शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

विठ्ठलवाडीत ओढ्याचे काम रखडले

By admin | Updated: May 9, 2017 03:23 IST

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खोलीकरणाचा शुभारंभ केलेल्या ओढ्याचे काम रखडले. त्या वेळेपासून आत्तापर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खोलीकरणाचा शुभारंभ केलेल्या ओढ्याचे काम रखडले. त्या वेळेपासून आत्तापर्यंत ओढ्याचे काम अर्धवटच राहिले आहे. घरोघर पाण्याचा टँकर असणे हा सक्तीचा अलिखित नियम आहे की काय असे वाटावे, अशी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील विठ्ठलवाडी गावची परिस्थिती आहे.इंदापूर शहराच्या दक्षिणेला इंदापूर-अकलूज रस्त्यालगत अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर ही विठ्ठलवाडी आहे. गलांडवाडी नं. २ च्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ती मोडते. १२०० लोकसंख्येच्या या गावात सुमारे १५०० पाळीव जनावरे आहेत. उजनी पाणलोट क्षेत्र व विठ्ठलवाडी दरम्यानच्या परिसरातील जमिनीच्या उंचसखलतेमुळे विठ्ठलवाडीच्या भूगर्भातील पाणीसाठा हरवला आहे. तीनशे ते सहाशे फुटांपर्यंत खोलीवर देखील पाण्याचा थेंबही लागत नाही. केवळ मातीच बाहेर येते. त्यामुळे या गावात बोअर घ्यायला लोक धजावत नाहीत. तीन-चार वर्षांपूर्वी दोनशेच्या वर बोअर घेऊनही पाणी लागले नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. तरंगवाडी तलाव हाच या गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. तो गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरडाच होता. आजघडीला तो थोडाफार भरला असला तरी तरंगवाडी तलावावर अवलंबून असणाऱ्या इतर गावांच्या तुलनेत विठ्ठलवाडीला किती पाणी मिळणार हा प्रश्नच आहे. पाणी दोन-चार किलोमीटरहून आणावे लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते इंदापूर तालुक्यातील त्यांचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र नीरानृसिंह मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघाले असता त्याच रस्त्यावरील विठ्ठलवाडीच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याचे खोलीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ सकाळी सात वाजता त्यांच्या हस्ते झाला होता. रोटरी क्लबच्या माध्यमातून होत असलेल्या या कामाचे भूमिपूजन देवदर्शनाआधी थाटामाटात झाल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.