शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

लेखणीचा प्रकाश मंदावला : कुलकर्णी

By admin | Updated: March 27, 2017 03:22 IST

ज्येष्ठ पत्रकार, संपादक गोविंद तळवलकर यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेतील तेजस्वी तारा निखळला आहे

पुणे : ज्येष्ठ पत्रकार, संपादक गोविंद तळवलकर यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेतील तेजस्वी तारा निखळला आहे. प्रभावशाली संपादकांच्या दुसऱ्या फळीमध्ये तळवलकर अग्रस्थानी होते. लेखणी गाजवणारा हा महान संपादक वाचनवीर होता. त्यांच्या जाण्याने लेखणीचा प्रकाश मंदावल्याची भावना ज्येष्ठ संपादक एस. के. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने तळवलकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साखरीकर, जयराम देसाई, पराग करंदीकर, डॉ. अरुण खोरे, संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे, सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, ‘तळवलकरांचा यशवंतराव चव्हाणांशी विशेष स्नेह होता. राजीव गांधी यांनी चर्चेसाठी बोलावलेल्या ज्येष्ठ पत्रकारांमध्ये तळवलकरांचाही समावेश होता. संपादकाला संपादकाने कसे वागवले पाहिजे, याचे ते स्वत: एक उत्तम उदाहरण होते.’तर, पवार यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण रिव्हीएराला राहत असताना शरद पवार व मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते आतमध्ये एका पत्रकाराशी बोलत असल्याचे समजले. बऱ्याच वेळाने ते पत्रकाराला सोडायला बाहेर आले. तेव्हा त्यांनी शरद पवारांची ओळख तळवलकरांशी करून दिली. शरद पवारांनी त्यांना जाणीवपूर्वक तळवलकरांच्या संपर्कात राहण्यास सांगितले होते. तळवलकर अत्यंत स्पष्टवक्ते होते. पत्रकारिता, व्यासंग आणि लिखाण हे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले. उत्तम समीक्षा, रसग्रहण करीत त्यांनी जगभरातील विचारवंत आणि लेखक मराठी वाचकांपर्यंत पोचवले.’या वेळी करंदीकर, डॉ. खोरे, साखरीकर यांनीही त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. बढे यांनी प्रास्ताविक केले तर देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी तळवलकरांना श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)