शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सक्षम बनण्यासाठी महिलांनी प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:10 IST

नारायणगाव : महिलांना सक्षम बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत फळ व भाजीपला प्रक्रिया प्रकल्पांतर्गत टोमॅटो केचप, द्राक्ष, डाळिंब, जांभळापासून ज्यूस ...

नारायणगाव : महिलांना सक्षम बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत फळ व भाजीपला प्रक्रिया प्रकल्पांतर्गत टोमॅटो केचप, द्राक्ष, डाळिंब, जांभळापासून ज्यूस बनविणे, सीताफळापासून पल्प काढणे, आंबा, लिंबू, करोंदा यापासून लोणचे बनविण्याची प्रशिक्षणे गृह विभागाच्या माध्यमातून महिलांना दिले जाते, त्याचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांनी केले.

ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, आयटीसी मिशन सुनहरा कल व आत्मा कृषी विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे महिला कृषी उद्योजकता, इक्विटी आणि महिला सबलीकरणमधील महिलांचे नेतृत्व आणि कोरोनाजगात महिलांचे समान भविष्य साध्य करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, राजश्री बोरकर, राजाश्री बेनके, आयटीसी मिशन सुनहरा कलचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश पोळ, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, मंडळ कृषी अधिकारी प्रमोद बंकर, शीतल ठुसे, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, वारुळवाडी ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कांकरिया, प्रियांका शेळके आदी मान्यवर , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साबळे म्हणाले की, महिलांकरिता व्यवसायाच्या अनेक वाटा समोर आहे, एक जिल्हा-एक उत्पादन प्रकल्पांतर्गत शेतकरी महिलांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसाय उभारावे, असे आवाहन केले. तसेच स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत महिलांनी विविध बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे भांडवल, मार्केटिंग व जाहिरात व्यवस्थेकरिता मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होऊ शकते तसेच आत्मा अंतर्गत राबवत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती दिली.

सामाजिक कार्यकर्त्या शीतल ठुसे यांनी महिलांनी आर्थिक, सामाजिक व मानसिक सक्षम झाले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.

जुन्नर शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या संचालिका प्रियंका जुन्नरकर शेळके यांनी महिलांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी उपस्थित महिलांना दिली.

कार्यक्रम प्रसंगी आंतरराष्ट्रीय वॉटर कप स्पर्धेत जुन्नरमधील चॅम्पियनशिप मिळवलेल्या उज्ज्वला घाडगे आणि कांचन जाधव या महिलांचा केंद्रातर्फे गौरव करण्यात आला. घाडगे व जाधव यांनी पाण्याचे व्यवस्थापन व पाण्याची बचत याविषयी आपले अनुभव सांगितले.

प्रास्ताविक प्रशांत शेटे यांनी केले, तर सूत्रसंचालन निवेदिता शेटे, राहुल घाडगे यांनी केले. प्रशांत साळवे यांनी आभार मानले.