शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण, ९ महिने रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:10 IST

भोर-महाड रस्त्यावर वरंध घाटात संरक्षक भिंत कोसळली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी १० फेब्रुवारी ते ३० एप्रिल दरम्यान काम बंद ठेवण्यात ...

भोर-महाड रस्त्यावर वरंध घाटात संरक्षक भिंत कोसळली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी १० फेब्रुवारी ते ३० एप्रिल दरम्यान

काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण झाले नसून पुढील १० दिवस काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे ८० दिवसांत पूर्ण होणाऱ्या कामाला एक महिन्यापेक्षा अधिक वेळ लागणार आहे. मागील ९ महिने रस्ता बंद असून, याचा उद्योग-व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड तालुक्याच्या हद्दीतील एका तीव्र वळणावरील संरक्षक भिंत १२ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली होती, यामुळे मागील सहा महिन्यांपासून वाहतूक बंद होती. सदरच्या दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटी ४० लाख ५५ हजार रु निधी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडे मंजूर करण्यात आला होता.

१० फेब्रुवारीपासून भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून सदरचे काम ८० दिवसांत ३० एप्रिल

पर्यत पूर्ण करण्यात येणार होते.त्यामुळे महाड सार्वजनिक

बांधकाम विभागाकडून भोर-महाड रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, महाड बांधकाम विभागाकडुन दिलेली ३० एप्रिलची

मुदत संपून जवळजवळ एक महिना अधिक झाला तरीदेखील अद्याप काम पूर्ण झाले नसून पुढील दहा ते पंधरा दिवस काम पूर्ण होण्यासाठी लागणार असून त्यानंतर रस्ता वाहतुकीस सुरू होणार असल्याचे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. म्हणजे पावसाळा सुरू होणार आणी वाहतूक सुरळीत होणार आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही त्यामुळे भोर-महाड वाहतूक बंद असल्याने कोकणात जाणारे पर्यटक प्रवासी व्यापारी नाराजी व्यक्त करीत आहेत.

भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटात सुरू असलेले संरक्षक भिंत काम.