शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

हद्दवाढीतील गावांची निवडणूक होणार रद्द?

By admin | Updated: May 5, 2017 03:12 IST

महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात येणाऱ्या ३४ गावांमधील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून तो

पुणे : महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात येणाऱ्या ३४ गावांमधील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून तो रद्द करण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सरकारला दिले. गावांचा समावेश व्हावा, यासाठी दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी न्यायालयात झाली. सर्व गावांचा समावेश करण्यासाठी अनुकूल असल्याचे पत्र सरकारने न्यायालयाला दिले. याचिकाकर्त्यांनी अनुकूल म्हणजे नक्की काय करणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे मत व्यक्त केले. मोजक्याच गावांचा समावेश करणार की सर्व गावांचा, अंशत: करणार की संपूर्ण करणार, याबाबत स्पष्टता असणे गरजेचे आहे. सरकारने ते स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने ते मान्य करीत सरकारने १२ जूनपर्यंत याबाबत न्यायालयाला स्पष्ट काय ते कळवावे, असे सांगितले. या गावांपैकी १९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. निवडणूक झाली तर पैसे व मनुष्यबळही वाया जाईल, असे निदर्शनास आणले. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी चर्चा करावी व निवडणूक रद्द करण्याबाबत काय करता येईल, त्याची माहिती घ्यावी, असे सांगितले.