शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यवतला तीन दिवसांनी पाणी

By admin | Updated: May 5, 2017 02:06 IST

यवत गावठाण परिसरात वाढत्या उन्हाळ्याबरोबरच तीव्र पाणीटंचाईदेखील जाणवू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा

यवत : यवत गावठाण परिसरात वाढत्या उन्हाळ्याबरोबरच तीव्र पाणीटंचाईदेखील जाणवू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेमधून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.दौंड तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यवत गावात मागील काही वर्षांत उन्हाळ्यात सातत्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दिवसेंदिवस गावातील लोकसंख्या वाढत असताना पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायत व शासनाने शास्वत योजना केली नसल्याने नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.यंदा एप्रिल महिन्यात पाणीटंचाई जाणवू लागली होती. आता मे महिना सुरु झाल्यानंतर यात आणखी भर पडली आहे. तीन दिवसांतून एकदा नळाला पाणी येत असल्याने महिलावर्गाची पाण्यासाठी मोठी तारांबळ उडत आहे. गावातील बहुतांश खासगी बोअरवेलचे पाणी गेल्याने त्यांनाही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे.नागरीवस्तीमध्ये पाणी मिळत नसल्याने अनेक नागरिक खासगी टँकरमधील पाणी विकत घेत आहेत. यामुळे गावातील खासगी टँकर असणाऱ्यांचे धंदे जोमात आले असले, तरी विकतच्या पाण्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे.यवतसाठी जवळच असलेल्या ब्रिटिशकालीन माटोबा तलावाजवळ विहीर घेऊन पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. मात्र, सदर योजनेच्या विहिरीला आता पाणी कमी पडू लागल्याने केवळ चार तास मोटर चालते. अत्यंत कमी पाणी गावापर्यंत पोहोचत आहे. गावातील डॉ.अजितकुमार गांधी यांची बोअरवेल व यवत स्टेशन येथील बाहेती यांच्या विहिरीचे पाणी सार्वजनिक पाणी पुरवठा करण्यासाठी मिळाले आहे. मात्र, तरीही मिळणारे पाणी लोकसंख्येच्या मानाने अत्यंत कमी असल्याने गावात पाणीटंचाई जाणवत असल्याचे मत ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)पाणीटंचाईमुळे महिलावर्गात तीव्र नाराजी खासगी टँकरसाठी ३०० रुपये देऊन विकत घ्यावे लागते पाणी. नवीन मुठा कालव्याचे आवर्तन सुरु होऊन तेरा दिवस उलटले, तरी पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत नसल्याने नागरिकांमध्ये वाढती नाराजी दिसत आहे.पुणे शहराच्या जवळ असल्याने यवतमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने गृहप्रकल्प होत आहेत. सद्यपरिस्थितीत गावात दीड हजार सदनिका आहेत, तर आणखी नवीन कामे सुरु होत आहेत. गावठाण, स्टेशन रोड परिसरात नागरीकीकरण वाढतच आहे. तर झोपडपट्ट्यांमध्ये हजारो नागरिक राहात असून झोपड्यांची संख्या वाढतच आहे. यामुळे वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत असल्याने शासनाने भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मोठी पाणीपुरवठा योजना यवतमध्ये राबविणे गरजेचे आहे.