शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मुलांना शिकावे लागणार पुस्तकांविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:09 IST

राहुल शिंदे पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. परंतु, ...

राहुल शिंदे

पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. परंतु, मे महिना संपत आला तरीही अद्याप बालभारतीचे पुस्तक छपाईचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जून महिन्यात पुस्तकाविनाच शिक्षण सुरू लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य शासनातर्फे सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी बालभारतीकडून तब्बल नऊ कोटी पुस्तकांची छपाई केली जाते, मात्र यंदा पुस्तक छपाईसाठी लागणा-या कागदाच्या खरेदीवर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना येत्या १५ जूनपर्यंत पुस्तकेच उपलब्ध होणार नाहीत. बालभारतीकडे मागील वर्षाचा पुस्तकांचा काही साठा शिल्लक आहे. तसेच उपलब्ध असलेला कागद वापरून काही पुस्तकांची छपाई करण्यात आली. परंतु, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पुरतील एवढ्या पुस्तकांची छपाई झालेली नाही.

बालभारतीतर्फे मार्च-एप्रिल पूर्वीच पुस्तक छपाईचे काम पूर्ण केले जाते. तसेच बालभारतीच्या वितरण विभागाकडून सर्व शाळांपर्यंत १५ जूनपूर्वीच पुस्तके पोहोच केले जातात. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके देण्यात आली. तसेच बालभारतीच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात सर्व पुस्तके उपलब्ध केली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात फारसे अडथळे आले नाहीत. परंतु, यंदा पुस्तकांची छपाई करून त्याचे वितरण करण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी जाणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पुस्तक छपाई संदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्यास विलंब केला. तसेच बालभारतीने किती पुस्तके छापून वितरित करावीत, या संदर्भातील निर्देशही अद्याप दिले नाहीत. मात्र, यंदा शासनाने विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके संकलित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. परिणामी या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना नव्या पुस्तकांऐवजी जुन्या पुस्तकांवरच समाधान मानावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

---------------------

छपाईच्या कागदावरून वाद?

बालभारतीच्या पुस्तक छपाईसाठी दर्जेदार कागद वापरला जातो. रिसायकल केलेला कागद वापरल्यास त्यातून शाई फुटण्याची शक्यता असते. तसेच पर्यावरणाची हानी न करता तयार केलेल्या कागदावर बालभारतीच्या पुस्तकांची छपाई केली तर कोणतीही अडचण येत नाही. हीच बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

-----