शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

सक्षम बनण्यासाठी महिलांनी प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:10 IST

नारायणगाव : महिलांना सक्षम बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत फळ व भाजीपला प्रक्रिया प्रकल्पांतर्गत टोमॅटो केचप, द्राक्ष, डाळिंब, जांभळापासून ज्यूस ...

नारायणगाव : महिलांना सक्षम बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत फळ व भाजीपला प्रक्रिया प्रकल्पांतर्गत टोमॅटो केचप, द्राक्ष, डाळिंब, जांभळापासून ज्यूस बनविणे, सीताफळापासून पल्प काढणे, आंबा, लिंबू, करोंदा यापासून लोणचे बनविण्याची प्रशिक्षणे गृह विभागाच्या माध्यमातून महिलांना दिले जाते, त्याचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांनी केले.

ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, आयटीसी मिशन सुनहरा कल व आत्मा कृषी विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे महिला कृषी उद्योजकता, इक्विटी आणि महिला सबलीकरणमधील महिलांचे नेतृत्व आणि कोरोनाजगात महिलांचे समान भविष्य साध्य करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, राजश्री बोरकर, राजाश्री बेनके, आयटीसी मिशन सुनहरा कलचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश पोळ, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, मंडळ कृषी अधिकारी प्रमोद बंकर, शीतल ठुसे, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, वारुळवाडी ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कांकरिया, प्रियांका शेळके आदी मान्यवर , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साबळे म्हणाले की, महिलांकरिता व्यवसायाच्या अनेक वाटा समोर आहे, एक जिल्हा-एक उत्पादन प्रकल्पांतर्गत शेतकरी महिलांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसाय उभारावे, असे आवाहन केले. तसेच स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत महिलांनी विविध बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे भांडवल, मार्केटिंग व जाहिरात व्यवस्थेकरिता मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होऊ शकते तसेच आत्मा अंतर्गत राबवत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती दिली.

सामाजिक कार्यकर्त्या शीतल ठुसे यांनी महिलांनी आर्थिक, सामाजिक व मानसिक सक्षम झाले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.

जुन्नर शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या संचालिका प्रियंका जुन्नरकर शेळके यांनी महिलांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी उपस्थित महिलांना दिली.

कार्यक्रम प्रसंगी आंतरराष्ट्रीय वॉटर कप स्पर्धेत जुन्नरमधील चॅम्पियनशिप मिळवलेल्या उज्ज्वला घाडगे आणि कांचन जाधव या महिलांचा केंद्रातर्फे गौरव करण्यात आला. घाडगे व जाधव यांनी पाण्याचे व्यवस्थापन व पाण्याची बचत याविषयी आपले अनुभव सांगितले.

प्रास्ताविक प्रशांत शेटे यांनी केले, तर सूत्रसंचालन निवेदिता शेटे, राहुल घाडगे यांनी केले. प्रशांत साळवे यांनी आभार मानले.