शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

भामा आसखेड योजनेचे काम शंभर टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:00 IST

येरवडा : गेल्या जवळपास सात वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम शनिवारी मध्यरात्री शंभर टक्के पुर्ण झाले. येत्या ...

येरवडा : गेल्या जवळपास सात वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम शनिवारी मध्यरात्री शंभर टक्के पुर्ण झाले. येत्या १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याच्या चाचणीस सुरवात होणार आहे. त्यानंतर हे पाणी थेट वडगावशेरीतील नागरिकांच्या घरात पोहचणार असल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.

शहराच्या पूर्व भागातील प्रामुख्याने वडगावशेरी, चंदनगर, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव या भागाचा पाणी पुरवठ्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून भामा आसखेड पाणी पुरवठा योजना हाती घेतली. या योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या काळात जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून ३८० कोटींचा निधी मंजूर केला होता. सन २०१३ रोजी सुरू केलेल्या या योजनेचे काम डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह विविध ठिकाणी जलवाहिनीचे काम अडविल्याने या योजनेचे काम बंद होते.

दहा दिवस होणार चाचणी

गेल्या आठ महिन्यात प्रामुख्याने आसखेड गाव येथील एक किमीच्या जलवाहिनीसह चिंबळी, कुरुळी, केळगाव, चऱ्होली याठिकाणीची जलवाहिनीची तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील कामे मार्गी लावली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता केळगाव येथील जलवाहिनीचे काम पूर्ण करत या योजनेचे शंभर टक्के काम पूर्ण झाल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले. येत्या मंगळवारपासून या योजनेतून प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याच्या चाचणीस सुरवात होईल. दहा दिवस ही चाचणी होणार आहे.

---

आम्ही दिलेला शब्द पूर्ण केला

विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघाचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीला या योजनेचे काम आणि दिलेली आश्वासनपूर्ती होत आहे याचा आनंद होत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला.

- सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी