शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

बसथांबे होणार चकाचक

By admin | Updated: February 11, 2017 02:54 IST

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १,७०० बसथांबे चकाचक करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १,७०० बसथांबे चकाचक करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. तसेच, पुढील महिन्यापासून आगारांप्रमाणेच सर्व प्रमुख बसस्थानकांवर प्रवासी दिन साजरा करणे, तिकिटावर तक्रार क्रमांक छापणे असे विविध निर्णयही प्रशासनाने घेतले आहेत.‘पीएमपी’चा ‘बिझनेस प्लॅन’ तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम एका खासगी संस्थेकडून केले जात आहे. याअंतर्गत पीएमपी व संबंधित संस्थेकडून प्रवाशांच्या ठिकठिकाणी कार्यशाळा घेण्यात आला. तसेच, आॅनलाईन सर्वेक्षण, बस प्रवासी व इतर नागरिकांशी संवाद साधून पीएमपी वाहतूक व्यवस्थेबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत पालिका आयुक्त व पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष कुणाल कुमार यांनी गुरुवारी पीएमपीतील सर्व वरिष्ठ अधिकारी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बिझनेस आराखड्याचे प्राथमिक सादरीकरण करण्यात आले. या वेळी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, महाव्यवस्थापक अनंत वाघमारे, मुख्य अभियंता सुनील बुरसे यांच्यासह सर्व आगारांचे व्यवस्थापक या बैठकीला उपस्थित होते.सर्वेक्षणामध्ये बस व थांब्यांची स्वच्छता याबाबत लोकांकडून अधिक नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच, ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण, चालक-वाहकांची प्रवाशांशी असलेली अयोग्य वागणूक, थांब्यावर बस न थांबविणे याकडे प्रवाशांनी अधिक लक्ष वेधले आहे. याचा विचार करून संबंधित संस्थेकडून पीएमपीला तातडीने करायच्या उपाययोजना सुचविल्या आहे. याअनुषंगाने कुणाल कुमार यांनी बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतले आहेत. ‘बिझनेस प्लॅनअंतर्गत सध्या विविध उपाययोजनांवर विचार सुरू आहे. अद्याप आराखडा तयार झालेला नाही. मात्र, त्यांनी तातडीच्या सुचविलेल्या उपाययोजना केल्या जात आहेत. हा आराखडा एप्रिलमध्ये मिळेल,’ असे मोरे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पीएमपीचे सुमारे १,७०० बसथांबे आहेत. त्यांपैकी अनेक थांबे अस्वच्छ असून, प्रवाशांना थांब्यावर जाणेही कठीण होते. काही ठिकाणी रस्त्याच्या कामाचा राडारोडा पडलेला असतो. अनधिकृत जाहिरातींमुळे अनेक बसथांबे विद्रूप झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने बसथांब्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे.निविदा प्रक्रिया राबवून खासगी संस्थेमार्फत थांब्याची स्वच्छता केली जाणार असून, त्यात सातत्य राखले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.