शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

वखारीतला कांदा लागला सडू

By admin | Updated: July 7, 2017 02:53 IST

जुलै महिना सुरू झाला, तरी अद्याप कांद्याच्या भावात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी वखारीत

कारेगाव : जुलै महिना सुरू झाला, तरी अद्याप कांद्याच्या भावात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी वखारीत साठवून ठेवलेला कांदा सडायला लागल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून कांद्याचे दर दहा किलोला ४० रुपये स्थिर आहेत. त्यात समाधानकारक वाढ होत नाही. अपवाद वगळता सरासरी शेतकऱ्यांना किलोला चार ते पाच रुपयेच बाजार मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघत नाही, तर काही शेतकरी कांदा सडण्यापूर्वीच नुकसान सहन करून विक्री करीत आहेत. मागील वर्षी कांद्याच्या बाजारात वाढ होण्यापेक्षा घट झाल्याने वाहतूक खर्चही निघत नव्हता. परिणामी, अनेक ठिकाणी वखारीतच कांदा सडला तर काही शेतकऱ्यांनी जनावरांना चारला. यावर्षीसुद्धा बाजार नसल्याने उभ्या पिकात जनावरे सोडली. पुढील काळात चांगला बाजार मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढणीनंतर वखारीत ठेवला आहे. परंतु, मागील वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा कांदा फेकून द्यावा लागेल की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. मागील, वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने राज्यात कांद्याची लागवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य हे कांदा उत्पादनातील प्रमुख राज्य आहे. देशात सुमारे २१५ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले. त्यामुळे साहजिकच उत्पादन जास्त व मागणी कमी झाल्याने कांद्याचे बाजारभाव कोसळले. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे उत्पादन वाढले. त्याचा फटका थेट बाजारभावावर झाला. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले जाते. तीन वर्षांपासून बाजार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.निर्यातीस मुदतवाढ मिळूनही वाढेना बाजार जून महिन्याच्या अखेरीस कांदा निर्यातीवरील अनुदान योजनेची मुदत संपली होती. केंद्र शासनाने तीन महिने मुदतवाढ दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यात आशेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, बाजारात कांद्याचे भाव वाढत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बाजार वाढेल की नाही, या चिंतेने शेतकरी कांदा बाजारात पाठवण्याची लगबग करत आहे.