शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांनी उत्तरेतील थंडी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तर भारत, मध्य प्रदेश, राजस्थान, कच्छ या परिसरात थंडीची लाट आली असताना महाराष्ट्रातील मध्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उत्तर भारत, मध्य प्रदेश, राजस्थान, कच्छ या परिसरात थंडीची लाट आली असताना महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुताश भागातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक दिसून येत आहे. याला कारण प्रामुख्याने देशात सध्या दिसून येत आलेले ॲन्टी सायक्लोनमुळे उत्तर ऐवजी पूर्वेकडून येणारे वारे होय. सध्या राज्यात बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे आंध्र प्रदेश, तेलंगणा मार्गे राज्यात येत आहे. त्यामुळे उत्तरेकडील वारे मध्य प्रदेशपर्यंतच रोखले गेले आहे. त्याचा परिणाम मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेली आहे. त्याचवेळी लगतच्या विदर्भातील किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तसेच गुजरात, कच्छ, राजस्थान परिसरात उत्तरेकडील वारे येत असल्याने तेथील किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. अबु येथे उणे ४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली घसरले आहे.

याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे येत असेल तर त्या राज्यात कडाक्याची थंडी येते. सध्या पूर्वेकडून दक्षिणेकडे वारे वाहत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे वाटेत अडविले जात आहे. थंड वार्यांबरोबरच सूर्याची उष्णता आणि परिसरातील हिरवे आच्छादन याचाही परिणाम तापमानावर होत असतो. उत्तरेकडील थंड वारे आपल्यापर्यंत पोहचत नसल्याने त्याचा परिणाम राज्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत नाही. त्यामुळे सध्या उबदार वातावरण राज्यातील बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. ही स्थिती अजून ४ ते ५ दिवस राहण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे.

३१ डिसेंबर रोजी कोकण,गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.