शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

चिंता फुगलेल्या निकालाची...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST

राज्य मंडळाच्या यंदाच्या दहावीच्या निकालाने या वर्षी अनेक विश्वविक्रम केले आहेत. या घवघवीत यशाचा ना विद्यार्थ्यांना सात्त्विक आनंद आहे, ...

राज्य मंडळाच्या यंदाच्या दहावीच्या निकालाने या वर्षी अनेक विश्वविक्रम केले आहेत. या घवघवीत यशाचा ना विद्यार्थ्यांना सात्त्विक आनंद आहे, ना पालकांना समाधान. विद्यार्थी शाळेत प्रवेशित झालेल्या दिवसापासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर डोळा ठेऊन अभ्यास करत असतात. ‘दहावी बोर्ड परीक्षा’ ही अत्यंत प्रतिष्ठित नामाभिधानाने गौरवांकित असलेली तसेच विद्यार्थ्यांची सचेतन प्रेरणा होती. आयुष्याच्या लखलखत्या तेजोमय विक्रमाचे ते प्रवेशद्वार असायचे. आयुष्य जगायला सक्षम करणाऱ्या क्षमतांचे पैलू पाडणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांमधील सर्व सुप्त क्षमता संवर्धित करणारा मापदंड आणि मानदंड होती.

ओलांडली गेलेली मर्यादा विकासाऐवजी विनाशाकडे घेऊन जाते. हजारो विद्यार्थ्यांना गुण प्राप्तीची शंभरी ओलांडली आहे. पूर्वी पालक आपल्या मुलांचे लक्षवेधी गुण मोठ्या अभिमानाने सांगत. परंतु, आता हे फुगलेले गुण एकमेकांना सांगण्याचा संकोच वाटतो आहे. मूल्य नसलेले हे मापन विद्यार्थी मनात अहंकार निर्माण करत आहे. परीक्षा परिश्रमाचा संस्कार करते. हा सिद्धांतच येथे खोटा ठरला आहे. या परीक्षेतून मिळालेल्या प्रचंड आभासी गुणांची नशा सर्वोत्तम भवितव्यासाठी घ्यावयाच्या झेपेचा नाश करणारी आहे.

आता या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाच्या अविरत ध्यासाची वेगळ्याने अध्ययन अनुभूती द्यावी लागेल. अपयशातून सावरणे काय असते हे यांना कधीच कळणार नाही. पूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एखादी दुसरी कॉपी केली तर तो चिंतेचा आणि चिंतनाचा विषय व्हायचा. परीक्षा न देता प्राप्त गुणांची ही लयलूट आळशी आणि अकर्मण्य शैक्षणिक संस्कृतीची पायाभरणी करणारी विनाशकारी प्रथा ठरू नये म्हणजे झाले.

शाळा, शिक्षक आणि पालकांपुढे या विद्यार्थ्यांवर आता अविरत श्रमाच्या कठोर परिश्रमाचे आत्मलक्षी संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतील. प्राप्त झालेले हे भरमसाठ आभासी अंक मापन आहे, मूल्यमापन नाही. हे त्यांच्या मनावर ठसवावे लागेल. शाळांनी बारावीपर्यंत या विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष कृती अभ्यास आणि स्वाध्याय सोडून घेण्याचे सतत संस्कार करण्याची आवश्यकता आहे. ‘लक्ष्यतक पहुंचे बिना पथमे पथिक विश्राम कैसा’ या प्रेरक विचारांचे कृतीद्वारा संस्कार करणे अत्यावश्यक आहे. लक्ष्यवेधी अध्ययन अनुभव देऊन आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षक मित्रांना तयार रहावे लागेल. अन्यथा खेडोपाड्यातील वाडी-वस्त्यावरील विद्यार्थी दिशाहिन भरकटल्याशिवाय राहणार नाहीत. ही भीती अस्वस्थ करणारी आहे.

कोरोनाच्या विनाशकारी पडझडीतील ही शैक्षणिक पडझड नवपिढ्यांतील शौर्य, धैर्य, साहस आणी प्रज्ञा संवर्धनाला मारक ठरणारी असून ती अधिक चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे समाज आणि राष्ट्र बांधणीसाठी नवनिर्माणाच्या कृतिशील सर्जशीलतेची पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सर्वांनाच तयार राहावे लागेल.

- डॉ. गोविंद नांदेडे, माजी प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य

फोटो - दहावी निकाल