शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीत

By admin | Updated: April 26, 2017 02:53 IST

गेल्या महिन्यापासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील तापमानाचा पारा चढला असून याचा परिणाम मानवी जीवनावर

पेठ : गेल्या महिन्यापासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील तापमानाचा पारा चढला असून याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतानाच पक्षी आणि प्राण्यांवरदेखील त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. पाण्याच्या, अन्नाच्या शोधार्थ पेठ परिसरात वानराने मानवीवस्तीत प्रवेश केला, तर पक्षीसुद्धा आपली तहान भागविण्यासाठी पाणी असेल तिथे जाऊन आपली तहान भागविताना दिसत आहेत. सातगाव पठार परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता व अतिउष्णता यामुळे माणसांबरोबरच जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच पशुपक्षी व वन्यप्राण्यांच्या जीवाला उष्माघाताने धोका होण्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. वाढत्या उकाड्यामुळे गावात व शिवारातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातगावातील तापमान जवळजवळ ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकत असून या भागातील बहुतांशी विहिरी या पूर्णपणे आटल्या आहेत. या परिसरात पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ वानर फिरत आहे. पेठ येथील मानवीवस्तीत हे वानर कधी कधी आढळून येत आहे. प्राण्यांबरोबरच पक्ष्यांनादेखील पाण्याची अधिक गरज भासते. अन्नपाण्याच्या शोधात भटकणाऱ्या पक्ष्यांना वेळेत पाणी मिळाले नाही तर ते बेशुद्ध पडत आहेत. चिमणी, कावळा यांसारख्या पक्ष्यांना वेळीच पाणी मिळाले नाही तर उडता उडता त्यांच्या शरीरात अशक्तपणा निर्माण होऊन खाली पडून त्यांचा मृत्यू होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी कमी प्रमाणात मिळते. नैसर्गिक पाणीपुरवठा आटतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे अवाहन पक्षीप्रेमी मित्रांकडून केले जात आहे.