शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या प्राधान्य योजनेचे निकष तपासणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:07 IST

धान्याचे संपूर्ण वाटप होण्यासाठी लाभार्थी वाढण्याची शक्यता, समितीची स्थापना

पुणे : केंद्र सरकारकडून प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अन्नधान्यापैकी काही धान्य शिल्लक राहत असून, हे सर्व धान्य लाभार्थ्यांना वितरित या योजनेतील लाभार्थ्यांच्या उत्पन्नाचे निकष नव्याने तपासले जाणार आहेत. त्यासाठी राज्यस्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा तसेच त्यांचे सामाजिक निकषही तपासणार आहे. हा अहवाल दोन महिन्यांत सादर करावा लागणार आहे.

राज्यात १ फेब्रुवारी २०१४ पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय कुटुंब योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना असे दोन प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेंतर्गत २०११ मध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न शहरी भागात कमाल ५९ हजार व ग्रामीण भागात कमाल ४४ हजारांपर्यंत असणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश प्राधान्य कुटुंब योजनेत करण्यात आला आहे. या योजनेत लाभार्थ्यांना दरमहा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मिळते. यामध्ये ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ, २ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि १ रुपया प्रतिकिलो दराने भरडधान्य दिले जाते. मात्र, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अन्नधान्यापैकी काही धान्य शिल्लक राहते. हे धान्य १०० टक्के वाटप व्हावे यासाठी प्राधान्य योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासण्यात येणार आहेत.

सध्याच्या निकषांमध्ये बदल करून सुधारित निकष निश्चित करण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत अभ्यास करून राज्यातील प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करणार आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक असतील. तर ग्रामविकास, नगरविकास विभाग तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सह किंवा उपसचिव सदस्य असतील. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा उपायुक्तांनाही या समितीचे सदस्य करण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाचे अतिरिक्त सचिव हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समितीला अहवाल देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfoodअन्नGovernmentसरकार