शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

विश्व साहित्य संमेलन शासनभरोसे

By admin | Updated: April 17, 2015 00:53 IST

पहिल्या तीन संमेलनानंतर विश्व साहित्य संमेलनाच्या वारीचा मुहूर्त अद्याप जुळून आलेला नाही.

पुणे : पहिल्या तीन संमेलनानंतर विश्व साहित्य संमेलनाच्या वारीचा मुहूर्त अद्याप जुळून आलेला नाही. यंदा दक्षिण आफ्रिकेच्या निमित्ताने हे संमेलन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असल्या, तरी जोपर्यंत शासनाकडून २५ लाख रुपये मिळत नाहीत, तोपर्यंत संमेलनाचे घोंगडे भिजतच राहणार आहे.अनुदानाची फाईल शासनदरबारी पडूनच असून, त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संमेलन घ्यायचे का नाही, याचा फैसला शासनभरोसेच राहणार आहे, असा निर्वाळा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिला. मराठी भाषा ही सातासमुद्रापार गेली पाहिजे, या उद्देशाने साहित्य महामंडळाने विश्व मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ साहित्यविश्वात रुजविली. त्यानुसार २००९ मध्ये पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसको येथे झाले. त्यानंतर दुबई आणि सिंगापूर येथे हे संमेलन पार पडले. तीन संमेलनांनंतर मात्र हा योग पुन्हा जुळून आला नाही. गेल्या वर्षी टोरांटो येथील मराठी मंडळाच्या निमंत्रणामुळे विश्व संमेलनाचा मुहूर्त पुन्हा जुळून आला. परंतु, आयोजकांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा खर्च करण्यासाठी नकार दिल्यामुळे हे संमेलन रद्द करावे लागले. यामुळे शासनाकडून मिळालेले २५ लाख रुपयेदेखील महामंडळाला परत करण्याची नामुष्की ओढवली. आता दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्गमधील मराठी मंडळाकडून प्रस्ताव आल्याने मंडळाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (प्रतिनिधी)४‘‘मुळात विश्व साहित्य संमेलन हे दरवर्षी व्हायला पाहिजे, असा कोणताही नियम नाही. कुणाकडून निमंत्रण आले तरच हे संमेलन आयोजित करणे शक्य होणार आहे. ते आलेच नाही तर संमेलन कुणाच्या जिवावर करणार? शासनाकडे पूर्वीच फाईल पाठविलेली आहे; मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे माधवी वैद्य यांनी सांगितले.४‘महामंडळाच्या घटनादुरुस्तीमध्ये विश्व साहित्य संमेलनाची तरतूद केली आहे; परंतु त्याला धर्मादाय आयुक्तांची जोपर्यंत मान्यता मिळत नाही, तोपर्यंत हे अनुदान मिळणार नाही. असे कोणते पत्र शासनाने पाठविले आहे का,’ असे विचारता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. एकदा का सर्वसाधारण बैठकीत मंजुरी मिळाली की बाकी कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे वैद्य म्हणाल्या.