शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

सन १९९२, शिवतीर्थ भरलेलं, अन् अचानक बाळासाहेब म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “सन १९९२. शिवतीर्थ (मुंबईतील शिवाजी पार्क) भरलेलं होतं. बाळासाहेबांच्या (ठाकरे) शेजारीच मी बसलो होतो. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “सन १९९२. शिवतीर्थ (मुंबईतील शिवाजी पार्क) भरलेलं होतं. बाळासाहेबांच्या (ठाकरे) शेजारीच मी बसलो होतो. याप्रसंगी व्यासपीठावर अनेक नेतेमंडळीसुद्धा होती. अचानक बाळासाहेब मला म्हणाले, ‘तू बोलणार आहेस ना.’ मी म्हटलं, ‘तू काहीतरी बोलू नकोस हं...नाही तर मी येथून निघून जाईन.’ त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘नाही नाही, तू आज बोललंच पाहिजे.’ हे सगळं आम्हा दोघांचं सुरू होतं.. आणि एकदम बाळासाहेब म्हणाले, ‘तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू,”... या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा रंजक किस्सा सांगितला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त मनसेने आयोजित केलेल्या शिवशाहीर करंडक स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला राज ठाकरे शनिवारी (दि. ४) उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी हा किस्सा सांगितला. मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, किशोर शिंदे, बाबू वागसकर, रणजित शिरोळे, अजय शिंदे, रुपाली पाटील आदी मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राज ठाकरे म्हणाले, “इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमतच होत नव्हती. मी कधी बोलू शकेन आणि भाषण करू शकेन. यावर देखील माझा कधीच विश्वास नव्हता. आजपर्यंत मी अनेक वक्ते ऐकले आहेत. आमच्या घरात तर माननीय बाळासाहेब होतेच. शिवाय श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी यांसारख्या अनेक वक्त्यांना मी अगदी जवळून पाहिले व ऐकलेसुद्धा आहेत. मात्र लहानपणापासून जरी अनेक दिग्गज वक्त्यांना मी पाहत-ऐकत आलो असलो तरी आयुष्यात मी कधी बोलेन, असं कधीच वाटलं नव्हतं.”

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हटल्यानंतर शिवराय ही गोष्ट आलीच. त्याच अनुषंगाने शिवराय यांच्यावर दोन विषय घेऊन ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतून वक्ते तयार होणे ही महत्वाची गोष्ट आहे. आता मी चार-पाच जणांची भाषणं ऐकली. त्या सर्वांचा मला हेवाच वाटतो. मी माझ्या शालेय जीवनात कधी वक्तृत्व स्पर्धेत कधी भागच नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं, असा प्रश्न पडायचा. तसेच जे बोलतात त्यांच्याबद्दल मला नेहमी कुतहूल वाटायचं, अशीही आठवण राज यांनी सांगितली.