शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जीवनगौरव पुरस्काराची या वर्षातील हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:12 IST

डॉ. न. म. जोशी : साहित्य परिषद म्हणजे दुसरे घरच पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार म्हणजे जीवनातला ...

डॉ. न. म. जोशी : साहित्य परिषद म्हणजे दुसरे घरच

पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार म्हणजे जीवनातला खरा गौरव आहे, असे मी मानतो. यानिमित्ताने २०२१ या वर्षातील माझी जीवनगौरव पुरस्काराची हॅट्ट्रिक झाली,’ अशा भावना डॉ. न. म. जोशी यांनी ''लोकमत''शी बोलताना व्यक्त केली.

डॉ. जोशी यांना मसापचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १० जानेवारी रोजी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. मसाप जीवनगौरव पुरस्कार हा या वर्षीचा त्यांचा तिसरा जीवनगौरव पुरस्कार ठरला आहे.

डॉ. न. म. जोशी म्हणाले, ‘दहावी इयत्तेत भावे स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना मी अगदी दररोज न चुकता साहित्य परिषदेचे भोवती घिरट्या घालायचो. लहानपणापासून साहित्याची आवड असल्याने साहित्यिकांना भेटण्याची कमालीची ओढ होती. परंतु, आत जाण्यास भीती वाटायची. म. श्री. दीक्षित हे तेव्हा साहित्य परिषदेत रुजू झाले होते. त्यांनी मला अनेक दिवस तिथे फिरताना पाहिले. ''इथे सारखा काय करतोस रे'', असे त्यांनी दरडावून विचारले. त्यावेळी ''मला साहित्यिकांना ''बघायचे'' आहे, असे मी उत्तर दिले. त्या वेळी ते हसले आणि मला हाताला धरून परिषदेच्या पवित्र वास्तूत घेऊन गेले. त्या दिवशी गोपीनाथ तळवलकर, श्री. म. माटे, कवी यशवंत या दिग्गजांना एकत्र भेटण्याचा योग जुळून आला आणि अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. म. श्री. दीक्षित यांनी कवी यशवंत यांना सांगितले की, या मुलाला साहित्यिकांना ''बघायचे'' आहे. त्यावर कवी यशवंत हसले. त्यांनी त्यांच्या कपातला अर्धा चहा मला प्यायला दिला आणि म्हणाले की, आम्हाला बघायला यायला आम्ही वधू आहोत की सर्कशीतले प्राणी? यापुढे परिषदेत साहित्यिकांना बघायला नाही तर ऐकायला येत जा. त्यादिवशी परिषदेशी दृढ नाते जुळले ते कायमचेच!

‘१९७० साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी साहित्य परिषदेला भेट दिली होती. साहित्यिकांना भेटण्याच्या उत्सुकतेने ते आपणहून परिषदेत आले होते. त्यावेळी सुमारे तीस साहित्यिकांबरोबर त्यांनी दोन तास मनमोकळेपणाने चर्चा केली. माझ्या कारकिर्दीत ही घटना घडल्याने ती मनावर कायमची कोरली गेली आहे,’ अशी आठवणही त्यांनी सांगितली.