शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वीज उपकेंद्राचे काम संथगतीने

By admin | Updated: September 30, 2015 01:18 IST

मलठण येथील वीज उपकेंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील विहिरींना पाणी असून उभ्या पिकांना पाणी विजेअभावी पाणी देता येत नाही.

राजेगाव : मलठण येथील वीज उपकेंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील विहिरींना पाणी असून उभ्या पिकांना पाणी विजेअभावी पाणी देता येत नाही. परिणामी या उपकेंद्राचे राहिलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील मलठण, वाटलूज, नायगाव व राजेगाव येथील ग्रामस्थांकडून होत आहे. दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना उजनी धरणातील बॅक वॉटरचे पाणी हे वरदान असल्याने पाणी मुबलक प्रमाणात आहे. असे असूनदेखील पुरेशा विजेअभावी या भागातील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. सध्या मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगावच्या मेंगावडेवस्तीपर्यंत गावांना आलेगाव येथील उपकेंद्रातून; तर उर्वरित राजेगावला भिगवण येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा होत आहे. हे भाग दोन्ही उपकेंद्राच्या शेवटी टोकाला असल्याने या भागात उन्हाळ्यात अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होतो. यामुळे विद्युत पंप व रोहित्र जळणे, वीजवाहक तारा तुटणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विजेच्या समस्यांमुळे भीमा नदीच्या उजनी बॅक वॉटर क्षेत्रात पाणी शिल्लक असतानाही या भागातील शेतकऱ्यांची पिके उन्हाळ्यात जळून जातात. त्यामुळे या भागातील शेतकरी या परिसरात वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्याची मागणी सातत्याने करीत होता. यामुळे मलठण येथे वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी येथे मंजूर झालेल्या ३३/११ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व तत्कालीन आमदार रमेश थोरात उपस्थित झाले होते. त्या वेळी खासदार सुळे व थोरात यांनी उपकेंद्राचे काम वेगाने करण्याचा आदेश दिला होता. पण दीड वर्ष झाले तरी अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या उपकेंद्रातून मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव या गावांना वीजपुरवठा होणार आहे. विजेची मुख्य वाहिनी टाकण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगची परवानगी आतापर्यंत न मिळाल्याने या उपकेंद्राचे काम रखडले होते.