शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

माळरानांवर वन्यजीवांचा अधिवास, त्यावर होतेय अतिक्रमण- अधिवास होतोय नष्ट; माणसांच्या घरांसाठी प्राण्यांच्या घरांवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:11 IST

माळरानं आणि तेथील वन्यजीव जपावेत, यासाठी ग्रासलँड संस्था काम करत आहे. या संस्थेचे मिहिर गोडबोले म्हणाले,‘‘पूर्वी पुणे जिल्ह्यात सासवड, ...

माळरानं आणि तेथील वन्यजीव जपावेत, यासाठी ग्रासलँड संस्था काम करत आहे. या संस्थेचे मिहिर गोडबोले म्हणाले,‘‘पूर्वी पुणे जिल्ह्यात सासवड, दिवेघाट, वाघापूर, भुलेश्वर पठार, मोरगाव, बारामती, जेजुरी आदी परिसर हा माळरान असल्याने तिथे लांडगे, कोल्हे, तरस, चिंकारा, ससे मोठ्या प्रमाणावर दिसायचे. पण आता हळूहळू माळराने कमी होत असल्याने प्राण्यांची संख्याही कमी होत आहे. त्यांचा अधिवास नष्ट होत आहे. सासवडमध्ये खोकड, लांडगा, तरस खूप होते. आता ते कमी झालेत. वाघापूर-सासवडजवळ संपूर्ण नष्ट झाले आहेत. पूर्वी तीन-चार तरस, लांडगे दिसायचे, पण आता दिसत नाहीत. भटकी कुत्री वाढत आहेत, ते या माळरानावरील ससे, हरणे यांची शिकार करतात. त्यामुळे वन्यजीवांचे जीव जात आहेत.’’

——————-

कुठेही वृक्षलागवड नको

सरकारी योजना म्हणजे पडीक जमिनींवर वृक्षलागवड होत असल्याने माळरानाचे वैभव नष्ट होत आहे. माळरानावर झाडे लावणे चुकीचे आहे.

———

रोजगार उपलब्ध व्हावा

पूर्वी माळरानावर मेंढ्या, बकऱ्या चरण्यासाठी त्याची जपणूक होत असे. पण आता रोजगारासाठी इतर पर्याय नाहीत. त्यामुळे माळरानं जपली जात नाहीत. माळरानं जपावीत, यासाठी रोजगाराच्या इतर संधी खुल्या केल्या पाहिजेत.

——————-

काय करायला हवे?

राजस्थानमध्ये काही संस्थांनी मिळून तेथील माळरानं जपणाऱ्या समाजाला रोजगार मिळवून दिला. काही जागा माळरान म्हणून घोषित केल्या. माळरानावरील प्राणीजीवन दाखविणारे टुरिझम सुरू केल्यास तरुण गाइड म्हणून काम करतील. त्यांना रोजगार मिळेल. टुरिस्ट लोकांना स्थानिक जेवण, साधी राहणी या गोष्टींबाबत सांगितले पाहिजे. हा प्रयोग आपल्याकडे व्हायला हवा. तरच माळरानं जपली जातील.

——————-

माळराने तशीच ठेवावीत

सध्या माळरानं कमी होत असल्याने तेथील वन्यजीवदेखील कमी होत आहेत. त्यामुळे माळरानं जपली पाहिजेत. तरच तेथील जैवविविधता वाचेल. माळरानांचे महत्त्व नागरिकांना समजून दिले पाहिजे, त्यासाठी आम्ही ग्रासलँड आणि वन विभागाचे सहकार्य घेऊन काम करीत असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.

---------------