शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांनी उत्तरेतील थंडी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तर भारत, मध्य प्रदेश, राजस्थान, कच्छ या परिसरात थंडीची लाट आली असताना महाराष्ट्रातील मध्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उत्तर भारत, मध्य प्रदेश, राजस्थान, कच्छ या परिसरात थंडीची लाट आली असताना महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुताश भागातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक दिसून येत आहे. याला कारण प्रामुख्याने देशात सध्या दिसून येत आलेले ॲन्टी सायक्लोनमुळे उत्तर ऐवजी पूर्वेकडून येणारे वारे होय. सध्या राज्यात बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे आंध्र प्रदेश, तेलंगणा मार्गे राज्यात येत आहे. त्यामुळे उत्तरेकडील वारे मध्य प्रदेशपर्यंतच रोखले गेले आहे. त्याचा परिणाम मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेली आहे. त्याचवेळी लगतच्या विदर्भातील किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तसेच गुजरात, कच्छ, राजस्थान परिसरात उत्तरेकडील वारे येत असल्याने तेथील किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. अबु येथे उणे ४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली घसरले आहे.

याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे येत असेल तर त्या राज्यात कडाक्याची थंडी येते. सध्या पूर्वेकडून दक्षिणेकडे वारे वाहत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे वाटेत अडविले जात आहे. थंड वार्यांबरोबरच सूर्याची उष्णता आणि परिसरातील हिरवे आच्छादन याचाही परिणाम तापमानावर होत असतो. उत्तरेकडील थंड वारे आपल्यापर्यंत पोहचत नसल्याने त्याचा परिणाम राज्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत नाही. त्यामुळे सध्या उबदार वातावरण राज्यातील बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. ही स्थिती अजून ४ ते ५ दिवस राहण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे.

३१ डिसेंबर रोजी कोकण,गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.