शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

दुस-यांना श्रेय देते ती स्त्री

By admin | Updated: December 22, 2014 05:22 IST

भारतीय स्त्री ही उदात्त विचारांची आहे. कुटुंबावर कितीही दु:खे आली तरी ते पेलत प्रत्येक स्त्री आपल्या मुलांना, कुटुंबाला घडवते आणि त्याचा तिला गर्व नसतो

पुणे : भारतीय स्त्री ही उदात्त विचारांची आहे. कुटुंबावर कितीही दु:खे आली तरी ते पेलत प्रत्येक स्त्री आपल्या मुलांना, कुटुंबाला घडवते आणि त्याचा तिला गर्व नसतो. मुले-कुटुंब यशाच्या शिखरावर गेली, की मी काही नाही केले, असे भाबडेपणाने सांगते. दुसऱ्यांना श्रेय देते ती खरी स्त्री असते, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.इंदुमती बनसीलाल संचेती यांच्या स्मरणार्थ संचेती ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श माता पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार चेनसुख संचेती, माधुरी मिसाळ, नगरसेवक अ‍ॅड. अभय छाजेड, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, अखिल भारतीय श्वेतांबर जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा रेणू जैन, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती, विजय भंडारी, कांतिलाल जैन, वालचंद खरवड, विमल बाफना, प्रमिला सांकला, संचेती ट्रस्टचे अध्यक्ष अभय संचेती आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कंचनबाई बुरड व जयाबाई नहार यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ सत्यनारायण म्हणाल्या, आजच्या काळात काम करणाऱ्या महिलांचा बोलबाला आहे. पण ज्या महिला घरी राहून कुटुंब उभे करतात, पिढ्या घडवितात त्यांच्याकडेही लक्ष द्यायला हवे, अशा स्त्रियांचा सन्मान होणे गरजेचे आहे.चेनसुख संचेती म्हणाले, आईच्या प्रेमाची तुलना होऊच शकत नाही. आईचे प्रेम, वडिलांचा सल्ला आणि भावंडांची काळजी या तिन्ही गोष्टींवर लक्ष देणारे कुटुंब सुदृढ बनते. मिसाळ म्हणाल्या, मुलांच्या जडणघडणीत वडिलांचाही हातभार असतो. त्यामुळे त्यांचाही सन्मान व्हायला हवा. अभय छाजेड म्हणाले, थोर व्यक्तींच्या नावे दिले जाणारे पुरस्कार समाजाला दिशा दाखविण्याचे काम करतात. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. या वेळी संजय चोरडिया, शैलेश बाफना, पन्नालाल लुनावत आदींचा सत्कार करण्यात आला.