शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

By admin | Updated: April 22, 2015 05:38 IST

दिवसभरात डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांवरून परावर्तित होणाऱ्या उन्हाच्या झळा, त्यातच वाफेसारखा जाणवणारा उकाडा व सायंकाळी पावसापूर्वी

पिंपरी : दिवसभरात डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांवरून परावर्तित होणाऱ्या उन्हाच्या झळा, त्यातच वाफेसारखा जाणवणारा उकाडा व सायंकाळी पावसापूर्वी आलेले जोरदार वादळी वारे यामुळे मंगळवारचा दिवस पुन्हा अवकाळीचे भय दाटविणारा ठरला. निगडी, यमुनानगर, चिखली परिसरात गारांच्या वर्षावासह वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. शहरात इतरत्र व लगतच्या भागात पाऊस झाला. आठवड्यापासून परिसरात वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्याने सर्वांना हैराण केले आहे. अधूनमधून येणारे ढगाळ वातावरण, पण पाऊस पडत नसल्याने उकाड्याने सर्वांना बेचैन केले. मंगळवारी तर या विचित्र वातावरणाचा कळसच झाला. आजवर कधी न अनुभवास आलेल्या समुद्रसपाटीच्या दमट वातावरणाचा सामना करण्याची वेळ शहरवासीयांवर आली. एकीकडे घामाच्या धारा वाहण्यास भाग पाडणारा दमटपणा आणि आग ओकणाऱ्या सूर्यामुळे असह्य झालेल्या उन्हाच्या झळा यामुळे थोडा वेळही बाहेर थांबणे जेरीस आणत होते. दुपारनंतर दाटून आलेल्या काळ्या ढगांमुळे पाऊस होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. सायंकाळी ५ च्या सुमारास या कोंदट वातावरणातच जोरदार घालमेल सुरू झाली अन् अचानकच सर्वत्र सोसाट्याचा वारा सुटला. क्षणातच चक्राकार फिरणाऱ्या या वादळात धुळीचे लोट, पालापाचोळा मिसळला. सैरभैर उधळणाऱ्या पालापाचोळ्याची गत पाहून आता पावसाचे मोठे संकट पुढे ठाकल्याचे वाटू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे झुकत होती. निगडी येथे वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक जाहिरातफलकांचे नुकसान झाले आहे. धुळीच्या लोटासह वादळी वाऱ्याचे असे चित्र तेही शहर परिसरात बऱ्याच वर्षांनंतर दिसू लागल्याने प्रथमत: नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी जोरदार वादळी पावसाच्या भीतीने वेळीच सुरक्षितस्थळी पोहोचण्याची खबरदारी घेतली.थोड्या वेळातच निगडी, देहूरोड, तळवडे, चिखली, किन्हई या पट्ट्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. निगडी, प्राधिकरण भागात थोडा वेळ गारांसह पाऊस बरसला. सुटीचा आनंद लुटणाऱ्या शाळकरी मुलांनी गारा वेचून खाण्याची संधी दवडली नाही. तळवडे परिसराला पंधरा मिनिटांहून अधिक वेळ पावसाने झोडपून काढले. दिवसभर उन्हामुळे घरी बसलेले शेतकरी सायंकाळी ऊन उतरताच भाजीची तोडणी करण्यास शेतामध्ये गेले. मात्र त्याच वेळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतमालाची तोडणी न करताच माघारी फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली. वारंवार होणाऱ्या पावसाला वैतागून अनेक वीटभट्टी व्यावसायिकांनी कोणत्याही उपाययोजना करण्याचे टाळून विटांना पावसाच्या हवाली केल्याचा प्रत्यय या परिसरात आला. खरेदीदारांची निराशाअक्षय्य तृतीया असल्याने मंगळवारी अनेकजण सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडले होत. मात्र नेमका याच वेळी पाऊस सुरू झाल्याने अनेकजणांना खरेदी करणे शक्य झाले नाही. काही जणांनी पाऊस थांबल्यावरच बाहेर पडणे पसंत केले.(प्रतिनिधी)