शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बसथांबे होणार चकाचक

By admin | Updated: February 11, 2017 02:54 IST

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १,७०० बसथांबे चकाचक करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १,७०० बसथांबे चकाचक करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. तसेच, पुढील महिन्यापासून आगारांप्रमाणेच सर्व प्रमुख बसस्थानकांवर प्रवासी दिन साजरा करणे, तिकिटावर तक्रार क्रमांक छापणे असे विविध निर्णयही प्रशासनाने घेतले आहेत.‘पीएमपी’चा ‘बिझनेस प्लॅन’ तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम एका खासगी संस्थेकडून केले जात आहे. याअंतर्गत पीएमपी व संबंधित संस्थेकडून प्रवाशांच्या ठिकठिकाणी कार्यशाळा घेण्यात आला. तसेच, आॅनलाईन सर्वेक्षण, बस प्रवासी व इतर नागरिकांशी संवाद साधून पीएमपी वाहतूक व्यवस्थेबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत पालिका आयुक्त व पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष कुणाल कुमार यांनी गुरुवारी पीएमपीतील सर्व वरिष्ठ अधिकारी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बिझनेस आराखड्याचे प्राथमिक सादरीकरण करण्यात आले. या वेळी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, महाव्यवस्थापक अनंत वाघमारे, मुख्य अभियंता सुनील बुरसे यांच्यासह सर्व आगारांचे व्यवस्थापक या बैठकीला उपस्थित होते.सर्वेक्षणामध्ये बस व थांब्यांची स्वच्छता याबाबत लोकांकडून अधिक नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच, ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण, चालक-वाहकांची प्रवाशांशी असलेली अयोग्य वागणूक, थांब्यावर बस न थांबविणे याकडे प्रवाशांनी अधिक लक्ष वेधले आहे. याचा विचार करून संबंधित संस्थेकडून पीएमपीला तातडीने करायच्या उपाययोजना सुचविल्या आहे. याअनुषंगाने कुणाल कुमार यांनी बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतले आहेत. ‘बिझनेस प्लॅनअंतर्गत सध्या विविध उपाययोजनांवर विचार सुरू आहे. अद्याप आराखडा तयार झालेला नाही. मात्र, त्यांनी तातडीच्या सुचविलेल्या उपाययोजना केल्या जात आहेत. हा आराखडा एप्रिलमध्ये मिळेल,’ असे मोरे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पीएमपीचे सुमारे १,७०० बसथांबे आहेत. त्यांपैकी अनेक थांबे अस्वच्छ असून, प्रवाशांना थांब्यावर जाणेही कठीण होते. काही ठिकाणी रस्त्याच्या कामाचा राडारोडा पडलेला असतो. अनधिकृत जाहिरातींमुळे अनेक बसथांबे विद्रूप झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने बसथांब्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे.निविदा प्रक्रिया राबवून खासगी संस्थेमार्फत थांब्याची स्वच्छता केली जाणार असून, त्यात सातत्य राखले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.