शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

विश्व साहित्य संमेलन शासनभरोसे

By admin | Updated: April 17, 2015 00:53 IST

पहिल्या तीन संमेलनानंतर विश्व साहित्य संमेलनाच्या वारीचा मुहूर्त अद्याप जुळून आलेला नाही.

पुणे : पहिल्या तीन संमेलनानंतर विश्व साहित्य संमेलनाच्या वारीचा मुहूर्त अद्याप जुळून आलेला नाही. यंदा दक्षिण आफ्रिकेच्या निमित्ताने हे संमेलन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असल्या, तरी जोपर्यंत शासनाकडून २५ लाख रुपये मिळत नाहीत, तोपर्यंत संमेलनाचे घोंगडे भिजतच राहणार आहे.अनुदानाची फाईल शासनदरबारी पडूनच असून, त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संमेलन घ्यायचे का नाही, याचा फैसला शासनभरोसेच राहणार आहे, असा निर्वाळा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिला. मराठी भाषा ही सातासमुद्रापार गेली पाहिजे, या उद्देशाने साहित्य महामंडळाने विश्व मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ साहित्यविश्वात रुजविली. त्यानुसार २००९ मध्ये पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसको येथे झाले. त्यानंतर दुबई आणि सिंगापूर येथे हे संमेलन पार पडले. तीन संमेलनांनंतर मात्र हा योग पुन्हा जुळून आला नाही. गेल्या वर्षी टोरांटो येथील मराठी मंडळाच्या निमंत्रणामुळे विश्व संमेलनाचा मुहूर्त पुन्हा जुळून आला. परंतु, आयोजकांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा खर्च करण्यासाठी नकार दिल्यामुळे हे संमेलन रद्द करावे लागले. यामुळे शासनाकडून मिळालेले २५ लाख रुपयेदेखील महामंडळाला परत करण्याची नामुष्की ओढवली. आता दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्गमधील मराठी मंडळाकडून प्रस्ताव आल्याने मंडळाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (प्रतिनिधी)४‘‘मुळात विश्व साहित्य संमेलन हे दरवर्षी व्हायला पाहिजे, असा कोणताही नियम नाही. कुणाकडून निमंत्रण आले तरच हे संमेलन आयोजित करणे शक्य होणार आहे. ते आलेच नाही तर संमेलन कुणाच्या जिवावर करणार? शासनाकडे पूर्वीच फाईल पाठविलेली आहे; मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे माधवी वैद्य यांनी सांगितले.४‘महामंडळाच्या घटनादुरुस्तीमध्ये विश्व साहित्य संमेलनाची तरतूद केली आहे; परंतु त्याला धर्मादाय आयुक्तांची जोपर्यंत मान्यता मिळत नाही, तोपर्यंत हे अनुदान मिळणार नाही. असे कोणते पत्र शासनाने पाठविले आहे का,’ असे विचारता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. एकदा का सर्वसाधारण बैठकीत मंजुरी मिळाली की बाकी कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे वैद्य म्हणाल्या.