शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम बनण्यासाठी महिलांनी प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:10 IST

नारायणगाव : महिलांना सक्षम बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत फळ व भाजीपला प्रक्रिया प्रकल्पांतर्गत टोमॅटो केचप, द्राक्ष, डाळिंब, जांभळापासून ज्यूस ...

नारायणगाव : महिलांना सक्षम बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत फळ व भाजीपला प्रक्रिया प्रकल्पांतर्गत टोमॅटो केचप, द्राक्ष, डाळिंब, जांभळापासून ज्यूस बनविणे, सीताफळापासून पल्प काढणे, आंबा, लिंबू, करोंदा यापासून लोणचे बनविण्याची प्रशिक्षणे गृह विभागाच्या माध्यमातून महिलांना दिले जाते, त्याचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांनी केले.

ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, आयटीसी मिशन सुनहरा कल व आत्मा कृषी विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे महिला कृषी उद्योजकता, इक्विटी आणि महिला सबलीकरणमधील महिलांचे नेतृत्व आणि कोरोनाजगात महिलांचे समान भविष्य साध्य करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, राजश्री बोरकर, राजाश्री बेनके, आयटीसी मिशन सुनहरा कलचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश पोळ, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, मंडळ कृषी अधिकारी प्रमोद बंकर, शीतल ठुसे, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, वारुळवाडी ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कांकरिया, प्रियांका शेळके आदी मान्यवर , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साबळे म्हणाले की, महिलांकरिता व्यवसायाच्या अनेक वाटा समोर आहे, एक जिल्हा-एक उत्पादन प्रकल्पांतर्गत शेतकरी महिलांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसाय उभारावे, असे आवाहन केले. तसेच स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत महिलांनी विविध बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे भांडवल, मार्केटिंग व जाहिरात व्यवस्थेकरिता मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होऊ शकते तसेच आत्मा अंतर्गत राबवत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती दिली.

सामाजिक कार्यकर्त्या शीतल ठुसे यांनी महिलांनी आर्थिक, सामाजिक व मानसिक सक्षम झाले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.

जुन्नर शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या संचालिका प्रियंका जुन्नरकर शेळके यांनी महिलांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी उपस्थित महिलांना दिली.

कार्यक्रम प्रसंगी आंतरराष्ट्रीय वॉटर कप स्पर्धेत जुन्नरमधील चॅम्पियनशिप मिळवलेल्या उज्ज्वला घाडगे आणि कांचन जाधव या महिलांचा केंद्रातर्फे गौरव करण्यात आला. घाडगे व जाधव यांनी पाण्याचे व्यवस्थापन व पाण्याची बचत याविषयी आपले अनुभव सांगितले.

प्रास्ताविक प्रशांत शेटे यांनी केले, तर सूत्रसंचालन निवेदिता शेटे, राहुल घाडगे यांनी केले. प्रशांत साळवे यांनी आभार मानले.