शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चिरंजीवित्वाचे गमक गुणांच्या उपासनेत : चैतन्यमहाराज देगलूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:38 IST

पुणे : माणसाची कीर्ती मर्त्य असली तरी जीवनभर मनुष्य ज्या गुणांची उपासना करतो. त्या गुणांमुळेच त्याची कीर्ती चिरंजीव नांदत ...

पुणे : माणसाची कीर्ती मर्त्य असली तरी जीवनभर मनुष्य ज्या गुणांची उपासना करतो. त्या गुणांमुळेच त्याची कीर्ती चिरंजीव नांदत राहते. भारतीय परंपरेमध्ये विख्यात असलेल्या सप्तचिरंजीवांची संकल्पना हेच वास्तव अधोरेखित करते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी केले.

श्री गंधर्ववेद प्रकाशन या संस्थेतर्फे ’सप्तचिरंजीव’ या ग्रंथमालेतील सात चिरंजीव व्यक्तिमत्वांच्या चरित्रांचे प्रकाशन देगलूरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैदिक संशोधन मंडळाचे संचालक प्रणव गोखले तर प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते.

व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन धारणेसाठी उपकारक ठरणा-या गुणांचा परमोत्कर्ष आपल्या जीवनामध्ये साधण्याची प्रेरणा या चरित्रग्रंथांच्या माध्यमातून मिळेल असे देगलूरकर यांनी सांगितले. प्रणव गोखले म्हणाले की, प्राचीन काळी होऊ न गेलेल्या घटनांना शब्दालंकृत करून पूर्वकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडणारा सेतू निर्माण करणे हे पुराणांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच पुराण साहित्यात शब्दबद्ध झालेल्या गतेतिहासाचे दस्तऐवजीकरण विलक्षण दक्षतेने आणि तारतम्याने केले जाणे आवश्यक ठरते. त्यासाठी मुळात आपल्या पूर्वकालीन संस्कृतीमध्ये नेमके काय काय साकारले याची साक्षेपी शोध घेण्याची एक दिशा या चरित्रकहाणी ग्रंथसंचाद्वारे मिळाली असून, हे सातही ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून सतत मार्गदर्शक ठरतील.

डॉ. सदानंद मोरे यांनी पूर्वेतिहासाचा धांडोळा घेण्याची आपल्या अध्ययनविश्वातील प्रचलित संशोधन प्रणाली पाश्चात्य विद्यापरंपरेच्या मूशीमधून साकारली असल्याचे सांगितले. मात्र भारतासारख्या विशाल, बहुढंगी आणि प्राचीन संस्कृतीचे पाथेय लाभलेल्या देशाच्या गतकालाचे अध्ययन करण्यासाठी पाश्चात्य चौकट पुरेशी ठरत नाही. भारतीय संस्कृती व परंपरेचे देशी जाणीवांच्या माध्यमातून आकलन करू न घेण्याचा एक पर्याय या सात चरित्रग्रंथांच्या माध्यमातून उपलब्ध झाला असल्याचे ते म्हणाले. श्री गंधर्ववेद प्रकाशन संस्थेचे दीपक खाडिलकर यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.