शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रेशनच्या प्राधान्य योजनेचे निकष तपासणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:07 IST

धान्याचे संपूर्ण वाटप होण्यासाठी लाभार्थी वाढण्याची शक्यता, समितीची स्थापना

पुणे : केंद्र सरकारकडून प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अन्नधान्यापैकी काही धान्य शिल्लक राहत असून, हे सर्व धान्य लाभार्थ्यांना वितरित या योजनेतील लाभार्थ्यांच्या उत्पन्नाचे निकष नव्याने तपासले जाणार आहेत. त्यासाठी राज्यस्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा तसेच त्यांचे सामाजिक निकषही तपासणार आहे. हा अहवाल दोन महिन्यांत सादर करावा लागणार आहे.

राज्यात १ फेब्रुवारी २०१४ पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय कुटुंब योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना असे दोन प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेंतर्गत २०११ मध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न शहरी भागात कमाल ५९ हजार व ग्रामीण भागात कमाल ४४ हजारांपर्यंत असणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश प्राधान्य कुटुंब योजनेत करण्यात आला आहे. या योजनेत लाभार्थ्यांना दरमहा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मिळते. यामध्ये ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ, २ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि १ रुपया प्रतिकिलो दराने भरडधान्य दिले जाते. मात्र, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अन्नधान्यापैकी काही धान्य शिल्लक राहते. हे धान्य १०० टक्के वाटप व्हावे यासाठी प्राधान्य योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासण्यात येणार आहेत.

सध्याच्या निकषांमध्ये बदल करून सुधारित निकष निश्चित करण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत अभ्यास करून राज्यातील प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करणार आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक असतील. तर ग्रामविकास, नगरविकास विभाग तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सह किंवा उपसचिव सदस्य असतील. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा उपायुक्तांनाही या समितीचे सदस्य करण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाचे अतिरिक्त सचिव हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समितीला अहवाल देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfoodअन्नGovernmentसरकार