शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

चिरंजीवित्वाचे गमक गुणांच्या उपासनेत : चैतन्यमहाराज देगलूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:38 IST

पुणे : माणसाची कीर्ती मर्त्य असली तरी जीवनभर मनुष्य ज्या गुणांची उपासना करतो. त्या गुणांमुळेच त्याची कीर्ती चिरंजीव नांदत ...

पुणे : माणसाची कीर्ती मर्त्य असली तरी जीवनभर मनुष्य ज्या गुणांची उपासना करतो. त्या गुणांमुळेच त्याची कीर्ती चिरंजीव नांदत राहते. भारतीय परंपरेमध्ये विख्यात असलेल्या सप्तचिरंजीवांची संकल्पना हेच वास्तव अधोरेखित करते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी केले.

श्री गंधर्ववेद प्रकाशन या संस्थेतर्फे ’सप्तचिरंजीव’ या ग्रंथमालेतील सात चिरंजीव व्यक्तिमत्वांच्या चरित्रांचे प्रकाशन देगलूरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैदिक संशोधन मंडळाचे संचालक प्रणव गोखले तर प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते.

व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन धारणेसाठी उपकारक ठरणा-या गुणांचा परमोत्कर्ष आपल्या जीवनामध्ये साधण्याची प्रेरणा या चरित्रग्रंथांच्या माध्यमातून मिळेल असे देगलूरकर यांनी सांगितले. प्रणव गोखले म्हणाले की, प्राचीन काळी होऊ न गेलेल्या घटनांना शब्दालंकृत करून पूर्वकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडणारा सेतू निर्माण करणे हे पुराणांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच पुराण साहित्यात शब्दबद्ध झालेल्या गतेतिहासाचे दस्तऐवजीकरण विलक्षण दक्षतेने आणि तारतम्याने केले जाणे आवश्यक ठरते. त्यासाठी मुळात आपल्या पूर्वकालीन संस्कृतीमध्ये नेमके काय काय साकारले याची साक्षेपी शोध घेण्याची एक दिशा या चरित्रकहाणी ग्रंथसंचाद्वारे मिळाली असून, हे सातही ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून सतत मार्गदर्शक ठरतील.

डॉ. सदानंद मोरे यांनी पूर्वेतिहासाचा धांडोळा घेण्याची आपल्या अध्ययनविश्वातील प्रचलित संशोधन प्रणाली पाश्चात्य विद्यापरंपरेच्या मूशीमधून साकारली असल्याचे सांगितले. मात्र भारतासारख्या विशाल, बहुढंगी आणि प्राचीन संस्कृतीचे पाथेय लाभलेल्या देशाच्या गतकालाचे अध्ययन करण्यासाठी पाश्चात्य चौकट पुरेशी ठरत नाही. भारतीय संस्कृती व परंपरेचे देशी जाणीवांच्या माध्यमातून आकलन करू न घेण्याचा एक पर्याय या सात चरित्रग्रंथांच्या माध्यमातून उपलब्ध झाला असल्याचे ते म्हणाले. श्री गंधर्ववेद प्रकाशन संस्थेचे दीपक खाडिलकर यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.