शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीतून सरकार साधणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लादलेल्या अंशत: टाळेबंदीवर दुकानदार, हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लादलेल्या अंशत: टाळेबंदीवर दुकानदार, हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातून सरकार काय साधणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन आर्थिक गाडे सुरळीत कसे होणार? याची वाट पाहात बसलो होतो. होईल. मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ यातल्या संचारबंदीने फारसा फरक पडणार नाही. तसेही गर्दीचे प्रमाण कमी झाले होते. हॉटेलमध्ये येणाऱ्यांची संख्या तुलनेने कमीच होती. तरी आता फक्त हॉटेल, खाणावळी, बार, रेस्टॉरंटच बंद केली, बाकीचे चालू ठेवले. एकाला एक न्याय, दुसऱ्याला वेगळा हे योग्य नाही. बंदच करायचे होते तर सरसकट बंद करायेच होते. अंशत: टाळेबंदीने काय होणार? आमचे होणारे नुकसान कसे भरुन निघणार? असे प्रश्न लहान व्यावसायिक आणि हॉटेलचालकांनी उपस्थित केले आहेत.

कोट

“नियमावलीमुळे नक्कीच आमच्या व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी ६ नंतरच सुरु होत असतात. वेळेच्या बंधनामुळे फटका बसणार आहे. मागील वर्षीही हंगाम वायाच गेल्यासारखा होता. यावर्षी अपेक्षा होती. पण आता त्यावरही पाणी पडल्यासारखे वाटत आहे.”

- उद्धव शेळके, मंडप व्यावसायिक.

कोट

“चहाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. इतर ठिकाणी होणारी गर्दी प्रशासनाला दिसत नाही का? हॉटेल व्यवसायावरती मर्यादा घातल्या जातात. सर्वांना समान न्याय लावला पाहिजे. सात दिवस दुकान बंद ठेवून मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. किमान सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत तरी सुरू ठेवण्याची परवानगी हवी होती.”

- निखिल शेजवळ, चहा व्यावसायिक

कोट

“आर्थिक गणित कोलमडणार आहे. यापूर्वी संध्याकाळी आठ वाजता व्यवसाय बंद करावा लागत होता. खऱ्या अर्थाने संध्याकाळी सहानंतरच ग्राहकांची गर्दी वाढायची. दिवसभरात फार धंदा होत नव्हता. आता सगळेच बंद. नुकसान सोसावे लागणार.”

- दीपक होले, वडापाव विक्रेते.

कोट

“कोरोनामुळे आमच्या व्यवसायाला मोठे ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षभरापासून या धंद्यात मंदी आली. आयटी सेक्टर पूर्णपणे बंद असल्याने व्यवसाय कोलमडला. आता सावरण्याची आशा असताना पुन्हा रुग्णांची संख्या वाढली. जागा खरेदीसाठी गुंतवलेले पैसे देखील नागरिकांनी काढून घेत आहेत.”

-निखिल पवार, रिअल इस्टेट एजंट.

कोट

“सकाळी प्रत्येकाची कामाला जाण्याची गडबड असते. त्यामुळे सकाळच्या वेळेत ग्राहकांची संख्याही कमी असते. संध्याकाळी सहानंतर ग्राहकांची गर्दी वाढते. परंतु वेळेवर बंधन घातल्याने धंदा होणार नाही. विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर येणे अवघड होत चालले आहे.”

- सुनील भोज, मोबाईल विक्रेते.

कोट

“कोरोनाचा सर्वात जास्त फटका हॉटेल व्यवसायाला बसला. कामगारांचा पगार देखील निघत नाही. कोरोनाच्या भीतीमुळे हॉटेल व्यवसाय मंदावला आहे. आता पुन्हा सात दिवस बंद ठेवून मोठे नुकसान होणार आहे. पार्सल सेवा जरी सुरू ठेवली असली तरी यातून खर्चही नीट भागत नाही.”

- वेदांत शिंदे, हॉटेल व्यवसायिक.