शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

काळया यादीतील कंपनी नोकर भरती प्रक्रिया राबविणार का.??

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारने मागील सरकारचे महापरीक्षा पोर्टल बंद केले. त्याऐवजी नवीन कंपनीची निवड ...

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारने मागील सरकारचे महापरीक्षा पोर्टल बंद केले. त्याऐवजी नवीन कंपनीची निवड महाआयटीकडे दिली आहे. महाआयटीकडून येत्या दोन दिवसात अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र यापूर्वीच काळ्या यादीत असणाऱ्या कंपनीची निवड केली आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

भरती प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण १८ कंपन्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ कंपन्या निवडल्या. यातून अंतिम एक कंपनीची निवड होईल. मात्र या चार पैकी ऑपटेक कंपनीला इलेक्ट्रॉनिक सर्व्हिसेस कमिशने काळ्या यादीत टाकले आहे. असे असताना या कंपनीची निवड कोणत्या आधारावर झाली, याचा महाआयटीने खुलासा करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

महाआयटीकडून कोणत्याही प्रकारे इ निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही? ही निवड प्रक्रिया गेल्या ६ महिन्यांपासून राबविण्यात येत असून २५ वेळा मुदत वाढ देण्यात आली. यातून नेमके काय साधले गेले असा प्रश्न केला जात आहे. महापोर्टल भ्रष्ट होते म्हणून राज्य सरकारने ते बंद केले. आता . मात्र अशा कंपन्यांची निवडीतून नक्की उमेदवारांचेेच हित साधले जाणार की राजकीय पोळी भाजली जाणार . असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

एमपीएससीचे टीसीएस कंपनी काम पाहते. तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचे सत्र सुरू ठेवण्यासाठीच काळ्या यादीतील कंपनी पात्र ठरविण्याचा घाट घातला जात आहे. आर्थिक हित संबंधापुढे कोणत्याही सरकारला युवकांची काळजी नाही हे स्पष्ट होत आहे.

-किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स.

सुमारे २७ हजार पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरी सुद्धा ई निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. कोणत्या निकषांवर कंपन्या निवडल्या आहेत, याची माहिती राज्य सरकारने द्यावी. यामुळे पुन्हा भ्रष्टाचार होणार नाही, याची खात्री सरकार कसे देणार आहे.

- ऋषिकेश चव्हाण, विद्यार्थी.