शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

सनबर्न कार्यक्रमास पाठिंबा कशासाठी?

By admin | Updated: December 26, 2016 02:19 IST

म्युजिक शोच्या नावाखाली अमली पदार्थांचा वापर होत असलेल्या सनबर्न कार्यक्रम गोवा राज्य सरकारने हद्दपार केलेला असताना महाराष्ट्र शासन

वाघोली : म्युजिक शोच्या नावाखाली अमली पदार्थांचा वापर होत असलेल्या सनबर्न कार्यक्रम गोवा राज्य सरकारने हद्दपार केलेला असताना महाराष्ट्र शासन अशा कार्यक्रमाला पाठिंबा देवून काय सिद्ध करू इच्छित आहे, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. केसनंद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रविवारी समितीच्या वतीने सनबर्न कार्यक्रमाची पार्श्वभूमी ग्रामस्थांना सांगून निषेध सभा घेण्यात आली.केसनंद येथे २८ ते ३१ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे अभय वर्तक, रमेश शिंदे, नंदू रहाणे, चारुदत्त आफळे, संभाजी महाराज पालखी सोहळ््याचे संदीप भोंडवे, माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे, केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, तानाजी हरगुडे, रामदास हरगुडे, अलका सोनावणे, समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी सनबर्न कार्यक्रमाचा निषेध नोंदवून सनबर्न बंद व्हावा अशी मागणी केली. पोंक्षे म्हणाले, की विकसनशील देशामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या भारताला पोखरण्याचे काम सनबर्नसारख्या कार्यक्रमामधून होत आहे. गोव्यामध्ये चालणारा हा कार्यक्रम आमली पदार्थांच्या विळख्यामध्ये सापडला होता. याठिकाणी चालणाऱ्या अवैध कामामुळे गोवा राज्यसरकारने हद्दपार केला असताना याच सनबर्नने पुण्याच्या ग्रामीण भागातील केसनंद येथील डोंगर भाग निवडून फेस्टिवलचे नियोजन केले आहे. यानिमित्ताने पुण्यातील स्थानिक तरुणांना अमली पदार्थांची सवय लावून बिघडविण्याचे काम केले जाणार आहे आणि याचा कोणतीही इतिहास न पाहता महाराष्ट्र शासन याला बिनदिक्कत परवानगी देत आहे. केसनंद ग्रामस्थांचा विरोध दूर करण्यासाठी विकास निधी देण्याची आश्वासने सनबर्नच्या आयोजकाकडून दिली जात आहेत. या कार्यक्रमामध्ये गौडबंगाल नसते तर ग्रामस्थांना विकास निधीची आश्वासने का दिली जात आहेत? निवडणूका जवळ आल्याने निवडणूक फंड आणि आर्थिक फायदा साधण्यासाठीच याला पाठिंबा दिला जात असल्याचा घणाघाती आरोप यावेळी करण्यात आला. केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी (दि. २६) रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये सनबर्न कार्यक्रमाविषयी चर्चा केली जाणार आहे. आयोजकाच्या वतीने ग्रामस्थांना विकास निधी देण्याचे आश्वासन दिले गेल्याची चर्चा असल्याने ग्रामपंचायत परवानगी बाबत काय निर्णय घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)