शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

चिरंजीवित्वाचे गमक गुणांच्या उपासनेत : चैतन्यमहाराज देगलूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:38 IST

पुणे : माणसाची कीर्ती मर्त्य असली तरी जीवनभर मनुष्य ज्या गुणांची उपासना करतो. त्या गुणांमुळेच त्याची कीर्ती चिरंजीव नांदत ...

पुणे : माणसाची कीर्ती मर्त्य असली तरी जीवनभर मनुष्य ज्या गुणांची उपासना करतो. त्या गुणांमुळेच त्याची कीर्ती चिरंजीव नांदत राहते. भारतीय परंपरेमध्ये विख्यात असलेल्या सप्तचिरंजीवांची संकल्पना हेच वास्तव अधोरेखित करते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी केले.

श्री गंधर्ववेद प्रकाशन या संस्थेतर्फे ’सप्तचिरंजीव’ या ग्रंथमालेतील सात चिरंजीव व्यक्तिमत्वांच्या चरित्रांचे प्रकाशन देगलूरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैदिक संशोधन मंडळाचे संचालक प्रणव गोखले तर प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते.

व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन धारणेसाठी उपकारक ठरणा-या गुणांचा परमोत्कर्ष आपल्या जीवनामध्ये साधण्याची प्रेरणा या चरित्रग्रंथांच्या माध्यमातून मिळेल असे देगलूरकर यांनी सांगितले. प्रणव गोखले म्हणाले की, प्राचीन काळी होऊ न गेलेल्या घटनांना शब्दालंकृत करून पूर्वकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडणारा सेतू निर्माण करणे हे पुराणांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच पुराण साहित्यात शब्दबद्ध झालेल्या गतेतिहासाचे दस्तऐवजीकरण विलक्षण दक्षतेने आणि तारतम्याने केले जाणे आवश्यक ठरते. त्यासाठी मुळात आपल्या पूर्वकालीन संस्कृतीमध्ये नेमके काय काय साकारले याची साक्षेपी शोध घेण्याची एक दिशा या चरित्रकहाणी ग्रंथसंचाद्वारे मिळाली असून, हे सातही ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून सतत मार्गदर्शक ठरतील.

डॉ. सदानंद मोरे यांनी पूर्वेतिहासाचा धांडोळा घेण्याची आपल्या अध्ययनविश्वातील प्रचलित संशोधन प्रणाली पाश्चात्य विद्यापरंपरेच्या मूशीमधून साकारली असल्याचे सांगितले. मात्र भारतासारख्या विशाल, बहुढंगी आणि प्राचीन संस्कृतीचे पाथेय लाभलेल्या देशाच्या गतकालाचे अध्ययन करण्यासाठी पाश्चात्य चौकट पुरेशी ठरत नाही. भारतीय संस्कृती व परंपरेचे देशी जाणीवांच्या माध्यमातून आकलन करू न घेण्याचा एक पर्याय या सात चरित्रग्रंथांच्या माध्यमातून उपलब्ध झाला असल्याचे ते म्हणाले. श्री गंधर्ववेद प्रकाशन संस्थेचे दीपक खाडिलकर यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.