शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकेंद्राचे काम संथगतीने

By admin | Updated: September 30, 2015 01:18 IST

मलठण येथील वीज उपकेंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील विहिरींना पाणी असून उभ्या पिकांना पाणी विजेअभावी पाणी देता येत नाही.

राजेगाव : मलठण येथील वीज उपकेंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील विहिरींना पाणी असून उभ्या पिकांना पाणी विजेअभावी पाणी देता येत नाही. परिणामी या उपकेंद्राचे राहिलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील मलठण, वाटलूज, नायगाव व राजेगाव येथील ग्रामस्थांकडून होत आहे. दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना उजनी धरणातील बॅक वॉटरचे पाणी हे वरदान असल्याने पाणी मुबलक प्रमाणात आहे. असे असूनदेखील पुरेशा विजेअभावी या भागातील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. सध्या मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगावच्या मेंगावडेवस्तीपर्यंत गावांना आलेगाव येथील उपकेंद्रातून; तर उर्वरित राजेगावला भिगवण येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा होत आहे. हे भाग दोन्ही उपकेंद्राच्या शेवटी टोकाला असल्याने या भागात उन्हाळ्यात अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होतो. यामुळे विद्युत पंप व रोहित्र जळणे, वीजवाहक तारा तुटणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विजेच्या समस्यांमुळे भीमा नदीच्या उजनी बॅक वॉटर क्षेत्रात पाणी शिल्लक असतानाही या भागातील शेतकऱ्यांची पिके उन्हाळ्यात जळून जातात. त्यामुळे या भागातील शेतकरी या परिसरात वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्याची मागणी सातत्याने करीत होता. यामुळे मलठण येथे वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी येथे मंजूर झालेल्या ३३/११ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व तत्कालीन आमदार रमेश थोरात उपस्थित झाले होते. त्या वेळी खासदार सुळे व थोरात यांनी उपकेंद्राचे काम वेगाने करण्याचा आदेश दिला होता. पण दीड वर्ष झाले तरी अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या उपकेंद्रातून मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव या गावांना वीजपुरवठा होणार आहे. विजेची मुख्य वाहिनी टाकण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगची परवानगी आतापर्यंत न मिळाल्याने या उपकेंद्राचे काम रखडले होते.