शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

बारामतीत वाळूमाफियांचे गुंडाराज

By admin | Updated: May 26, 2015 23:16 IST

नीरा नदीच्या पात्रातील वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी आता बंधाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफियांचे नदी क्षेत्रामध्ये गुंडाराज सुरू आहे.

बारामती : नीरा नदीच्या पात्रातील वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी आता बंधाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफियांचे नदी क्षेत्रामध्ये गुंडाराज सुरू आहे. कांबळेश्वर (ता. बारामती) येथे वाळू काढण्यात बंधाऱ्यातील पाण्याचा अडसर होत असल्याने, वाळूमाफियांनी चक्क सुरुंगाद्वारे बंधाऱ्याचे दोन गाळेच उद्ध्वस्त केले. सोमवारी (दि. २५) रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. जिलेटिनचा वापर करून स्फोट घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुरुंगाच्या आवाजाने परिसरातील शेतकरी, पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली तेव्हा हा प्रकार लक्षात आला. कांबळेश्वर येथील नीरा नदीवरील बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्यावर परिसरातील गावांच्या पाणी योजना, हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येथील पाणीसाठा उपयुक्त ठरत आहे. मात्र, या भागात वाळूमाफियांचा हैदोस सुरू आहे. राजरोसपणे येथून बेसुमार वाळूउपसा होत असतो. स्थानिक महसूल विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांकडे याबाबत येथील ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफियांचे धाडस वाढले आहे. कांबळेश्वर येथील बंधाऱ्यातील वाळू काढण्यासाठी बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्याचा अडसर होत असल्याने वाळूमाफियांनी सुरुंगाद्वारे बंधाऱ्याचे दोन गाळे उद्ध्वस्त केले. त्याचप्रमाणे आणखी एका गाळ्याचा तळातील ढापाही सुरुंगाद्वारे फोडला. त्यामुळे बंधाऱ्यातील लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाळूमाफियांच्या मुजोरीमुळे पाणी वाया गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकाराची माहिती रात्रपाळीवर काम करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना कळवली. मंगळवारी (दि. २६) सकाळी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी बंधाऱ्याची पाहणी केली. तसेच घडलेल्या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी या वेळी सांगितले. (प्रतिनीधी)४बारामती-इंदापूर परिसरातील नदी क्षेत्रामध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेसुमार अवैध वाळूउपसा सुरू आहे. रात्रंदिवस अवजड वाहनांमधून वाळूची बेकायदा वाहतूक होत असते. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ४नदीकाठच्या शेतकऱ्यांना नेहमीच वाळूमाफियांच्या अरेरावीचा सामना करावा लागतो. नदीकाठच्या शेतातून रस्ते तयार करून चोरटी वाळूवाहतूक होत असते. याबाबत स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याने महसूल विभाग, पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ४वाळूउपसा गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. मात्र, नीरा नदीतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा केला जातो. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून नदी वाहत असल्यामुळे वाळूमाफियांचे फावते. या वाळूमाफियांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे.