शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वखारीतला कांदा लागला सडू

By admin | Updated: July 7, 2017 02:53 IST

जुलै महिना सुरू झाला, तरी अद्याप कांद्याच्या भावात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी वखारीत

कारेगाव : जुलै महिना सुरू झाला, तरी अद्याप कांद्याच्या भावात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी वखारीत साठवून ठेवलेला कांदा सडायला लागल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून कांद्याचे दर दहा किलोला ४० रुपये स्थिर आहेत. त्यात समाधानकारक वाढ होत नाही. अपवाद वगळता सरासरी शेतकऱ्यांना किलोला चार ते पाच रुपयेच बाजार मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघत नाही, तर काही शेतकरी कांदा सडण्यापूर्वीच नुकसान सहन करून विक्री करीत आहेत. मागील वर्षी कांद्याच्या बाजारात वाढ होण्यापेक्षा घट झाल्याने वाहतूक खर्चही निघत नव्हता. परिणामी, अनेक ठिकाणी वखारीतच कांदा सडला तर काही शेतकऱ्यांनी जनावरांना चारला. यावर्षीसुद्धा बाजार नसल्याने उभ्या पिकात जनावरे सोडली. पुढील काळात चांगला बाजार मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढणीनंतर वखारीत ठेवला आहे. परंतु, मागील वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा कांदा फेकून द्यावा लागेल की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. मागील, वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने राज्यात कांद्याची लागवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य हे कांदा उत्पादनातील प्रमुख राज्य आहे. देशात सुमारे २१५ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले. त्यामुळे साहजिकच उत्पादन जास्त व मागणी कमी झाल्याने कांद्याचे बाजारभाव कोसळले. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे उत्पादन वाढले. त्याचा फटका थेट बाजारभावावर झाला. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले जाते. तीन वर्षांपासून बाजार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.निर्यातीस मुदतवाढ मिळूनही वाढेना बाजार जून महिन्याच्या अखेरीस कांदा निर्यातीवरील अनुदान योजनेची मुदत संपली होती. केंद्र शासनाने तीन महिने मुदतवाढ दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यात आशेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, बाजारात कांद्याचे भाव वाढत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बाजार वाढेल की नाही, या चिंतेने शेतकरी कांदा बाजारात पाठवण्याची लगबग करत आहे.