शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जीवनगौरव पुरस्काराची या वर्षातील हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:12 IST

डॉ. न. म. जोशी : साहित्य परिषद म्हणजे दुसरे घरच पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार म्हणजे जीवनातला ...

डॉ. न. म. जोशी : साहित्य परिषद म्हणजे दुसरे घरच

पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार म्हणजे जीवनातला खरा गौरव आहे, असे मी मानतो. यानिमित्ताने २०२१ या वर्षातील माझी जीवनगौरव पुरस्काराची हॅट्ट्रिक झाली,’ अशा भावना डॉ. न. म. जोशी यांनी ''लोकमत''शी बोलताना व्यक्त केली.

डॉ. जोशी यांना मसापचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १० जानेवारी रोजी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. मसाप जीवनगौरव पुरस्कार हा या वर्षीचा त्यांचा तिसरा जीवनगौरव पुरस्कार ठरला आहे.

डॉ. न. म. जोशी म्हणाले, ‘दहावी इयत्तेत भावे स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना मी अगदी दररोज न चुकता साहित्य परिषदेचे भोवती घिरट्या घालायचो. लहानपणापासून साहित्याची आवड असल्याने साहित्यिकांना भेटण्याची कमालीची ओढ होती. परंतु, आत जाण्यास भीती वाटायची. म. श्री. दीक्षित हे तेव्हा साहित्य परिषदेत रुजू झाले होते. त्यांनी मला अनेक दिवस तिथे फिरताना पाहिले. ''इथे सारखा काय करतोस रे'', असे त्यांनी दरडावून विचारले. त्यावेळी ''मला साहित्यिकांना ''बघायचे'' आहे, असे मी उत्तर दिले. त्या वेळी ते हसले आणि मला हाताला धरून परिषदेच्या पवित्र वास्तूत घेऊन गेले. त्या दिवशी गोपीनाथ तळवलकर, श्री. म. माटे, कवी यशवंत या दिग्गजांना एकत्र भेटण्याचा योग जुळून आला आणि अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. म. श्री. दीक्षित यांनी कवी यशवंत यांना सांगितले की, या मुलाला साहित्यिकांना ''बघायचे'' आहे. त्यावर कवी यशवंत हसले. त्यांनी त्यांच्या कपातला अर्धा चहा मला प्यायला दिला आणि म्हणाले की, आम्हाला बघायला यायला आम्ही वधू आहोत की सर्कशीतले प्राणी? यापुढे परिषदेत साहित्यिकांना बघायला नाही तर ऐकायला येत जा. त्यादिवशी परिषदेशी दृढ नाते जुळले ते कायमचेच!

‘१९७० साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी साहित्य परिषदेला भेट दिली होती. साहित्यिकांना भेटण्याच्या उत्सुकतेने ते आपणहून परिषदेत आले होते. त्यावेळी सुमारे तीस साहित्यिकांबरोबर त्यांनी दोन तास मनमोकळेपणाने चर्चा केली. माझ्या कारकिर्दीत ही घटना घडल्याने ती मनावर कायमची कोरली गेली आहे,’ अशी आठवणही त्यांनी सांगितली.