शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

सन १९९२, शिवतीर्थ भरलेलं, अन् अचानक बाळासाहेब म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “सन १९९२. शिवतीर्थ (मुंबईतील शिवाजी पार्क) भरलेलं होतं. बाळासाहेबांच्या (ठाकरे) शेजारीच मी बसलो होतो. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “सन १९९२. शिवतीर्थ (मुंबईतील शिवाजी पार्क) भरलेलं होतं. बाळासाहेबांच्या (ठाकरे) शेजारीच मी बसलो होतो. याप्रसंगी व्यासपीठावर अनेक नेतेमंडळीसुद्धा होती. अचानक बाळासाहेब मला म्हणाले, ‘तू बोलणार आहेस ना.’ मी म्हटलं, ‘तू काहीतरी बोलू नकोस हं...नाही तर मी येथून निघून जाईन.’ त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘नाही नाही, तू आज बोललंच पाहिजे.’ हे सगळं आम्हा दोघांचं सुरू होतं.. आणि एकदम बाळासाहेब म्हणाले, ‘तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू,”... या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा रंजक किस्सा सांगितला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त मनसेने आयोजित केलेल्या शिवशाहीर करंडक स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला राज ठाकरे शनिवारी (दि. ४) उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी हा किस्सा सांगितला. मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, किशोर शिंदे, बाबू वागसकर, रणजित शिरोळे, अजय शिंदे, रुपाली पाटील आदी मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राज ठाकरे म्हणाले, “इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमतच होत नव्हती. मी कधी बोलू शकेन आणि भाषण करू शकेन. यावर देखील माझा कधीच विश्वास नव्हता. आजपर्यंत मी अनेक वक्ते ऐकले आहेत. आमच्या घरात तर माननीय बाळासाहेब होतेच. शिवाय श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी यांसारख्या अनेक वक्त्यांना मी अगदी जवळून पाहिले व ऐकलेसुद्धा आहेत. मात्र लहानपणापासून जरी अनेक दिग्गज वक्त्यांना मी पाहत-ऐकत आलो असलो तरी आयुष्यात मी कधी बोलेन, असं कधीच वाटलं नव्हतं.”

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हटल्यानंतर शिवराय ही गोष्ट आलीच. त्याच अनुषंगाने शिवराय यांच्यावर दोन विषय घेऊन ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतून वक्ते तयार होणे ही महत्वाची गोष्ट आहे. आता मी चार-पाच जणांची भाषणं ऐकली. त्या सर्वांचा मला हेवाच वाटतो. मी माझ्या शालेय जीवनात कधी वक्तृत्व स्पर्धेत कधी भागच नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं, असा प्रश्न पडायचा. तसेच जे बोलतात त्यांच्याबद्दल मला नेहमी कुतहूल वाटायचं, अशीही आठवण राज यांनी सांगितली.