शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

तांदूळ महोत्सवातून ग्राहक पेठ करते सेतूचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनेक वर्षे शेतकरी संकटात होता आणि आता कोरोना, शेतकरी आंदोलन यामुळे आपला शेतकरी अवघड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अनेक वर्षे शेतकरी संकटात होता आणि आता कोरोना, शेतकरी आंदोलन यामुळे आपला शेतकरी अवघड काळातून जात आहे. या संकटामुळे शेतकरी भरडला जात आहे. त्याचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. शेतकरी आंदोलनामुळे तांदूळ महोत्सवात जो तांदूळ पोहोचला नाही, तो लवकरात लवकर पोहोचला तर शेतकऱ्यांसोबत आपल्याला देखील आनंद होणार आहे. यासाठी ग्राहक पेठ सेतूचे काम करत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

ग्राहक पेठेच्या वतीने सदाशिव पेठ खजिना विहिर चौक येथे आयोजित २८ व्या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अ‍ॅन्ड कंपनीचे राजेश शहा, महोत्सवाचे प्रमुख शैलेश राणीम, उदय जोशी उपस्थित होते. बासमती, आंबेमोहोर, दुबराजपासून इंद्रायणीपर्यंत तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ महोत्सवात पाहायला मिळत आहेत.

राजेश शहा म्हणाले, मागील २८ वर्षांपासून ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव सुरु आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तांदूळ स्वस्त दरात ग्राहकांपर्यत या माध्यमातून पोहोचत आहे. सूर्यकांत पाठक म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण होत आहे. ग्राहकाने एका वेळेस १०० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे.

फोटो ओळ : ग्राहक पेठेच्या वतीने सदाशिव पेठ खजिना विहिर चौक येथे २८ व्या ग्राहक पेठ तांदूळ महोत्सावाचे आयोजन केले आहे. या वेळी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन केले. या वेळी उपस्थित सूर्यकांत पाठक, राजेश शहा आदी.

(फोटो - ग्राहक पेठ नावाने हॅलोसिटीमध्ये आहे.)

बातमी फोटोसह मस्ट आहे.