शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

क्रांतीपेक्षा शक्य ते काम करावे : अरुण ठाकूर; पुण्यात संघर्ष सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:22 IST

क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, अशा स्वानुभवातून अरुण ठाकूर यांनी कामाचा मूलमंत्र दिला. डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संघर्ष सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देअरुण ठाकूर, दिशा शेख यांना ‘संघर्ष सन्मान’ प्रदानरस्त्यावर टाळी वाजवून भिक मागणाऱ्या प्रत्येकाला समाजाच्या प्रेमाची गरज : दिशा शेख

पुणे : मी पूर्वी शिवसैनिक होतो आणि सवयीप्रमाणे गांधींना शिव्या द्यायचो. एकदा आमचे पटेल सर म्हणाले, महात्मा गांधींना रोज अनेक पत्रे येत. लोक अगदी कौटुंबिक अडीअडचणी पत्रातून सांगायचे. गांधींचे मोठेपण हे की ते प्रत्येकाला किमान एक ओळीचे तरी उत्तर द्यायचे. गांधींनी सामान्य माणसांमध्ये विश्वास निर्माण केला, असा विश्वास तुम्ही निर्माण करू शकता का, ते पाहा. या उदाहरणामुळे जीवन बदलले आणि सेवादलाकडे वळलो. विरोधातून कामाला बळ मिळते... क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, अशा स्वानुभवातून अरुण ठाकूर यांनी कायकर्त्यांना कामाचा मूलमंत्र दिला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संघर्ष सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. स्नेहालय संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते आनंददायी शिक्षण देणाऱ्या आनंदनिकेतन या नाशिक येथील शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर यांना आणि संघषार्तून तृतीयपंथी कवयित्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलेली दिशा शेख यांना ‘संघर्ष सन्मान’ प्रदान करण्यात आला. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ठाकूर आणि दिशा यांच्या घेतलेल्या मुलाखत प्रत्येकाला अंतर्मुख करून गेली. याप्रसंगी मुक्तांगणचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, अध्यक्ष ए. पी. कुलकर्णी आणि विश्वस्त मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होते. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी अनिता अवचट यांच्या आठवणींना उजाळा दिला.समाजात अगदीच काही घडत नाही असे मी म्हणणार नाही. बदल होत आहे. बदल होण्याची गती संथ आहे; पण कार्यकर्त्यांनी आपल्या हयातीत परिवर्तन झाले पाहिजे हा अतिउत्साह जरा कमी केला पाहिजे. क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, याकडे अरुण ठाकूर यांनी लक्ष वेधले.     

समाजव्यवस्थेवर ताशेरेदिशा शेख यांनी तृतीयपंथी यांचे आयुष्य मांडताना समाजव्यवस्थेवरही ताशेरे ओढले. कोण कसं राहतं यापेक्षा तू कशी आहेस, असे विचारले पाहिजे. धर्म व माणूस यांच्या निर्मितीपासून आम्ही आहोत तिथेच आहोत. आमच्या समाजाचे सोयीचे दैवतीकरण केले आहे. विवाहसंस्था ही मुळातच शोषणव्यवस्था आहे. आमच्या समाजाच्या लैंगिक स्वातंत्र्यासाठी आंदोलन झालेले नाही. आमची लैंगिकता स्वीकारण्याची धमक पुरुष किंवा स्त्रियांमध्ये नाही. मला लोक मिठी मारतात. गोड बोलतात; पण रस्त्यावर टाळी वाजवून भिक मागणाऱ्या प्रत्येकाला समाजाच्या प्रेमाची गरज आहे, अशा शब्दातं दिशा यांनी समाजाच्या डोळ्यांत अंजन घातले. 

टॅग्स :Anil Avchatअनिल अवचटPuneपुणे