शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सनबर्न कार्यक्रमास पाठिंबा कशासाठी?

By admin | Updated: December 26, 2016 02:19 IST

म्युजिक शोच्या नावाखाली अमली पदार्थांचा वापर होत असलेल्या सनबर्न कार्यक्रम गोवा राज्य सरकारने हद्दपार केलेला असताना महाराष्ट्र शासन

वाघोली : म्युजिक शोच्या नावाखाली अमली पदार्थांचा वापर होत असलेल्या सनबर्न कार्यक्रम गोवा राज्य सरकारने हद्दपार केलेला असताना महाराष्ट्र शासन अशा कार्यक्रमाला पाठिंबा देवून काय सिद्ध करू इच्छित आहे, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. केसनंद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रविवारी समितीच्या वतीने सनबर्न कार्यक्रमाची पार्श्वभूमी ग्रामस्थांना सांगून निषेध सभा घेण्यात आली.केसनंद येथे २८ ते ३१ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे अभय वर्तक, रमेश शिंदे, नंदू रहाणे, चारुदत्त आफळे, संभाजी महाराज पालखी सोहळ््याचे संदीप भोंडवे, माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे, केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, तानाजी हरगुडे, रामदास हरगुडे, अलका सोनावणे, समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी सनबर्न कार्यक्रमाचा निषेध नोंदवून सनबर्न बंद व्हावा अशी मागणी केली. पोंक्षे म्हणाले, की विकसनशील देशामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या भारताला पोखरण्याचे काम सनबर्नसारख्या कार्यक्रमामधून होत आहे. गोव्यामध्ये चालणारा हा कार्यक्रम आमली पदार्थांच्या विळख्यामध्ये सापडला होता. याठिकाणी चालणाऱ्या अवैध कामामुळे गोवा राज्यसरकारने हद्दपार केला असताना याच सनबर्नने पुण्याच्या ग्रामीण भागातील केसनंद येथील डोंगर भाग निवडून फेस्टिवलचे नियोजन केले आहे. यानिमित्ताने पुण्यातील स्थानिक तरुणांना अमली पदार्थांची सवय लावून बिघडविण्याचे काम केले जाणार आहे आणि याचा कोणतीही इतिहास न पाहता महाराष्ट्र शासन याला बिनदिक्कत परवानगी देत आहे. केसनंद ग्रामस्थांचा विरोध दूर करण्यासाठी विकास निधी देण्याची आश्वासने सनबर्नच्या आयोजकाकडून दिली जात आहेत. या कार्यक्रमामध्ये गौडबंगाल नसते तर ग्रामस्थांना विकास निधीची आश्वासने का दिली जात आहेत? निवडणूका जवळ आल्याने निवडणूक फंड आणि आर्थिक फायदा साधण्यासाठीच याला पाठिंबा दिला जात असल्याचा घणाघाती आरोप यावेळी करण्यात आला. केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी (दि. २६) रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये सनबर्न कार्यक्रमाविषयी चर्चा केली जाणार आहे. आयोजकाच्या वतीने ग्रामस्थांना विकास निधी देण्याचे आश्वासन दिले गेल्याची चर्चा असल्याने ग्रामपंचायत परवानगी बाबत काय निर्णय घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)