शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

विश्वासाठी कार्य करणे कर्मयोग

By admin | Updated: February 5, 2015 00:19 IST

मानवाच्या अयोग्य संकल्पनांच्या आहारी जाण्याने त्याचा गुरुतत्त्वाशी असलेला सुसंवाद नाहीसा झाला आहे. त्यामुळे त्याचे जीवन दु:खमय झाले आहे.

पुणे : मानवाच्या अयोग्य संकल्पनांच्या आहारी जाण्याने त्याचा गुरुतत्त्वाशी असलेला सुसंवाद नाहीसा झाला आहे. त्यामुळे त्याचे जीवन दु:खमय झाले आहे. आनंदी जीवनाकरिता पक्षी, प्राणी आणि इतर जीवजंतूंसह समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. विश्वकल्याणासाठी कार्य करणे हाच खरा कर्मयोग आहे, असे मत गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी व्यक्त केले.गुरुतत्त्वयोग संस्थेच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट माण, लुई ब्रेल अंध-अपंग कल्याण संस्था, वाघोली यांना आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत देण्यात आली. चैतन्य ट्रस्टच्या नलिनी इनामदार, अंध-अपंग संस्थेचे अर्जुन केंद्रे, ज्ञानेश्वर केंद्रे यांनी मदत स्वीकारली. गुरुतत्त्वयोगचे प्रमुख विश्वस्त श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते ‘गुरुतत्त्ववेध’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सरदार म्हणाले, ‘‘गुरुतत्त्वयोग हा विशिष्ट वंश, जात, धर्म, पंथ, समाज यांपुरता मर्यादित नसून प्राणिमात्रा, वनस्पतींनाही त्याच्या मार्गदर्शनाचा फायदा होतो. गुरुतत्त्व आपल्याला नकळतपणे जगण्याचे धडे देत असते. यासाठी मानवी गुरुची आवश्यकता असतेच, असे नाही. जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग, अनुभव आपल्याला शिकवीत असून, त्यामधील गुरुतत्त्वाशी सुसंवाद साधून शिकणे आवश्यक आहे.’’‘गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञानाची ओळख’ या विषयावर सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये माणसांमधील सहजप्रकृती, शरणागतसाधना आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. मानसी मांडे यांनी प्रास्ताविक केले. तेजा दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)ओळख उत्तुंग भरारी घेणाऱ्यांची४अपंग व्यक्तींनी परिस्थितीवर मात करून मिळविलेले यश व त्या वेळी त्यांना मिळालेली गुरुतत्त्वाची साथ याविषयीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामध्ये हेलेन केलर, मुरलीकांत पेटकर, गिरीश शर्मा, टेम्पल ग्रांडीन, हेन्री फोर्ड, वॉल्ट डिस्रे, गौरी गाडगीळ आदींच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.