शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: November 10, 2016 01:27 IST

विधान परिषद, महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने अचानकपणे ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

पिंपरी : विधान परिषद, महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने अचानकपणे ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका आगामी निवडणुकांसाठी काळा पैसा साठवून निवडणुका लढविणाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांतील पैसेवाले उमेदवार चिंतेत आले असले, तरी प्रामाणिक कार्यकर्त्यांना अच्छे दिनची आशा वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री अचानकपणे काळा पैसा बाहेर येण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्दचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. निवडणुका लढविण्यासाठी ज्यांनी रोख रक्कम जमा करून ठेवली त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. हा काळा पैसा ३० डिसेंबरपर्यंत चलनात आणला नाही, तर तो बाद होणार आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये पैशांचा धूर काढणे अवघड बनले. पैशांच्या जोरावर निवडणुका लढविण्याचे मनसुबे फोल ठरणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत पैशापेक्षा कार्यकर्त्यांच्या संपर्काचा कस लागणार आहे. त्यामुळे पैसेवाले इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पंचवार्षिक निवडणुकांसाठी आयोगाकडून खर्चाची मर्यादा ठरवून दिली जाते. मात्र, कोणताही उमेदवार केवळ नावाला खर्च दाखवितो. प्रत्यक्षात रोख स्वरूपातील काळा पैसा निवडणुकीच्या काळात मतदारांना आमिष म्हणून वाटला जातो. बहुतेक उमेदवारांकडून कमी-अधिक प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होता. आयोगाच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पट पैसे खर्च होतात. राजकीय नेत्यांकडून कमावलेला पैसा हा प्रामुख्याने ठेकेदाराने दिलेला ब्लॅक मनी असतो. निवडणुकांमध्ये मतदारांना रोख रकमेचे वाटप व कार्यकर्त्यांवर खर्च करण्यासाठी रोख रक्कम वापरली जाते. मात्र, त्याची निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणाऱ्या जमा-खर्चात कोठेही नोंद असत नाही. आता काळा पैसा बाहेर काढण्यासाठी राजकारण्यांची गोची होणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याची आशा आहे. (प्रतिनिधी)आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छूकांनी मोठ्या प्रमाणात पैशांची जमवा-जमव केली होती. निवडणूक काळात निवडणूक आयोगाची करडी नजर राहत असल्याने नेते मंडळीनी आतापासून पैशांची तरबेज केली . मात्र, मोदी सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा बाद केल्याने, नेते मंडळीचीं डोकेदुखी वाढली आहे. या नोटा बाद झाल्यामुळे नेते मंडळींसह इच्छुकांनी मतदारांना या नोटांच्या जागी आता,भेटवस्तू देण्याचा विचार सुरु केला आहे. कार्यकर्त्यांना न्याय...राजकीय पक्षांसाठी एकनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना केवळ पैसे नसल्याने निवडणुकीसाठी उभे राहणे अशक्य होते. त्यामुळे ऐनवेळी पक्षात येणाऱ्या पैसेवाल्याला उमेदवारी व तिकीट दिले जाते. परंतु, काळा पैसा अडचणी येणार असल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.