शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीपेक्षा शक्य ते काम करावे : अरुण ठाकूर; पुण्यात संघर्ष सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:22 IST

क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, अशा स्वानुभवातून अरुण ठाकूर यांनी कामाचा मूलमंत्र दिला. डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संघर्ष सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देअरुण ठाकूर, दिशा शेख यांना ‘संघर्ष सन्मान’ प्रदानरस्त्यावर टाळी वाजवून भिक मागणाऱ्या प्रत्येकाला समाजाच्या प्रेमाची गरज : दिशा शेख

पुणे : मी पूर्वी शिवसैनिक होतो आणि सवयीप्रमाणे गांधींना शिव्या द्यायचो. एकदा आमचे पटेल सर म्हणाले, महात्मा गांधींना रोज अनेक पत्रे येत. लोक अगदी कौटुंबिक अडीअडचणी पत्रातून सांगायचे. गांधींचे मोठेपण हे की ते प्रत्येकाला किमान एक ओळीचे तरी उत्तर द्यायचे. गांधींनी सामान्य माणसांमध्ये विश्वास निर्माण केला, असा विश्वास तुम्ही निर्माण करू शकता का, ते पाहा. या उदाहरणामुळे जीवन बदलले आणि सेवादलाकडे वळलो. विरोधातून कामाला बळ मिळते... क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, अशा स्वानुभवातून अरुण ठाकूर यांनी कायकर्त्यांना कामाचा मूलमंत्र दिला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संघर्ष सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. स्नेहालय संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते आनंददायी शिक्षण देणाऱ्या आनंदनिकेतन या नाशिक येथील शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर यांना आणि संघषार्तून तृतीयपंथी कवयित्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलेली दिशा शेख यांना ‘संघर्ष सन्मान’ प्रदान करण्यात आला. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ठाकूर आणि दिशा यांच्या घेतलेल्या मुलाखत प्रत्येकाला अंतर्मुख करून गेली. याप्रसंगी मुक्तांगणचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, अध्यक्ष ए. पी. कुलकर्णी आणि विश्वस्त मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होते. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी अनिता अवचट यांच्या आठवणींना उजाळा दिला.समाजात अगदीच काही घडत नाही असे मी म्हणणार नाही. बदल होत आहे. बदल होण्याची गती संथ आहे; पण कार्यकर्त्यांनी आपल्या हयातीत परिवर्तन झाले पाहिजे हा अतिउत्साह जरा कमी केला पाहिजे. क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, याकडे अरुण ठाकूर यांनी लक्ष वेधले.     

समाजव्यवस्थेवर ताशेरेदिशा शेख यांनी तृतीयपंथी यांचे आयुष्य मांडताना समाजव्यवस्थेवरही ताशेरे ओढले. कोण कसं राहतं यापेक्षा तू कशी आहेस, असे विचारले पाहिजे. धर्म व माणूस यांच्या निर्मितीपासून आम्ही आहोत तिथेच आहोत. आमच्या समाजाचे सोयीचे दैवतीकरण केले आहे. विवाहसंस्था ही मुळातच शोषणव्यवस्था आहे. आमच्या समाजाच्या लैंगिक स्वातंत्र्यासाठी आंदोलन झालेले नाही. आमची लैंगिकता स्वीकारण्याची धमक पुरुष किंवा स्त्रियांमध्ये नाही. मला लोक मिठी मारतात. गोड बोलतात; पण रस्त्यावर टाळी वाजवून भिक मागणाऱ्या प्रत्येकाला समाजाच्या प्रेमाची गरज आहे, अशा शब्दातं दिशा यांनी समाजाच्या डोळ्यांत अंजन घातले. 

टॅग्स :Anil Avchatअनिल अवचटPuneपुणे