शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

शौचालय उभारण्याची लाज का वाटते?

By admin | Updated: October 12, 2015 01:26 IST

लोक ग्रामपंचायतीकडे लग्नासाठी पैसे मागत नाहीत. त्यांना फक्त पिण्याचे पाणी हवे असते. आपल्याकडे चोवीस तास पेट्रोल मिळते

माळेगाव : लोक ग्रामपंचायतीकडे लग्नासाठी पैसे मागत नाहीत. त्यांना फक्त पिण्याचे पाणी हवे असते. आपल्याकडे चोवीस तास पेट्रोल मिळते, पण पाणी मिळत नाही. दुबईमध्ये पाऊस पडत नाही, तरीही वाळूत झाडे लावण्याचा प्रयोग केला जातो. ४०० वर्षांपूर्वी जर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात रायगडावर शौचालय वापरले जात होते. तर आता शौचालय उभारण्याची लाज आणि अडचण का वाटते हेच समजत नाही.पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील सांगत होते. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकारातून ‘चला गाव घडवू या’ या अभियानाअंतर्गत आज बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांची ग्रामपरिषद शारदानगर येथील डॉ. अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडली. या परिषदेस तालुक्यातून महिला सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. या वेळी ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, उपसभापती दत्तात्रेय लोंढे, सदस्या संगीता ढवाण, डॉ. प्रतिभा नेवसे, सुदर्शना तावरे, रेखा सोनवणे, संस्थेचे समन्वयक प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते. या परिषदेच्या पहिल्या सत्रात पेरे पाटील बोलत होते. ग्रामपंचायतींना थेट निधी खूप मिळणार आहे. तेव्हा गावातल्या प्रत्येक नागरिकाचे हित पाहण्याची आपली भावना असली पाहिजे. गावच्या विकासासाठी आगामी काळात आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.त्यांनी गावकारभारात आलेल्या अडचणी, त्या सोडविताना शोधलेले उपाय याबाबत चर्चा केली. जगातील देशांच्या भ्रमंतीत आलेल्या अनुभवावरून गावच्या विकासाशी घातलेली सांगड सांगता सांगता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. पेरे पाटील म्हणाले आम्ही आमच्या गावात दररोज ज्यांचे वाढदिवस आहेत, अशांची यादी फळ्यावर लिहितो. गेल्या वीस वर्षात सरपंच, उपसरपंच, सदस्य अथवा ग्रामसेवकाने एक पैचाही भ्रष्टाचार केला नाही. गावाने एकोप्याने काम केल्यास चांगले काम घडून येऊ शकते. विकास म्हणजे केवळ इमारती, रस्ते हे स्वरुप नको आहे. पंचायत समिती सभापती करण खलाटे यांनी प्रास्ताविक केले. आर. एम. पुरी यांनी सूत्रसंचालन केले.