शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतीव्यवसायाला सर्वाधिक फटका

By admin | Updated: January 2, 2017 02:22 IST

नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही ग्रामीण भागातील स्थिती सुधारली नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाला याचा मोठ्या प्रमणात फटका

बारामती : नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही ग्रामीण भागातील स्थिती सुधारली नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाला याचा मोठ्या प्रमणात फटका बसला. शेतमालाचे दर कमालीचे घसरले. तर जिल्हा बँकांवरील निर्बंधांमुळे शेती व्यवसायाच्या आर्थिक नाड्याच आवळल्या गेल्या आहेत. पंतप्रधन नरेंद्र मोदींनी ५० दिवसांनंतर नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत बदल होईल असा विश्वास दिला होता. परंतु नोटाबंदी आणि कॅशलेसच्या धामधुमीत ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. ५० दिवसांनंतरही परिस्थितीत बदल न घडल्याने आता ग्रामीण भागामध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय, आठवडी बाजार, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतमजूर आदींना नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. चलनटंचाईमुळे शेतमाल घेण्यासाठी व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र आजही ग्रामीण परिसरात कायम आहे. तर जे व्यापारी शेतमाल उचलण्यास तयार आहेत, ते दर पाडून शेतमाल खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी नुकसान सोसून शेतमालाची विक्री करीत आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी, शेळगाव, गोतोंडी आदी भागांमध्ये सध्या डाळिंबाच्या बागा सुरू आहेत. नोटाबंदीपूर्वी डाळिंबाच्या १ नंबरच्या गुणवत्तापूर्ण फळांना ९० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर मिळत होता. परंतु तोच दर सध्या ५० ते ६० रुपयांपर्यंत आला आहे. प्रतिकिलो ३० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. यातून उत्पादन खर्च निघत असला तरी पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हातात भांडवल राहात नसल्याने पुढील हंगामात फळबागा कशा जगवायच्या हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. तीच परिस्थिती दुग्धव्यावसायिकांची झाली आहे. दुधाचे पगार मिळत आहे. मात्र पूर्वी रोखीने मिळणारे पगार आता थेट खात्यात जमा होऊ लागले आहेत. मात्र बहुतेक दुग्धव्यावसायिकांची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये आहेत.जिल्हा बँकांवरील निर्बंधांमुळे खात्यावरील पैसे काढण्याची मर्यादा आहेत. तसेच दूध संस्थांनीही राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच खाती काढण्याचे आवाहन दुग्धव्यावसायिकांना केले आहे. त्यात दुधाचे दरही २२ रुपयांवरून पुढे सरकले नसल्याने जनावरे संभाळणे जिकिरीचे झाले आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च, चलनटंचाई, कॅशलेस यंत्रणेबाबत असलेली संभ्रमावस्था यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता जाणकरांमधून व्यक्त होत आहे.बँकेतील गर्दी काही केल्या कमी होईना...वाडा : परिसरातील नागरिकांकडून ५०० व १००० हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या देशात शेतकरीवर्ग ७० टक्केच्या जवळपास असून, बाकी ३० टक्के टक्के नागरिकांची आर्थिक बाजू चांगली आहे. काळा पैसा शोधण्यासाठी घेतलेला निर्णय सामान्य जनतेला वेठीस धरण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. नोटाबंदी झाल्यापासून वाडा येथील एटीएम बंद होते. ते आता शनिवारपासून सुरू कण्यात आले आहेत. या परिसरात एकच एटीएम असल्याने बँकेत होणाऱ्या गर्दीला वैतागून एटीएमकडे धाव घ्यावी असे नागरिकांना वाटत होते. पण ते बंद असल्याने नागरिकांना बँकेत ताटकळत थांबावे लागत आहे. बँक आॅफ महाराष्ट्र शाखेतून जास्त रक्कम काढता येते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दोन हजार रुपये मिळत आहेत. कधी बँकेकडे कॅश आलीच नाही तर नागरिकांना पैसे मिळत नाहीत. काही नागरिक पैसे आले नाही तर आमचे पासबुक ठेवून घ्या, दुसऱ्या दिवशी तरी पैसे द्या असे म्हणत आहेत. बँक कर्मचारी म्हणतात, की कॅशच आली नाही तर तुमचं पासबुक ठेवून काय करू. ५० दिवसांपासून कामधंदा सोडून केवळ पैशासाठी रांगा लावत आहे. कधी सुटणार हा काळ्या पैशाचा खेळ? असा सवाल नागरिक करत आहेत.