शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सनबर्न कार्यक्रमास पाठिंबा कशासाठी?

By admin | Updated: December 26, 2016 02:19 IST

म्युजिक शोच्या नावाखाली अमली पदार्थांचा वापर होत असलेल्या सनबर्न कार्यक्रम गोवा राज्य सरकारने हद्दपार केलेला असताना महाराष्ट्र शासन

वाघोली : म्युजिक शोच्या नावाखाली अमली पदार्थांचा वापर होत असलेल्या सनबर्न कार्यक्रम गोवा राज्य सरकारने हद्दपार केलेला असताना महाराष्ट्र शासन अशा कार्यक्रमाला पाठिंबा देवून काय सिद्ध करू इच्छित आहे, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. केसनंद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रविवारी समितीच्या वतीने सनबर्न कार्यक्रमाची पार्श्वभूमी ग्रामस्थांना सांगून निषेध सभा घेण्यात आली.केसनंद येथे २८ ते ३१ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे अभय वर्तक, रमेश शिंदे, नंदू रहाणे, चारुदत्त आफळे, संभाजी महाराज पालखी सोहळ््याचे संदीप भोंडवे, माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे, केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, तानाजी हरगुडे, रामदास हरगुडे, अलका सोनावणे, समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी सनबर्न कार्यक्रमाचा निषेध नोंदवून सनबर्न बंद व्हावा अशी मागणी केली. पोंक्षे म्हणाले, की विकसनशील देशामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या भारताला पोखरण्याचे काम सनबर्नसारख्या कार्यक्रमामधून होत आहे. गोव्यामध्ये चालणारा हा कार्यक्रम आमली पदार्थांच्या विळख्यामध्ये सापडला होता. याठिकाणी चालणाऱ्या अवैध कामामुळे गोवा राज्यसरकारने हद्दपार केला असताना याच सनबर्नने पुण्याच्या ग्रामीण भागातील केसनंद येथील डोंगर भाग निवडून फेस्टिवलचे नियोजन केले आहे. यानिमित्ताने पुण्यातील स्थानिक तरुणांना अमली पदार्थांची सवय लावून बिघडविण्याचे काम केले जाणार आहे आणि याचा कोणतीही इतिहास न पाहता महाराष्ट्र शासन याला बिनदिक्कत परवानगी देत आहे. केसनंद ग्रामस्थांचा विरोध दूर करण्यासाठी विकास निधी देण्याची आश्वासने सनबर्नच्या आयोजकाकडून दिली जात आहेत. या कार्यक्रमामध्ये गौडबंगाल नसते तर ग्रामस्थांना विकास निधीची आश्वासने का दिली जात आहेत? निवडणूका जवळ आल्याने निवडणूक फंड आणि आर्थिक फायदा साधण्यासाठीच याला पाठिंबा दिला जात असल्याचा घणाघाती आरोप यावेळी करण्यात आला. केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी (दि. २६) रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये सनबर्न कार्यक्रमाविषयी चर्चा केली जाणार आहे. आयोजकाच्या वतीने ग्रामस्थांना विकास निधी देण्याचे आश्वासन दिले गेल्याची चर्चा असल्याने ग्रामपंचायत परवानगी बाबत काय निर्णय घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)