शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

महिला स्वीकार केंद्रातील मुलीचा ‘बालविवाह’

By admin | Updated: October 23, 2014 05:05 IST

शहरातील शासकीय महिला स्वीकार केंद्रातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्या प्रकरणी अधिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बारामती : शहरातील शासकीय महिला स्वीकार केंद्रातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्या प्रकरणी अधिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीचा धमकी देऊन विवाह लावल्याची तक्रार केली आहे. तक्रारदार हिरालाल गेणबापू कदम यांनी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. त्यानुसार येथील महिला स्वीकार केंद्राच्या अधिक्षिका लता वसंतराव राठोड यांनी संबंधित अल्पवयीन मुलीचा तिच्या मनाच्या विरोधात विवाह लावला. ‘तुझी दुसऱ्या संस्थेत बदली करेन’ अशी धमकी देऊन जबरदस्तीने तसेच प्रलोभन दाखून हा विवाह लावण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या विवाहासाठी अधिक्षिका राठोड यांनी महिला व बालविकास आयुक्तांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २४ जानेवारी २०११ रोजी या मुलीचा गुणवडी (ता. बारामती) येथील रामभाऊ मोतीराम चौगुले याच्याबरोबर विवाह लावला होता. मात्र, हा विवाह अयशस्वी झाला. त्यामुळे ही मुलगी ५ आॅक्टोबर २०१३ रोजी बारामतीच्या महिला स्वीकार केंद्रात आश्रयासाठी पुन्हा दाखल झाली आहे. या मुलीची रेकॉर्डनुसार १९ एप्रिल १९९५ आहे. विवाहाच्या वेळी तिचे वय १५ वर्ष ९ महिने ५ दिवस होते. तिचे अल्पवय असताना देखील अधिक्षिका राठोड यांनी जबरदस्ती करून धमकी देऊन तिचा बालविवाह लावला.