शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

महिला सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:51 IST

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला सुरक्षा समितीने महिला आणि मुलींसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असुरक्षित ५० ‘हॉट्स पॉइंट्स’ असल्याचा अहवाल दिला होता.

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला सुरक्षा समितीने महिला आणिमुलींसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असुरक्षित ५० ‘हॉट्स पॉइंट्स’ असल्याचा अहवाल दिला होता. या अहवालाकडे पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि महावितरण अशा सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष झाले असून, यंत्रणांच्या उदासीनतेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महिला छेडछाड, रोडरोमिओंचा सहन करावा लागणारा त्रास, पाठलाग, एकतर्फी प्रेमामधून होणारी छळवणूक अशा एक ना अनेक समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. त्यामधून होणाºया मानसिक त्रासामधून अनेक मुली आणि महिलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे ताजी आहेत. आजही शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, बसथांबे, गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणांवर महिलांना ‘ईव्ह टिसिंग’चा सामना करावा लागतो. या छेडछाडीचा सामना कसा करायचा, पोलिसांची मदत कशी घ्यायची, यासोबतच स्वसंरक्षण कसे करावे यासाठी पोलिसांनी शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासमधील मुलींशी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, हा संवाद काही दिवसच चालला.पोलिसांच्या दृष्टीने यातील ‘हॉट पॉइंट्स’वर विशेष लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी गस्त वाढवणे, गर्दीच्या वेळी, सकाळी आणि संध्याकाळी पोलिसांचा या भागात वावर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही दिवस चाललेले पोलिसांचे हे सोपस्कार नंतर बंद पडले. जाता येता कधीतरी एखादी चक्कर मारली म्हणजे झाले, अशी भूमिका सध्या पोलिसांनी घेतल्याचे चित्र आहे. बागेमध्ये, टेकड्यांवर अंधारात बसणे, निर्जनस्थळी जाणे जोडप्यांसाठी धोकादायक असून, कोणताही गैरप्रकार घडण्याची शक्यता असते अशा ठिकाणांवर पोलिसांनी गस्त घालणे, त्यांना हटकणे आवश्यक आहे.संवेदनशील ठिंकाणांवर हवे लक्षशाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बागा, गल्लीबोळ, बाजार, क्लासेस, बसथांबे, धार्मिक स्थळे, महत्त्वाचे रस्ते आणि खाऊ गल्ल्या आदी ठिकाणांची पाहणी केल्यानंतर महिला सुरक्षा समितीने काही निष्कर्ष काढले होते.संवेदनशील ठिकाणांची यादी चारही परिमंडलांच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आली होती. या यादीमध्ये यापूर्वी महिला छेडछाड अथवा गैरप्रकार घडलेल्या ठिकाणांचाही समावेश करण्यात आला होता.काय होती महत्त्वाची कामे?1 ज्या रस्त्यांवर कमी प्रकाश आहे, तेथील प्रकाश व्यवस्था वाढवणे, पदपथ सुरक्षित करून घेणे, भुयारी मार्गांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे.2 सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दारे खिडक्या व्यवस्थित असणे, तसेच तेथेही प्रकाशव्यवस्था चोख असणे अशी कामे मुख्यत्वे करून पालिका, महावितरण आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून एकत्रितपणे करणे3 पालिकेची स्वच्छतागृहे, पथदिवे, भुयारी मार्ग, रात्रीच्या वेळी बागांमधली सुरक्षा आणि प्रकाश व्यवस्था पोलिसांनी तपासणे. बागेमध्ये, टेकड्यांवर अंधारात बसणे, निर्जनस्थळी जाणे धोकादायक, त्यांना हटकणे.महापालिका आणि महावितरणच्या मदतीने ज्या रस्त्यांवर कमी प्रकाश आहे, तेथील प्रकाश व्यवस्था वाढवणे, पदपथ सुरक्षित करून घेणे, भुयारी मार्गांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दारे-खिडक्या व्यवस्थित असणे, तसेच तेथेही प्रकाशव्यवस्था चोख असणे अशी कामे करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यासाठी महिला सुरक्षा समितीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पोलीस अधिकाºयांसह महापालिका, महावितरण आणि पीडब्ल्यूडीच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला होता. या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांचा बोजवारा उडाला आहे. या समितीची दर महिन्याला बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र, या बैठकाच बंद पडल्या आहेत. ही समितीही विखुरली असून याबाबत ना कोणाला गांभीर्य आहे ना खंत.उपाययोजनेकडे दुर्लक्ष!या समितीमार्फत शहरातील भुयारी मार्ग, उड्डाणपूल, निर्जन स्थळे, बागा या ठिकाणी असणाºया सुरक्षेची नियमित पाहणी करण्यात येत होती. या ठिकाणी असणाºया विजेची उपलब्धता, सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे यांची उपलब्धता पाहून त्यावर वेळोवेळी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. शहरातील महिलांसाठी सुरक्षित नसलेल्या ठिकाणांचीही पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे तसेच शहरातील रस्त्यांवरील, इतर सर्व ठिकाणचे वातावरण सुरक्षित व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निकष पाळले जात नाहीत.महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभागातील अधिकाºयांची संयुक्त महिला सुरक्षा समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार, ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या दर महिन्याला बैठका होत होत्या. शहरातील विविध रस्ते, स्वच्छतागृहे, बसथांबे आदी ठिकाणांची पाहणी करून तेथे संबंधित विभागाकडून दुरुस्तीची कामे केली जात होती. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून या समितीच्या बैठका बंद पडल्या आहेत.ही होती ‘ती’ संवेदनशील ठिकाणेजिजामाता महाविद्यालय, शुक्रवार पेठआरसीएम गुजराथी हायस्कूलएसीसी क्लासेस, कसबा पेठएस. पी. महाविद्यालयभारत इंग्लिश स्कूलफर्ग्युसन महाविद्यालयएसएनडीटी कॉलेजआपटे हायस्कूलएमआयटी कॉलेज परिसरस्वानंद रोड ते कर्वे चौक बसथांबाकमिन्स कॉलेज ते कर्वे चौकआझम कॅम्पसएम. जी. रस्तापुणे स्टेशन परिसरदस्तूर मेहेर हायस्कूलएस. व्ही. युनियन हायस्कूलसारसबागमुक्तांगण शाळाअरण्येश्वरशाहू कॉलेजभारती विद्यापीठ कॅम्पस व आजूबाजूचा परिसरबिबवेवाडी कॉर्नरमहेश सोसायटीआनंदनगरसिम्बायोसिस कॉलेजहिंजवडीशिवार गार्डन काळेवाडीनृसिंह हायस्कूल, सांगवीकृष्णा बाजार चौक, नवी सांगवीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठडी. ए. व्ही. स्कूल औंधसूस खिंड टेकडीडी. वाय. पाटील महाविद्यालय संत तुकारामनगरशगुन चौक पिंपरीभक्तिशक्ती चौक निगडीफत्तेचंद जैन हायस्कूल चिंचवडपीएमटी बसथांबा चौक चिंचवडशाहूनगरस्वामी विवेकानंदनगर दापोडीपीएमटी चौक भोसरीखडकी बाजारआलेगावकर शाळाभैरवनगरगायकवाडनगर व ज्युनिअर कॉलेज परिसरमोझे शाळाएमआयटी कॉलेज देहूफाटागेनबा मोझे शाळानेताजी हायस्कूल प्रतीकनगरसिम्बायोसिस कॉलेज परिसरफिनिक्स मॉल परिसरदेसरडा क्लासेसआनंदबागसुंदरबाई मराठी शाळातुकाराम पठारे विद्यालयचंदननगर