शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भिगवण ठाण्याला इमारत मिळणार का?

By admin | Updated: July 12, 2016 01:50 IST

जंक्शन (वालचंदनगर) पोलीस ठाण्यातून दोन वर्षांपूर्वी विभाजन करण्यात आलेल्या भिगवण पोलीस ठाण्याला ‘कोणी हक्काची जागा, इमारत देताय का...?’

भिगवण : जंक्शन (वालचंदनगर) पोलीस ठाण्यातून दोन वर्षांपूर्वी विभाजन करण्यात आलेल्या भिगवण पोलीस ठाण्याला ‘कोणी हक्काची जागा, इमारत देताय का...?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. १५ गावे आणि ३५ वाड्यावस्त्यांचा कारभार सध्या पूर्वीच्या दूरक्षेत्र पोलीस चौकीतूनच करावा लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना करावा लागतो. पोलीस ठाण्याला तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी; त्याचबरोबर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची सोय झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. दोन वर्षांपूर्वी भिगवणला नव्या पोलीस ठाण्याला मान्यता मिळाली; परंतु पोलीस ठाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांकडेच दुर्लक्ष झाले. भिगवण तसे संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर या ठाण्याअंतर्गत १५ गावे, ३५ वाड्या येतात. कार्यभार मोठा आहे. सध्या ५० पोलीस कर्मचारी या ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांतील काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. उर्वरित पोलिसांच्या जिवावर कायदा-सुव्यवस्था राखावी लागते. महामार्गावरील मोठे गाव, बाजारपेठ असल्यामुळे भिगवणला आसपासच्या गावांसह सोलापूर, नगर या जिल्ह्यांतील नागरिकांचीदेखील रेलचेल असते. भिगवणची लोकसंख्या ११ हजारांहून अधिक आहे. याच परिसरात शैक्षणिक संकुलांची उभारणी झाल्यामुळे शिक्षणासाठी अन्य तालुका, जिल्ह्यातून आलेल्यांची संख्या १५ ते २० हजार इतकी आहे. जातीय सलोखा राखण्याबरोबरच महामार्गावरील अतिक्रमण रोखण्यासह अन्य कामे पोलिसांकडेच आहेत. भिगवणला २३ आॅगस्ट २०१४ रोजी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच इमारतदेखील बांधण्यात येईल, असे सांगितले. मात्र, सध्या पूर्वीच्याच चौकीत कामकाज सुरू आहे. ५० पोलीस कर्मचारी, २ अधिकाऱ्यांना १० बाय १५च्या खोलीतून कारभार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सततचे अपघात, राजकीय नेत्यांचे दौरे आदींचा ताण पोलिसांवर असतोच; मात्र किमान रात्रीच्या वेळी काही वेळ आराम करण्यासाठीदेखील सोय नाही. त्यामुळे पोलिसांच्या मानसिक तणावात वाढ होते. (वार्ताहर)