शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बहुसंख्य मराठी कलावंतांची हाताची घडी, तोंडावर बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘शेतकरी आंदोलना’चे पडसाद देशभरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. सोशल मीडियावर तर प्रतिक्रिया ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘शेतकरी आंदोलना’चे पडसाद देशभरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. सोशल मीडियावर तर प्रतिक्रिया आणि ट्रोलिंगचा सडाच पडतो आहे. आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना हिने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटनंतर देशात उसळलेली प्रतिक्रियांची लाट तर कमी होण्याचं नावच घेत नाहीये. पण या सगळ्यात ‘फार कमी’ मराठी सेलिब्रिटी स्पष्टपणे मत मांडताना दिसत आहेत. त्यांपैकीच काही जणांशी ‘लोकमत’ने बातचीत केली.

सरकारच्या दांभिकतेचे दर्शन

सर्वात आधी या प्रकारात झालेल्या कुठल्याही हिंसेचे समर्थन मी करीत नाही. वारंवार चळवळ अथवा आंदोलन हिंसक वळण घेत असेल त्या आंदोलनाने स्वपरीक्षण करायला हवे. पण त्याच बरोबरीने आपल्याच देशातील जनतेवर जेव्हा येथील सरकारी यंत्रणा, पोलीस हिंसक कारवाया करते तेव्हा ते अधोगतीकडे जाणाऱ्या लोकशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. एका बाजूला आपण कसे सेवक आहोत, असे दाखवणे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसमावेशकता तसेच लवचिकता नसणे असा दांभिकपणा सरकारमध्ये दिसत आहे. हे भांडण राजकीय आहे. त्यामुळे यात दोन किंवा अधिक बाजू असणारच पण विरोध करणाऱ्या कुणालाही दरवेळी देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत भेदरलेल्या आणि सत्ताभिलाषी व्यवस्थेचे लक्षण आहे. होय, कुणाचेही हेतू राजकीय असतातच आणि असायला हरकतही नाही. पण ते हेतू लोकहितासाठी आहेत की केवळ विशिष्ट गटासाठी किंवा ‘आहे रे’ स्तरातील लोकांच्या फायद्याचे आहेत हा मूळ प्रश्न आहे.

- सुव्रत जोशी, अभिनेता

------

अभ्यास केल्याशिवाय बोलू नये

महत्त्वाच्या विषयावर अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. लोकांना घाणेरडी सवय लागलेली आहेत? की ज्या विषयात आपल्याला गती नाही, अभ्यास नाही अशा विषयावर बेधडक लोक मतं देतात. शेतकरी आंदोलनावर बोलायचं म्हणजे हे माहिती पाहिजे की ते शेतकरी नेमके कुठले आहेत? त्यात शेतकरी आहेत की कंत्राटदार आहेत? हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत? की उत्स्फूर्तपणे आहे? अतीव माहितीमुळे आतून येणाऱ्या गोष्टी कमी आहेत, बाहेरूनच होणाऱ्या गोष्टी जास्त आहेत. त्यामुळे मी यावर काय बोलणार? आणि मग असं काहीतरी बोलायचं, पण तेंडुलकर, कोहली जे बोलताहेत तर लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा, याला काही अर्थ आहेत का? त्यामुळे ज्याने त्याने उठून आपलं मत देऊ नये, मत देण्याआधी त्या गोष्टीचा अभ्यास करावा.

- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते

------

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

मी स्वतः एक शेतकरी आहे. माझं कुटुंब शेतकरी कुटुंब आहे. आज गेल्या कित्येक महिन्यांपासून आपलं घरदार, शेती सोडून जर शेतकरी रस्त्यावर बसले आहेत तर खरंच त्यांना काही अडचणी असतील म्हणून बसले आहेत. असंच कुणी इतके हाल नाही? सोसत. विसंवादाचाही मुद्दा आहेच. जो दोन्ही बाजूने होतोय. जे शेतकरी हट्टाने बसले आहेत तो असंतोष आहे हे सरकारच्या लक्षात येत नाहीये का? हे असं कोणतं सरकार आहे जे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ शकत नाही? सरकार जोपर्यंत केवळ राज्यकर्त्यांच्या भूमिकेत राहतील तोपर्यंत ही दरी कायम राहील. त्यामुळे या शेतकरी आंदोलनाला, माझ्या शेतकरी बापाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे.

- हेमंत ढोमे, अभिनेता

--------

मला पुरेशी माहिती नाही

मला कृषी कायदा नेमका काय आहे, याविषयी माहिती नाही. तो जर मला माहीत नसेल तर त्यावर बोलणं चुकीचं आहे. यात दोन प्रवाह आहेत, काही सांगताहेत की कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, काही सांगताहेत की जे मोदी विरोधात आहे त्यांनी हे आंदोलन घडवून आणलंय. ज्यामुळे जे आपल्याला धड माहिती नाही त्याविषयी बोलू नये या मताचा मी आहे.

- शरद पोंक्षे, अभिनेता

--------------

खुल्या दिलानं चर्चा करावी

मला मनापासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावासा वाटतो. शेती कायदे, त्याच्या योग्य-अयोग्य बाजू यावर मत व्यक्त करावं एवढं माझं ज्ञान नाहीये. याची मला पूर्ण जाणीव आहे. पण आपल्या देशातला एवढा मोठा घटक, एवढ्या मोठ्या संख्येने इतके दिवस तिथे ठाण मांडून बसलेला आहे, तर त्यांना सरकार सामोरं जात नाहीये. दुरून केवळ चर्चेच्या फायरी झाडत राहणं आणि ते देशविघातक माणसं असल्यासारखी त्यांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर खिळे लावून रस्ता बंद करणं म्हणजे हे मला खूप दुर्दैवी वाटतं. याउलट खुल्या दिलानं चर्चेचं वातावरण देशात तयार व्हायला हवं.

- सुनील सुकथनकर, दिग्दर्शक