शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

सन १९९२, शिवतीर्थ भरलेलं, अन् अचानक बाळासाहेब म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “सन १९९२. शिवतीर्थ (मुंबईतील शिवाजी पार्क) भरलेलं होतं. बाळासाहेबांच्या (ठाकरे) शेजारीच मी बसलो होतो. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “सन १९९२. शिवतीर्थ (मुंबईतील शिवाजी पार्क) भरलेलं होतं. बाळासाहेबांच्या (ठाकरे) शेजारीच मी बसलो होतो. याप्रसंगी व्यासपीठावर अनेक नेतेमंडळीसुद्धा होती. अचानक बाळासाहेब मला म्हणाले, ‘तू बोलणार आहेस ना.’ मी म्हटलं, ‘तू काहीतरी बोलू नकोस हं...नाही तर मी येथून निघून जाईन.’ त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘नाही नाही, तू आज बोललंच पाहिजे.’ हे सगळं आम्हा दोघांचं सुरू होतं.. आणि एकदम बाळासाहेब म्हणाले, ‘तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू,”... या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा रंजक किस्सा सांगितला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त मनसेने आयोजित केलेल्या शिवशाहीर करंडक स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला राज ठाकरे शनिवारी (दि. ४) उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी हा किस्सा सांगितला. मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, किशोर शिंदे, बाबू वागसकर, रणजित शिरोळे, अजय शिंदे, रुपाली पाटील आदी मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राज ठाकरे म्हणाले, “इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमतच होत नव्हती. मी कधी बोलू शकेन आणि भाषण करू शकेन. यावर देखील माझा कधीच विश्वास नव्हता. आजपर्यंत मी अनेक वक्ते ऐकले आहेत. आमच्या घरात तर माननीय बाळासाहेब होतेच. शिवाय श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी यांसारख्या अनेक वक्त्यांना मी अगदी जवळून पाहिले व ऐकलेसुद्धा आहेत. मात्र लहानपणापासून जरी अनेक दिग्गज वक्त्यांना मी पाहत-ऐकत आलो असलो तरी आयुष्यात मी कधी बोलेन, असं कधीच वाटलं नव्हतं.”

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हटल्यानंतर शिवराय ही गोष्ट आलीच. त्याच अनुषंगाने शिवराय यांच्यावर दोन विषय घेऊन ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतून वक्ते तयार होणे ही महत्वाची गोष्ट आहे. आता मी चार-पाच जणांची भाषणं ऐकली. त्या सर्वांचा मला हेवाच वाटतो. मी माझ्या शालेय जीवनात कधी वक्तृत्व स्पर्धेत कधी भागच नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं, असा प्रश्न पडायचा. तसेच जे बोलतात त्यांच्याबद्दल मला नेहमी कुतहूल वाटायचं, अशीही आठवण राज यांनी सांगितली.