शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

यंदाही ६१ हजार जागा रिक्त राहणार

By admin | Updated: July 28, 2015 00:49 IST

अभियांत्रिकीची क्रेझ कमी झाल्याचे यंदाही स्पष्ट झाले आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया शनिवारी संपली असून, सुमारे ६१ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.

पुणे : अभियांत्रिकीची क्रेझ कमी झाल्याचे यंदाही स्पष्ट झाले आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया शनिवारी संपली असून, सुमारे ६१ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामध्ये पुणे विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील १६ हजार ८७५ जागा आहेत. काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दर वर्षी हजारो जागा रिक्त राहत आहेत. कोणताही निकष न पाळता राज्यात सरसकटपणे अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्याने ही स्थिती उद्भवली आहे. त्यातच अभियांत्रिकीला पूर्वी असलेली क्रेझही कमी झाली आहे. पदवी घेऊनही अपेक्षित संधी मिळत नसल्याने विद्यार्थी याकडे पाठ फिरवत आहेत. अनेक विद्यार्थी दहावीनंतरच अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. पदविका पूर्ण झाल्यानंतर त्यांना पदवीला थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. तसेच, आयटीआयकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. तसेच, अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई परीक्षा अनिवार्य केल्यानेही विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे जाणकार सांगतात.मागील वर्षीही राज्यातील रिक्त जागांचा आकडा ६१ हजारांच्या जवळपास होता, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)-शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी राज्यात अभियांत्रिकीची प्रवेशक्षमता एकूण १ लाख ५६ हजार ९९५ एवढी होती. -केंद्रीय प्रवेशप्रक्रियेंतर्गत शनिवारी शेवटची समुपदेशन फेरी पार पडली. या फेरीअखेर राज्यात तब्बल ६० हजार ८७४ जागा रिक्त राहिल्या आहेत. -समुपदेशन फेरीत ८ हजार ९७२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. अशा एकूण राज्यात ९६ हजार १२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. -पुणे विभागातील पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये १६ हजार ८७५, सोलापूर विद्यापीठांतर्गत ३ हजार ७७५, तर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठांतर्गत ७ हजार ३६८ जागा रिक्त राहिल्या आहेत.