शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

कामगारांनी घेतली शपथ

By admin | Updated: March 6, 2016 01:04 IST

औद्योगिक सुरक्षा सप्ताहाला शुक्रवारी सुरुवात झाली. या निमित्ताने शहरातील विविध कंपन्यांमध्ये कामगारांनी राष्ट्रीय सुरक्षिततेची शपथ घेतली.

पिंपरी : औद्योगिक सुरक्षा सप्ताहाला शुक्रवारी सुरुवात झाली. या निमित्ताने शहरातील विविध कंपन्यांमध्ये कामगारांनी राष्ट्रीय सुरक्षिततेची शपथ घेतली. तसेच, ध्वजवंदन, शून्य अपघात फायर फायटिंग, तातडीच्या अपघातासंबंधी प्रात्यक्षिके, सुरक्षेसंदर्भात व्याख्यान, घोषवाक्ये, भित्तिचित्र स्पर्धा आणि बक्षीस वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. औद्योगिकनगरीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ११ मार्चपर्यंत आहे. त्यांची सुरुवात शुक्रवारी झाली. कंपनीत अपघाताचे शून्य प्रमाण ठेवून, सुरक्षितपणे उत्पादन घेण्याबाबत सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एमआयडीसी, भोसरी येथील सेंच्युरी एन्का कंपनीत सप्ताहाची सुुुरुवात झाली. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक ए. डी. खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी व्यवस्थापक आर. बात्रशा, अतिरिक्त व्यवस्थापक वाय. एम. कामत, मनुष्यबळ विभागाचे सरव्यवस्थापक ए. के. सहेल, सुरक्षा व्यवस्थापक अमोल शहा आदी उपस्थित होते. खोत म्हणाले, ‘‘काम करताना कामगारांची शारीरिक व मानसिक स्थिती योग्य नसल्यास अपघात घडू शकतात. याशिवाय वेळेत काम पूर्ण करण्यासाठी कामगारावर असलेला अतिरिक्त ताण आणि कामाच्या असुरक्षित ठिकाणी अपघात घडतात. कामाच्या ठिकाणी दृश्य स्वरुपातील धोके लक्षात येतात. मात्र, डोळ्यांना सहजपणे न दिसणारे धोके ओळखण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासते. भोपाळ दुर्घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कंपनी कायद्यात सकारला बदल करावा लागला.’’कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष एस. वाय. अगशीमनी यांनी अपघातांची टक्केवारी विशद केली. देशात केलेल्या सर्वेक्षणात नैसर्गिक घटकांमुळे २ टक्के, असुरक्षित वातावरणामुळे १ टक्का, तर ९० टक्के अपघात हे मानवाच्या असुरक्षित कृती व वर्तनामुळे होत असल्याचे नमूद केले आहे. मात्र, अशा प्रकारच्या सुरक्षितता सप्ताहामुळे कामगारांमध्ये अपघाताविषयी जागृती होत असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहेत. तसेच विविध कंपन्यांमध्ये सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कामगारांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले जाते. (प्रतिनिधी)थिसेनकु्रप इंडस्ट्रीज कंपनीत झालेल्या कार्यक्रमात कामगारांनी सुरक्षेसंदर्भात सामुदायिक शपथ घेतली. ध्वजारोहण कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डी. एन. दमानिया यांच्या हस्ते झाले. या वेळी कार्यकारी संचालक मलई दास, संचालक गौतम घोष, तांत्रिक उत्पादन संचालक सुहास तलाठी, मनुष्यबळ विकास अधिकारी मनोज राणे, अधिकारी रणजित मोहिते, आरोग्याधिकारी डॉ. डी. के. जोशी, थिसेनकु्रप कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल गोडसे, जयवंत डावरे आदी उपस्थित होते. चिंचवड स्टेशन येथील स्पॅको टेक्नॉलॉजीजमध्ये सुरक्षेबाबत कामगारांना माहिती देण्यात आली. सुरक्षा अधिकारी स्वामिनाथन सुकाळे यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ अधिकारी श्रीराम सराफ, मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी प्रकाश मिरजकर, श्रमिक एकता महासंघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, स्पॅको एम्प्लॉईज युनियनचे सचिव जालिंदर काळभोर आदी उपस्थित होते. सप्ताहामध्ये घोषवाक्य, निबंध आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.