शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

यंदा रब्बी सरासरी ओलांडणार

By admin | Published: September 28, 2016 4:37 AM

खरीप हंगाम वाया गेल्यानंतर बारामती तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र, परतीच्या पावसाने रब्बी हंगाम सरासरी ओलंडणार, अशी शक्यता आहे. आतापर्यंत तालुक्यात

बारामती : खरीप हंगाम वाया गेल्यानंतर बारामती तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र, परतीच्या पावसाने रब्बी हंगाम सरासरी ओलंडणार, अशी शक्यता आहे. आतापर्यंत तालुक्यात ११२ टक्के व सरासरी ३७७.१० मिलिमीटर पाऊस झाल्याचे तालुका कृषी विभागाने सांगितले. बारामती तालुक्यात सरासरी ३५२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. सलग चार वर्षे दुष्काळामुळे बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. पाणीटंचाईची समस्या कायमच या परिसरात गंभीर होती. टंचाईच्या काळात तब्बल ३४ टँकरने या भागात पाणीपुरवठा सुरू होता. यंदाही पावसाळ्यातील पहिले तीन महिने कोरडे गेल्याने सलग पाचव्या वर्षीदेखील दुष्काळाचे अरिष्ट्य ओढवणार का, या भीतीने शेतकरी हवालदिल झाला होता. दुष्काळाच्या शक्यतेने बाजारपेठेतदेखील मंदीचे वातावरण होते. मात्र, परतीच्या पावसाने यंदा बारामती तालुक्यावर चांगलीच कृपा केली. मागील आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे ओढे-नाले खळाळू लागले आहेत. बारामती तालुक्यात जलयुक्त शिवारची ६९२ कामे झाली आहेत. खोलीकरण झालेल्या कामांमधून तालुक्यात ७, ४४९ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढेल.बारामती हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात रब्बी हंगामामध्ये ज्वारीच्या पेरणीखाली मोठे क्षेत्र असते. रब्बी हंगामात बारामती तालुक्यात सरासरी ३७ ते ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा पाऊसमान चांगला असल्याने याच लागवड क्षेत्रात २ ते ३ हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रब्बीमध्ये उशिरा गहू आणि हरभऱ्याच्यादेखील पोरण्या होतील असा अंदाज तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी) उंडवडीमध्ये सरासरीच्या ५० टक्केच पाऊस...कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार परिसरात सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसराला अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. असे असले, तरी खडकवासला कालव्यातून आवर्तन मिळाल्यास या परिसरातदेखील रब्बी हंगाम जोर धरेल. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती येणार...सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले होते. यंदा पावसाने सरासरी ओलंडल्यानंतर जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्याची आशा आहे. पाऊस लांबल्याने यंदादेखील चिंतेचे सावट होते. शेवटच्या टप्प्यातदेखील पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्याने आशा सोडली होती. मात्र, वरुणराजाने कृपा केली. जिरायती पट्ट्यात दुग्धव्यावसाय मोठ्याप्रमाणात केला जातो. टंचाईच्या काळात चाऱ्याचे भाव गगनाला भिडले होते. पाऊस झाल्याने आता चारा पिकांच्या लागवडीही मोठ्याप्रमाणात होतील. त्यामुळे पुन्हा एकदा दुग्धव्यवसायाला गती मिळेल.