शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बाईला सुरक्षितता देऊन तिचा सन्मान हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST

दिल्लीमध्ये २०१२ मध्ये ‘निर्भया’ची घटना घडली. त्यानंतर शासनापासून विविध संघटनांपर्यंत बलात्काऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशा मागण्यांनी जोर ...

दिल्लीमध्ये २०१२ मध्ये ‘निर्भया’ची घटना घडली. त्यानंतर शासनापासून विविध संघटनांपर्यंत बलात्काऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशा मागण्यांनी जोर धरला. पण तरीही बलात्काराचे प्रमाण कुठंही कमी झालेले दिसले नाही. आजही देशात २५ मिनिटाला एका महिलेवर बलात्कार होतो. प्रत्येक राज्यात वेगवेगळी अवस्था आहे. हाथरसची घटना घडल्यानंतर त्या मुलीला पोलिसांनीच मारून टाकले. मन हेलावून टाकणाऱ्या अशा अनेक घटना घडतात, त्याची नुसतीच चर्चा होते. मग एकदम घटना गायब झाल्यासारख्या होतात. त्या त्या राज्यात जे सांस्कृतिक वातावरण असते, त्याच्याशी या घटनांचे धागे जोडलेले असतात. कुणी रिक्षावाला काय, कुणी रेल्वे कर्मचारी काय, व्यक्ती फक्त बदलत असतात, पण त्यांची मानसिकता बदलत नाही. चौदा वर्षांची मुलगी घराबाहेर का पडली? तिला गावाकडे जायचे काय कारण होते? असे मुद्दे आपण उपस्थित करू शकत नाही. कारण मुलींना सुरक्षितता असलीच पाहिजे, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. कितीतरी वेळा त्या पीडित मुलीशी त्या व्यक्तीचा जात किंवा व्यवस्थेशी रूढार्थाने काहीही संबंध नसतो. केवळ एक पुरुषी अहंकार असतो. जो त्याच्या आसपासच्या वातावरण किंवा संस्कृतीमधून त्याच्यात झिरपत आलेला असतो. ग्रामीण किंवा ओळखीचे पुरूष जेव्हा महिलेवर बलात्कार करतात, तेव्हा त्यांच्यात एकप्रकारचा न्यूनगंड असतो. बिहारमध्ये घडलेल्या एका घटनेत तरुणी एका स्वयंसेवी संस्थेमध्ये जात होती. तिच्यावर सूड पद्धतीने बलात्कार करण्यात आला. यामध्ये तिला मदत करणाऱ्याला दोषी ठरवून त्याच्यासह त्या बलात्कार पीडितेला न्यायालयाने शिक्षा दिली आणि त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली. आपली न्याय यंत्रणादेखील अशा प्रकारे अन्याय करते. आपल्याकडे बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे मोर्चेही काढले जातात. बलात्कार आम्ही नाकारतो. बाईचा सन्मान व्हायला हवा. बाईला सुरक्षितता हवी. माणसाला शिक्षण, आरोग्य, नोकरीची हमी यामधून एक आत्मसन्मान मिळतो, मात्र या सर्व गोष्टी ओरबाडून न्यायव्यवस्थेद्वारे कचऱ्यात गेल्या आहेत.

------------