शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

बहुसंख्य मराठी कलावंतांची हाताची घडी, तोंडावर बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘शेतकरी आंदोलना’चे पडसाद देशभरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. सोशल मीडियावर तर प्रतिक्रिया ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘शेतकरी आंदोलना’चे पडसाद देशभरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. सोशल मीडियावर तर प्रतिक्रिया आणि ट्रोलिंगचा सडाच पडतो आहे. आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना हिने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटनंतर देशात उसळलेली प्रतिक्रियांची लाट तर कमी होण्याचं नावच घेत नाहीये. पण या सगळ्यात ‘फार कमी’ मराठी सेलिब्रिटी स्पष्टपणे मत मांडताना दिसत आहेत. त्यांपैकीच काही जणांशी ‘लोकमत’ने बातचीत केली.

सरकारच्या दांभिकतेचे दर्शन

सर्वात आधी या प्रकारात झालेल्या कुठल्याही हिंसेचे समर्थन मी करीत नाही. वारंवार चळवळ अथवा आंदोलन हिंसक वळण घेत असेल त्या आंदोलनाने स्वपरीक्षण करायला हवे. पण त्याच बरोबरीने आपल्याच देशातील जनतेवर जेव्हा येथील सरकारी यंत्रणा, पोलीस हिंसक कारवाया करते तेव्हा ते अधोगतीकडे जाणाऱ्या लोकशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. एका बाजूला आपण कसे सेवक आहोत, असे दाखवणे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसमावेशकता तसेच लवचिकता नसणे असा दांभिकपणा सरकारमध्ये दिसत आहे. हे भांडण राजकीय आहे. त्यामुळे यात दोन किंवा अधिक बाजू असणारच पण विरोध करणाऱ्या कुणालाही दरवेळी देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत भेदरलेल्या आणि सत्ताभिलाषी व्यवस्थेचे लक्षण आहे. होय, कुणाचेही हेतू राजकीय असतातच आणि असायला हरकतही नाही. पण ते हेतू लोकहितासाठी आहेत की केवळ विशिष्ट गटासाठी किंवा ‘आहे रे’ स्तरातील लोकांच्या फायद्याचे आहेत हा मूळ प्रश्न आहे.

- सुव्रत जोशी, अभिनेता

------

अभ्यास केल्याशिवाय बोलू नये

महत्त्वाच्या विषयावर अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. लोकांना घाणेरडी सवय लागलेली आहेत? की ज्या विषयात आपल्याला गती नाही, अभ्यास नाही अशा विषयावर बेधडक लोक मतं देतात. शेतकरी आंदोलनावर बोलायचं म्हणजे हे माहिती पाहिजे की ते शेतकरी नेमके कुठले आहेत? त्यात शेतकरी आहेत की कंत्राटदार आहेत? हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत? की उत्स्फूर्तपणे आहे? अतीव माहितीमुळे आतून येणाऱ्या गोष्टी कमी आहेत, बाहेरूनच होणाऱ्या गोष्टी जास्त आहेत. त्यामुळे मी यावर काय बोलणार? आणि मग असं काहीतरी बोलायचं, पण तेंडुलकर, कोहली जे बोलताहेत तर लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा, याला काही अर्थ आहेत का? त्यामुळे ज्याने त्याने उठून आपलं मत देऊ नये, मत देण्याआधी त्या गोष्टीचा अभ्यास करावा.

- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते

------

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

मी स्वतः एक शेतकरी आहे. माझं कुटुंब शेतकरी कुटुंब आहे. आज गेल्या कित्येक महिन्यांपासून आपलं घरदार, शेती सोडून जर शेतकरी रस्त्यावर बसले आहेत तर खरंच त्यांना काही अडचणी असतील म्हणून बसले आहेत. असंच कुणी इतके हाल नाही? सोसत. विसंवादाचाही मुद्दा आहेच. जो दोन्ही बाजूने होतोय. जे शेतकरी हट्टाने बसले आहेत तो असंतोष आहे हे सरकारच्या लक्षात येत नाहीये का? हे असं कोणतं सरकार आहे जे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ शकत नाही? सरकार जोपर्यंत केवळ राज्यकर्त्यांच्या भूमिकेत राहतील तोपर्यंत ही दरी कायम राहील. त्यामुळे या शेतकरी आंदोलनाला, माझ्या शेतकरी बापाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे.

- हेमंत ढोमे, अभिनेता

--------

मला पुरेशी माहिती नाही

मला कृषी कायदा नेमका काय आहे, याविषयी माहिती नाही. तो जर मला माहीत नसेल तर त्यावर बोलणं चुकीचं आहे. यात दोन प्रवाह आहेत, काही सांगताहेत की कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, काही सांगताहेत की जे मोदी विरोधात आहे त्यांनी हे आंदोलन घडवून आणलंय. ज्यामुळे जे आपल्याला धड माहिती नाही त्याविषयी बोलू नये या मताचा मी आहे.

- शरद पोंक्षे, अभिनेता

--------------

खुल्या दिलानं चर्चा करावी

मला मनापासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावासा वाटतो. शेती कायदे, त्याच्या योग्य-अयोग्य बाजू यावर मत व्यक्त करावं एवढं माझं ज्ञान नाहीये. याची मला पूर्ण जाणीव आहे. पण आपल्या देशातला एवढा मोठा घटक, एवढ्या मोठ्या संख्येने इतके दिवस तिथे ठाण मांडून बसलेला आहे, तर त्यांना सरकार सामोरं जात नाहीये. दुरून केवळ चर्चेच्या फायरी झाडत राहणं आणि ते देशविघातक माणसं असल्यासारखी त्यांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर खिळे लावून रस्ता बंद करणं म्हणजे हे मला खूप दुर्दैवी वाटतं. याउलट खुल्या दिलानं चर्चेचं वातावरण देशात तयार व्हायला हवं.

- सुनील सुकथनकर, दिग्दर्शक