शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

बाईला सुरक्षितता देऊन तिचा सन्मान हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST

दिल्लीमध्ये २०१२ मध्ये ‘निर्भया’ची घटना घडली. त्यानंतर शासनापासून विविध संघटनांपर्यंत बलात्काऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशा मागण्यांनी जोर ...

दिल्लीमध्ये २०१२ मध्ये ‘निर्भया’ची घटना घडली. त्यानंतर शासनापासून विविध संघटनांपर्यंत बलात्काऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशा मागण्यांनी जोर धरला. पण तरीही बलात्काराचे प्रमाण कुठंही कमी झालेले दिसले नाही. आजही देशात २५ मिनिटाला एका महिलेवर बलात्कार होतो. प्रत्येक राज्यात वेगवेगळी अवस्था आहे. हाथरसची घटना घडल्यानंतर त्या मुलीला पोलिसांनीच मारून टाकले. मन हेलावून टाकणाऱ्या अशा अनेक घटना घडतात, त्याची नुसतीच चर्चा होते. मग एकदम घटना गायब झाल्यासारख्या होतात. त्या त्या राज्यात जे सांस्कृतिक वातावरण असते, त्याच्याशी या घटनांचे धागे जोडलेले असतात. कुणी रिक्षावाला काय, कुणी रेल्वे कर्मचारी काय, व्यक्ती फक्त बदलत असतात, पण त्यांची मानसिकता बदलत नाही. चौदा वर्षांची मुलगी घराबाहेर का पडली? तिला गावाकडे जायचे काय कारण होते? असे मुद्दे आपण उपस्थित करू शकत नाही. कारण मुलींना सुरक्षितता असलीच पाहिजे, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. कितीतरी वेळा त्या पीडित मुलीशी त्या व्यक्तीचा जात किंवा व्यवस्थेशी रूढार्थाने काहीही संबंध नसतो. केवळ एक पुरुषी अहंकार असतो. जो त्याच्या आसपासच्या वातावरण किंवा संस्कृतीमधून त्याच्यात झिरपत आलेला असतो. ग्रामीण किंवा ओळखीचे पुरूष जेव्हा महिलेवर बलात्कार करतात, तेव्हा त्यांच्यात एकप्रकारचा न्यूनगंड असतो. बिहारमध्ये घडलेल्या एका घटनेत तरुणी एका स्वयंसेवी संस्थेमध्ये जात होती. तिच्यावर सूड पद्धतीने बलात्कार करण्यात आला. यामध्ये तिला मदत करणाऱ्याला दोषी ठरवून त्याच्यासह त्या बलात्कार पीडितेला न्यायालयाने शिक्षा दिली आणि त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली. आपली न्याय यंत्रणादेखील अशा प्रकारे अन्याय करते. आपल्याकडे बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे मोर्चेही काढले जातात. बलात्कार आम्ही नाकारतो. बाईचा सन्मान व्हायला हवा. बाईला सुरक्षितता हवी. माणसाला शिक्षण, आरोग्य, नोकरीची हमी यामधून एक आत्मसन्मान मिळतो, मात्र या सर्व गोष्टी ओरबाडून न्यायव्यवस्थेद्वारे कचऱ्यात गेल्या आहेत.

------------