शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

वखारीतला कांदा लागला सडू

By admin | Updated: July 7, 2017 02:53 IST

जुलै महिना सुरू झाला, तरी अद्याप कांद्याच्या भावात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी वखारीत

कारेगाव : जुलै महिना सुरू झाला, तरी अद्याप कांद्याच्या भावात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी वखारीत साठवून ठेवलेला कांदा सडायला लागल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून कांद्याचे दर दहा किलोला ४० रुपये स्थिर आहेत. त्यात समाधानकारक वाढ होत नाही. अपवाद वगळता सरासरी शेतकऱ्यांना किलोला चार ते पाच रुपयेच बाजार मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघत नाही, तर काही शेतकरी कांदा सडण्यापूर्वीच नुकसान सहन करून विक्री करीत आहेत. मागील वर्षी कांद्याच्या बाजारात वाढ होण्यापेक्षा घट झाल्याने वाहतूक खर्चही निघत नव्हता. परिणामी, अनेक ठिकाणी वखारीतच कांदा सडला तर काही शेतकऱ्यांनी जनावरांना चारला. यावर्षीसुद्धा बाजार नसल्याने उभ्या पिकात जनावरे सोडली. पुढील काळात चांगला बाजार मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढणीनंतर वखारीत ठेवला आहे. परंतु, मागील वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा कांदा फेकून द्यावा लागेल की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. मागील, वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने राज्यात कांद्याची लागवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य हे कांदा उत्पादनातील प्रमुख राज्य आहे. देशात सुमारे २१५ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले. त्यामुळे साहजिकच उत्पादन जास्त व मागणी कमी झाल्याने कांद्याचे बाजारभाव कोसळले. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे उत्पादन वाढले. त्याचा फटका थेट बाजारभावावर झाला. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले जाते. तीन वर्षांपासून बाजार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.निर्यातीस मुदतवाढ मिळूनही वाढेना बाजार जून महिन्याच्या अखेरीस कांदा निर्यातीवरील अनुदान योजनेची मुदत संपली होती. केंद्र शासनाने तीन महिने मुदतवाढ दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यात आशेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, बाजारात कांद्याचे भाव वाढत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बाजार वाढेल की नाही, या चिंतेने शेतकरी कांदा बाजारात पाठवण्याची लगबग करत आहे.