शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

यवतला तीन दिवसांनी पाणी

By admin | Updated: May 5, 2017 02:06 IST

यवत गावठाण परिसरात वाढत्या उन्हाळ्याबरोबरच तीव्र पाणीटंचाईदेखील जाणवू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा

यवत : यवत गावठाण परिसरात वाढत्या उन्हाळ्याबरोबरच तीव्र पाणीटंचाईदेखील जाणवू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेमधून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.दौंड तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यवत गावात मागील काही वर्षांत उन्हाळ्यात सातत्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दिवसेंदिवस गावातील लोकसंख्या वाढत असताना पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायत व शासनाने शास्वत योजना केली नसल्याने नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.यंदा एप्रिल महिन्यात पाणीटंचाई जाणवू लागली होती. आता मे महिना सुरु झाल्यानंतर यात आणखी भर पडली आहे. तीन दिवसांतून एकदा नळाला पाणी येत असल्याने महिलावर्गाची पाण्यासाठी मोठी तारांबळ उडत आहे. गावातील बहुतांश खासगी बोअरवेलचे पाणी गेल्याने त्यांनाही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे.नागरीवस्तीमध्ये पाणी मिळत नसल्याने अनेक नागरिक खासगी टँकरमधील पाणी विकत घेत आहेत. यामुळे गावातील खासगी टँकर असणाऱ्यांचे धंदे जोमात आले असले, तरी विकतच्या पाण्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे.यवतसाठी जवळच असलेल्या ब्रिटिशकालीन माटोबा तलावाजवळ विहीर घेऊन पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. मात्र, सदर योजनेच्या विहिरीला आता पाणी कमी पडू लागल्याने केवळ चार तास मोटर चालते. अत्यंत कमी पाणी गावापर्यंत पोहोचत आहे. गावातील डॉ.अजितकुमार गांधी यांची बोअरवेल व यवत स्टेशन येथील बाहेती यांच्या विहिरीचे पाणी सार्वजनिक पाणी पुरवठा करण्यासाठी मिळाले आहे. मात्र, तरीही मिळणारे पाणी लोकसंख्येच्या मानाने अत्यंत कमी असल्याने गावात पाणीटंचाई जाणवत असल्याचे मत ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)पाणीटंचाईमुळे महिलावर्गात तीव्र नाराजी खासगी टँकरसाठी ३०० रुपये देऊन विकत घ्यावे लागते पाणी. नवीन मुठा कालव्याचे आवर्तन सुरु होऊन तेरा दिवस उलटले, तरी पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत नसल्याने नागरिकांमध्ये वाढती नाराजी दिसत आहे.पुणे शहराच्या जवळ असल्याने यवतमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने गृहप्रकल्प होत आहेत. सद्यपरिस्थितीत गावात दीड हजार सदनिका आहेत, तर आणखी नवीन कामे सुरु होत आहेत. गावठाण, स्टेशन रोड परिसरात नागरीकीकरण वाढतच आहे. तर झोपडपट्ट्यांमध्ये हजारो नागरिक राहात असून झोपड्यांची संख्या वाढतच आहे. यामुळे वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत असल्याने शासनाने भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मोठी पाणीपुरवठा योजना यवतमध्ये राबविणे गरजेचे आहे.