शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

हिवाळी अधिवेशनामध्ये खंडपीठावर शिक्कामोर्तब व्हावे

By admin | Updated: December 7, 2015 00:20 IST

हिवाळी अधिवेशनामध्ये पुण्याला खंडपीठ मिळावे, यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा. अधिवेशनात याबाबत चर्चा करून पुण्याला खंडपीठ मिळण्याबाबत सरकारने ठराव करावा

पुणे : हिवाळी अधिवेशनामध्ये पुण्याला खंडपीठ मिळावे, यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा. अधिवेशनात याबाबत चर्चा करून पुण्याला खंडपीठ मिळण्याबाबत सरकारने ठराव करावा, अशी मागणी पुणे बार असोसिएशनने केली आहे. तसेच शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयातील सुरक्षाव्यवस्था, निधीअभावी रखडलेले कौटुंंबिक न्यायालयाचे काम असे विविध प्रश्नही मार्गी लावावेत, अशी असोसिएशनची मागणी आहे.पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यात यावे, ही वकिलांची व पुणेकर नागरिकांची खूप जुनी मागणी आहे. त्यासाठी गेली ३८ वर्षे अनेक वेळा आंदोलने झाली. या वर्षी जून महिन्यात सलग १६ दिवस संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये वकिलांनी कामबंद आंदोलन केले. विधी महाविद्यालयांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबविली. शहरांतील मुख्य चौकांमध्ये निदर्शने केली. मात्र, त्यानंतरही राज्य सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. मुंबईत झालेल्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठासाठी कोल्हापूरसह पुण्याच्या नावाचा ठरावही मुख्य न्यायमूर्तींकडे पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, यामध्येही कोल्हापूरला प्राधान्य देण्यात आले असल्याचे पुणे बार असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे म्हणाले, की मंत्रिमंडळाने केलेल्या ठरावामध्ये खंडपीठासाठी कोल्हापूरप्रमाणेच पुण्याचाही सकारात्मक विचार करावा, असे म्हटले आहे. त्यामध्ये स्पष्टपणे पुण्याला खंडपीठ द्यावे, असे नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये पुण्यातील लोकप्रतिनिधींनी खंडपीठाचा महत्त्वाचा विषय उपस्थित करायला हवा. पुण्यातील वाढत्या खटल्यांचे प्रमाण पाहता खंडपीठाची मागणी रास्त आहे. केवळ पाठिंबा देऊन चालणार नाही, तर अधिवेशनात त्यावर चर्चा घडवून आणावी. कोल्हापूरसह पुण्यात खंडपीठ देण्याचा ठराव अधिवेशनात करून तशी घोषणा करायला हवी. जिल्हा न्यायालयासमोर उभारण्यात येत असलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचे कामही निधीअभावी मागील दोन वर्षांपासून रखडली आहेत. इमारतीच्या पुढील कामासाठी सुमारे चार कोटी रुपयांची गरज असताना राज्य सरकारने केवळ एक लाख रुपये दिले होते. या उदासीनतेबाबतही लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून निधीचा प्रश्न मार्गी लावावा. सुरक्षाव्यवस्थेबाबतही दुर्लक्ष दिसते. सीसीटीव्ही बसविण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. पण हे प्रश्न गांभीर्याने घेतले जात नाहीत. अधिवेशनात यावर चर्चा होणे आवश्यक आहे, असे अ‍ॅड. शेडगे यांनी नमूद केले.