शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

विश्व साहित्य संमेलन शासनभरोसे

By admin | Updated: April 17, 2015 00:53 IST

पहिल्या तीन संमेलनानंतर विश्व साहित्य संमेलनाच्या वारीचा मुहूर्त अद्याप जुळून आलेला नाही.

पुणे : पहिल्या तीन संमेलनानंतर विश्व साहित्य संमेलनाच्या वारीचा मुहूर्त अद्याप जुळून आलेला नाही. यंदा दक्षिण आफ्रिकेच्या निमित्ताने हे संमेलन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असल्या, तरी जोपर्यंत शासनाकडून २५ लाख रुपये मिळत नाहीत, तोपर्यंत संमेलनाचे घोंगडे भिजतच राहणार आहे.अनुदानाची फाईल शासनदरबारी पडूनच असून, त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संमेलन घ्यायचे का नाही, याचा फैसला शासनभरोसेच राहणार आहे, असा निर्वाळा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिला. मराठी भाषा ही सातासमुद्रापार गेली पाहिजे, या उद्देशाने साहित्य महामंडळाने विश्व मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ साहित्यविश्वात रुजविली. त्यानुसार २००९ मध्ये पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसको येथे झाले. त्यानंतर दुबई आणि सिंगापूर येथे हे संमेलन पार पडले. तीन संमेलनांनंतर मात्र हा योग पुन्हा जुळून आला नाही. गेल्या वर्षी टोरांटो येथील मराठी मंडळाच्या निमंत्रणामुळे विश्व संमेलनाचा मुहूर्त पुन्हा जुळून आला. परंतु, आयोजकांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा खर्च करण्यासाठी नकार दिल्यामुळे हे संमेलन रद्द करावे लागले. यामुळे शासनाकडून मिळालेले २५ लाख रुपयेदेखील महामंडळाला परत करण्याची नामुष्की ओढवली. आता दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्गमधील मराठी मंडळाकडून प्रस्ताव आल्याने मंडळाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (प्रतिनिधी)४‘‘मुळात विश्व साहित्य संमेलन हे दरवर्षी व्हायला पाहिजे, असा कोणताही नियम नाही. कुणाकडून निमंत्रण आले तरच हे संमेलन आयोजित करणे शक्य होणार आहे. ते आलेच नाही तर संमेलन कुणाच्या जिवावर करणार? शासनाकडे पूर्वीच फाईल पाठविलेली आहे; मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे माधवी वैद्य यांनी सांगितले.४‘महामंडळाच्या घटनादुरुस्तीमध्ये विश्व साहित्य संमेलनाची तरतूद केली आहे; परंतु त्याला धर्मादाय आयुक्तांची जोपर्यंत मान्यता मिळत नाही, तोपर्यंत हे अनुदान मिळणार नाही. असे कोणते पत्र शासनाने पाठविले आहे का,’ असे विचारता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. एकदा का सर्वसाधारण बैठकीत मंजुरी मिळाली की बाकी कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे वैद्य म्हणाल्या.