शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कामगार असुरक्षित

By admin | Updated: January 9, 2017 02:57 IST

आधुनिक शहर म्हणून बिरुद मिरविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात बंदी असूनही बांधकाम जोरात सुरू आहेत. मात्र, या बांधकामावर काम करणाऱ्या

पिंपरी : आधुनिक शहर म्हणून बिरुद मिरविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात बंदी असूनही बांधकाम जोरात सुरू आहेत. मात्र, या बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही साधनसामग्री आणि उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र पाहायला आहे. त्यामुळे कामगारनगरी म्हणून ओळख असणाऱ्या या शहरातच कामगार सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा जाळ्या, हेल्मेट, बेल्ट, पॅड आदी साधने नसल्याने कामगारांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असूनही त्याकडे ठेकेदार आणि प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.उंच ठिकाणी काम करीत असताना इमारतीच्या बाहेरील बाजूस सुरक्षा जाळी, तसेच बेल्ट आवश्यक असूनही कामगारांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. बहुतांश कामगार उत्तर व दक्षिण भारतातील रहिवासी आहेत. खासगी ठेकेदारांमार्फत त्यांना कामे मिळवून दिली जातात. बांधकामाच्या ठिकाणी कामगार पुरविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून ठेकेदाराशी करार करण्यात येतो. त्यानुसार बांधकाम प्रकल्पावर झालेल्या दुर्घटनेस ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येते. परिणामी, बांधकाम व्यावसायिक, ज्याला आपण काम दिले आहे, तो ठेकेदार करारातील नियमावली पाळतो की नाही, याची तपासणी न करता, काम लवकर कसे पूर्ण होईल हे पाहत असतो. त्याचवेळी ठेकेदार कामगारांवरील खर्चात जास्तीत जास्त कपात करून, नफा कमावण्याच्या दृष्टीने काम करीत असतो. हा सर्व प्रकार सुरू असताना पालिकेचे अधिकारीदेखील नेमके बांधकाम प्रकल्पावर नियमावलीनुसार काम सुरू आहे का, ते प्रत्यक्ष जाऊन पाहताना दिसत नाहीत. त्यांच्या या धोरणामुळे नाहक गोरगरीब मजुरांचा बळी जात आहे. अपघात होऊन गंभीर जखमी, तसेच जीव जाण्याच्या घटना घडत असतानाही कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिक मात्र घटनेशी काहीही संबंध नसल्यासारखे वागत असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) अपघातांपासून धडा नाही बांधकाम करतेवेळी काही अपघात होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक असते. या सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने पाच महिन्यांपूर्वी बालेवाडी येथील प्राइड पर्पलच्या स्पार्क एक्स्प्रेस टाऊनशिपमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना घडूनही बहुतांश जागी कामगारांच्या सुरक्षेला हरताळ फासला जात असल्याचे चित्र शहरात सर्रास पाहायला मिळत आहे. रावेत, किवळे, वाकड, तळवडे, रुपीनगर अशा विविध भागात बांधकामे जोरात सुरू आहेत. यातील काही ठिकाणी सध्या स्लॅब टाकण्यात येत असून, येथे सुरक्षा जाळी लावणे आवश्यक आहे. मात्र, येथे बहुतांश ठिकाणी जाळी लावण्यात आलेली नाही. इमारतीच्या एका कोपऱ्यात फक्त नावाला जाळीचा एक तुकडा लावलेला दिसतो.