शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

योग - निरामय पानासाठी लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:09 IST

हठयोगातील 'षटकर्म' क्रियांमधील एक क्रिया म्हणजे कपालभाती. प्राणायामात सगळ्यात फायदेशीर प्राणायाम म्हणजे कपालभाती असे मानले जाते. कपाल म्हणजे ...

हठयोगातील 'षटकर्म' क्रियांमधील एक क्रिया म्हणजे कपालभाती. प्राणायामात सगळ्यात फायदेशीर प्राणायाम म्हणजे कपालभाती असे मानले जाते. कपाल म्हणजे कपाळ आणि भाती म्हणजे ओजस्वी (तेजोमय). कपालभातीमुळे शरीर निरोगी तर राहतेच, पण आपल्या फुफ्फुसांना होणाऱ्या संसर्गाची शक्यताही यामुळे कमी होते. तसेच ॲलर्जीची तत्त्व/घटक शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. कपालभाती केल्याने वजनही कमी होते तसेच, आपल्या शारीरिक-मानसिक संतुलनासाठी देखील त्याचा फार उपयोग होतो.

कपालभाती कसे करावे?

- सर्वप्रथम सुखासन/ सिद्धासन/ वज्रासन/ पद्मासन यांपैकी कोणत्याही एका आसनात बसावे.

- पाठीचा कणा ताट असावा.

- हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यावर ठेवावेत.

- आता एक दीर्घश्वास घ्यावा.

- वेगाने उच्छवास सोडावा.

- उच्छवास बाहेर सोडता सोडता पोट आत घ्यावे. ( जितके शक्य होईल तितकेच पोट आत घ्यावे) नाभीला आतल्या बाजूस ओढून घ्यावे.

- श्वास घेताना निष्कारण ताकद लावू नये. नैसर्गिक पद्धतीने श्वास घ्यावा.

- सुरुवातीला २० ते ३० वेळा ही कृती करा. नंतर हळूहळू यात वाढ करावी.

लक्षात ठेवा कपालभाती करताना पाठीचा कणा ताठ असणे गरजेचे आहे. तसेच, कपालभाती करण्यापूर्वी 'जलनेती' केल्यास वायूमार्ग मोकळा होतो, ज्यामुळे कपालभाती जास्त लाभदायक ठरते. कपालभातीनंतर शवासन करावे. त्यामुळे आपले मन प्रसन्न व शांत होते.

प्राणायामाचे फायदे:

- पित्त, ॲसिडिटी व कफ यांसारख्या समस्या दूर होतात.

- नियमित केल्याने श्वसननलिकेत असणारे अडथळे दूर होतात.

- फुफ्फुसांच्या क्षमतेत वाढ होते.

- बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

- पोटाच्या स्नायूंना कपालभातीमुळे उत्तम व्यायाम मिळतो. मधुमेहींना याचा फायदा होतो.

- मन शांत ठेवण्यास मदत होते.

- नियमित केल्यास त्वचा तेजस्वी होते व रक्तप्रवाह सुधारतो.

कपालभाती कुणी करू नये?

- उच्च रक्तदाब व हृदयविकार असलेल्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा

- हार्निया, अल्सर असलेल्या व्यक्तींनी याचा सराव करू नये.

- पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास करू नये.

- मासिक पाळी सुरू असताना तसेच गरोदर महिलांनी कपालभाती करू नये.

-------

पूजा यादव, योग अभ्यासक