शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

डॉक्टरांअभावी ‘वायसीएम’ आजारी

By admin | Updated: April 1, 2016 03:25 IST

पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील हजारो रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेतात. या रुग्णालयासाठी वर्षाला ५५ कोटींची तरतूद आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील हजारो रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेतात. या रुग्णालयासाठी वर्षाला ५५ कोटींची तरतूद आहे. तज्ज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक यंत्रांमुळे अधिक उत्तम उपचार मिळू शकतात. मात्र, मनुष्यबळाच्या अभावी रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागते. शहरातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी महापालिकेने १९८९ला संत तुकारामनगर येथे ‘वायसीएमएच’ रुग्णालयाची उभारणी केली. सध्या ७५० खाटा, तसेच अतिदक्षता विभागात २५ खाटा उपलब्ध आहेत. आठ शस्त्रक्रिया विभाग असून, दररोज शहरातील व शहराबाहेरील हजारो रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. या रुग्णालयात केवळ शहर व परिसरातीलच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतील रुग्णही उपचारासाठी दाखल होतात. या रुग्णालयात वर्षाला बाह्यरुग्ण विभागात सुमारे चार लाख रुग्ण, तर ४० हजार रुग्ण आंतररुग्ण विभागात उपचार घेतात. रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, डॉक्टर व कर्मचारी संख्या कमी असल्याने यंत्रणेवर अधिक ताण येत आहे. सध्या आस्थापनेवरील केवळ ३६ डॉक्टर कार्यरत आहेत. यासह १६२ परिचारिका आस्थापनेवरील असून, १२५ परिचारिका कंत्राटी पद्धतीवरील आहेत. डॉक्टर, परिचारिका, तपासणीस, सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक अशा प्रकारे महापालिका आस्थापना आणि ठेकेदारी पद्धतीचे मिळून सुमारे एक हजार कर्मचारी आहेत. मात्र, हे कर्मचारीही अपुरे पडत आहेत. रुग्ण दाखल होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, त्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे काही तासांतच एकाच डॉक्टरला ओपीडीमध्ये शेकडो रुग्ण तपासावे लागतात. अनेकदा अशी स्थिती निर्माण होते की, अवघ्या एक ते दोन मिनिटातच एका रुग्णाला तपासावे लागते. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दर वर्षी वायसीएमसाठी सुमारे ५५ कोटींची तरतूद असते. यामध्ये आस्थापना खर्चासह इतर बाबींसाठी खर्च केला जातो. मोठ्या वस्तूखरेदीसह औषधखरेदी वैद्यकीय विभागासाठीच्या एकूण बजेटमधून केली जाते. कोट्यवधींची तरतूद करण्यासह विविध प्रकारच्या तपासणींसाठी अत्याधुनिक यंत्र आहेत. तज्ज्ञ डॉक्टर आणि विविध प्रकारच्या यंत्रांमुळे अधिक उत्तम उपचार मिळू शकतात. ‘आओ जाओ घर तुम्हारा’येथे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती दिसून आली. गेल्यानंतर सुरक्षारक्षकाने चौकशी केली. परंतु, आत आल्यानंतर इतरत्र भटकत असताना रुग्णालयातील कोणीही हटकलेदेखील नाही. कोणीही तिऱ्हाइत व्यक्ती रुग्णालयात कितीही वेळ बसून राहू शकते, तसेच कोणत्याही वॉर्डात फिरू शकते. स्वच्छतागृहांच्या शेजारील रिकाम्या जागेत कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. वायसीएममध्ये रुग्णांचे नातेवाईक रिकाम्या जागेतच बाटल्या, तसेच वैद्यकीय साहित्याचा कचरा फेकत आहेत. काही स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकीन व लहान मुलांचे डायपर पडलेले दिसून आले. प्रशस्त भागातच स्वच्छता आहे, मात्र तळमजला व आतील काही भागांत घाणीचे साम्राज्य आहे. त्या भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. नळांना असलेली गळती आणि त्यामुळे साठणारे पाणी यांमुळे दुर्गंधी पसरली आहे. रिकाम्या भागात मद्याच्या बाटल्या आढळल्या.वार : गुरुवार, वेळ ९ वाजून ५५ मिनिटेवायसीएम रुग्णालयात प्रवेश द्वाराबाहेरच कडक सुरक्षा करण्यात आली होती. आत व बाहेर प्रवेशावरून अनेकदा वादविवाद रुग्णालयात होत होते. त्यामुळे सर्व रुग्णालयातील सर्व मार्गाचे सुरक्षारक्षकांमुळे वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले आहे. नेहमीप्रमाणेच रुग्णांची गर्दी जास्त होती. वायसीएम रूग्णालयात प्रवेशद्वारासमोरच ठेवलेली तातडीने सेवा देणारी सारथी हेल्पलाइन मशिन बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा होत आहे. त्याचा वापर रुग्णांचे नातेवाईक सध्या इतर कारणांसाठी करीत आहेत. सारथी मशिनची माहिती बहुधा कित्येक नागरिकांना नाही. कित्येक दिवसांपासून मशिन धूळ खात पडले आहे. मशीनचा तांत्रिक बिघाड झाल्याने हेल्पलाइनचा रिसिव्हर उचलल्यानंतर ‘नो इमेल सपोर्ट’ अशी एरर त्या मशिनवर दाखवत आहे. व्हॉल्व्हमधून पाणीगळती राज्यातील बऱ्याच भागात दुष्काळ पडला असताना वायसीएममध्ये मात्र ठिकठिकाणच्या स्वच्छतागृहांच्या व इतर नळांमधून पाणी गळती होत आहे. नळांची देखभाल-दुरूस्ती कित्येक दिवसांपासून झाली नसावी, असे निदर्शनास आले आहे. तसेच स्वच्छतागृहांमधील पाण्यांचे नळदेखील गळत आहेत. एकीकडे पाण्याची कमतरता असल्याची ओरड वारंवार वायसीएममध्ये केली जात आहे. तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.सुरक्षाव्यवस्था तैनातवायसीएमच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहने सुरळीतपणे बाहेर पडत आहेत. मुख्य गेट दुपारनंतर खुले केले जाते. तर इतर दरवाजेही योग्य वेळीच खुुले करण्याचे नियोजन केल्याने सुरक्षारक्षकही या नियोजनामुळे समाधानी आहेत. रुग्णालयाच्या काचेच्या खिडक्या व लोखंडी गजाची दुरवस्था झाली आहे. बहुतेक ठिकाणी तळमजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत खिडक्या तुटलेल्या आहेत. चोरीची प्रकरणे वायसीएममध्ये कित्येक वेळा घडली आहेत. त्यामुळे खिडक्यांची दुरूस्ती गरजेची आहे.केसपेपरसाठी रांगावायसीएममधील महत्त्वाच्या व तातडीक सेवेसाठी लांबच लांब रांगा असतात. टोकन व केस पेपर काढण्यासाठीही प्रचंड गर्दी होती. बऱ्याच वेळा रुग्ण वा नातेवाईक ताटकळत उभा राहिले होते. मनुष्यबळाअभावी महत्त्वाच्या विभागांच्या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.वायसीएम रुग्णालयात ३२ नंबर विभागासमोर निवेदनाची सोय आहे. वायसीएमतील मुख्य वॉर्डामध्ये काही समस्या उद्भवल्यास निवेदन केले जात आहे. त्यामुळे अडचण सोडविण्यास सोपे जात आहे. भंगार अडगळीत पडून रुग्णालयाच्या तळमजल्यावर स्ट्रेचर, खुर्च्याचे भंगार अडगळीत पडून राहिले आहे. कित्येक दिवस अशा भंगाराच्या निविदा निघत नाहीत. भंगार कुुजून जाते. शेवटी त्या भंगाराचा काही उपयोग होत नाही. अशा महापालिकेच्या बहुतेक मालमत्तांकडे दुर्लक्ष होत आहे. लोकमत टीम : मंगेश पांडे, सुवर्णा नवले, किरण माळी, अतुल मारवाडी