शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

हद्दवाढीतील गावांची निवडणूक होणार रद्द?

By admin | Updated: May 5, 2017 03:12 IST

महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात येणाऱ्या ३४ गावांमधील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून तो

पुणे : महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात येणाऱ्या ३४ गावांमधील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून तो रद्द करण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सरकारला दिले. गावांचा समावेश व्हावा, यासाठी दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी न्यायालयात झाली. सर्व गावांचा समावेश करण्यासाठी अनुकूल असल्याचे पत्र सरकारने न्यायालयाला दिले. याचिकाकर्त्यांनी अनुकूल म्हणजे नक्की काय करणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे मत व्यक्त केले. मोजक्याच गावांचा समावेश करणार की सर्व गावांचा, अंशत: करणार की संपूर्ण करणार, याबाबत स्पष्टता असणे गरजेचे आहे. सरकारने ते स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने ते मान्य करीत सरकारने १२ जूनपर्यंत याबाबत न्यायालयाला स्पष्ट काय ते कळवावे, असे सांगितले. या गावांपैकी १९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. निवडणूक झाली तर पैसे व मनुष्यबळही वाया जाईल, असे निदर्शनास आणले. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी चर्चा करावी व निवडणूक रद्द करण्याबाबत काय करता येईल, त्याची माहिती घ्यावी, असे सांगितले.