शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

...तर राज्यात उद्योग येतील का ? - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2016 03:05 IST

पावसाळा संपताच सरकारने पाण्याचे नियोजन करायला हवे होते; पण राज्यकर्ते परतीच्या पावसावर विसंबून राहिले. आता लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला, याची जाहिरात केली जाते

पुणे : पावसाळा संपताच सरकारने पाण्याचे नियोजन करायला हवे होते; पण राज्यकर्ते परतीच्या पावसावर विसंबून राहिले. आता लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला, याची जाहिरात केली जाते, हे काय भूषणावह आहे का, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. बिअर उद्योगाचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी द्यावे लागते म्हणून विरोध केला की, आम्ही मद्यनिर्मितीच्या विरोधात आहोत, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. पाणी आणि जमीन याच्या जोरावरच राज्यामध्ये उद्योग वाढतात. मग या दोन्ही गोष्टी नाहीत म्हणून सरकारला राज्याला प्रगतिपथावर न्यायचे आहे की, राज्यामध्ये औद्योगीकरण होऊ नये यासाठीचे हे डावपेच आहेत याबाबत सरकाने आधी स्पष्ट करावे, अशी टीकाही त्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली. सरकारवर टीकेची झोड उठविणाऱ्या चव्हाण यांनी आदर्श प्रकरणाबाबत बोलणार नसल्याचे सांगितले.चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यामध्ये सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. ‘राज्य दुष्काळमुक्त करु’ असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे कोणती जादूची कांडी आहे माहीत नाही, असा टोला लगावत अशाने राज्यात उद्योग येतील का?’’ असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केलेल्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीबाबत चव्हाण यांनी भाष्य केले. ते म्हणाले, स्वतंत्र होऊन विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिची चांगली होणार आहे का, स्वतंत्र झाल्याने तेथील विकास होणार आहे का, आणि दरडोई उत्पन्नामध्ये भर पडणार आहे का, हे आधी समजून दिले पाहिजे. उगाच कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचे म्हणून स्वतंत्र होण्याची मागणी करण्यामध्ये काही अर्थ नाही. स्वस्त घर भूलभुलय्या प्रकरणा मध्ये सरकारमधील उच्चपदस्थांच्या भूमिकेची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मेपल ग्रुपच्या अगरवालला अटक का होत नाही, दोषींना बेड्या ठोकल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. घरे देण्यामध्ये सरकार अपयशी ठरते तेव्हा असे प्रकार घडतात, असा टोलाही त्यांनी लगावला. शंभर कोटी रुपयांचा महसूल बुडवून ‘आयपीएल’ चे सामने रद्द केले. सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही, असेही ते म्हणाले.मोदीसरकारच्या कामावर लोक नाराज आहेत. दिल्ली, बिहार आणि अन्य ठिकाणच्या निवडणुकांमध्ये ते दिसून आले. मात्र, या देशात काँग्रेस आणि भाजपा या दोन मोठ्या पक्षांना बाजूला ठेवून राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे मोदी आणि भाजपाविरोधी आघाडी करताना काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय होऊ शकत नाही, अशी टिपण्णी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पंतप्रधानपदाचा उमेदवार काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय ठरवता येणार नाही. मग, ते नितीशकुमार असतील किंवा अन्य कोणी, असा टोला त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना लगावला. भाजपाविरोधातील आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सर्वांत विश्वासार्ह व्यक्ती असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले होते. त्यासंदर्भात चव्हाण यांनी भाष्य केले.