही मिळविली जात आहे. ‘करिअरच्या दृष्टीने बारावीचे ओङो थोडेफार हलके करण्यासाठी पुण्यात गल्लोगल्ली उभारण्यात आलेल्या खासगी शिकवण्यांचा आधार घेतला जातो. मुलगा अकरावीला गेला की विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या मुख्य विषयांसाठी हजारो रुपये भरून या शिकवण्या लावल्या जातात. त्यासाठी भरमसाट शुल्कही आकारले जाते. या शिकवण्या लावलेले अनेक विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गाला दांडी मारताना दिसतात. काही महाविद्यालयांतील शिक्षकही खासगी शिकवण्या घेतात. त्यामुळे वर्गात हजर राहण्यापासून विद्याथ्र्याना सवलतही मिळते. त्यासाठी विद्यार्थी अशा ठिकाणी प्रवेश घेतात.
 
च्विज्ञान शाखेतील 8क् ते 9क् टक्के विद्यार्थी खासगी शिकवण्यांकडे जात असतात. त्यामुळे वर्गातील दररोजची उपस्थिती खूप कमी असते. केवळ प्रात्यक्षिकांनाच काही विद्यार्थी येतात. यावर महाविद्यालयही काही करीत नाही.
च्प्रात्यक्षिकांच्या उपस्थितीवर तडजोड करीत त्यांचा हजेरीपट भरला जातो. नियमानुसार शैक्षणिक वर्षात दोन्ही सत्रंत प्रत्येकी 75 टक्के हजेरी असणो अनिवार्य आहे. मात्र, त्याकडे काही महाविद्यालयांकडूनही दुर्लक्ष केले जाते. 
च्याला खासगी शिकवण्यांचे वाढलेले प्रमाणच कारणीभूत असून, त्यामध्ये काही महाविद्यालयेही सक्रिय असल्याचे शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
 
शिकवण्यांचा आधार
शहरातील काही महाविद्यालये व खासगी शिकवण्यांमध्ये अशा प्रकारे अलिखित करार केला जातो. महाविद्यालयाचा निकाल वाढावा, यासाठी महाविद्यालये असे करीत असतील. मात्र, त्यामध्ये संबंधित महाविद्यालये आपल्याच शिक्षकांच्या गुणवत्तेवर अविश्वास दाखवत आहेत. यामध्ये काही शिकवणीवाले विद्याथ्र्याकडून भरमसाट पैसे घेत असल्याने त्यांचा दुहेरी फायदा होत आहे. काही महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोयी तसेच पुरेसे शिक्षक नसल्यानेही ती शिकवण्यांचा आधार घेतात.