शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

शौचालय उभारण्याची लाज का वाटते?

By admin | Updated: October 12, 2015 01:26 IST

लोक ग्रामपंचायतीकडे लग्नासाठी पैसे मागत नाहीत. त्यांना फक्त पिण्याचे पाणी हवे असते. आपल्याकडे चोवीस तास पेट्रोल मिळते

माळेगाव : लोक ग्रामपंचायतीकडे लग्नासाठी पैसे मागत नाहीत. त्यांना फक्त पिण्याचे पाणी हवे असते. आपल्याकडे चोवीस तास पेट्रोल मिळते, पण पाणी मिळत नाही. दुबईमध्ये पाऊस पडत नाही, तरीही वाळूत झाडे लावण्याचा प्रयोग केला जातो. ४०० वर्षांपूर्वी जर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात रायगडावर शौचालय वापरले जात होते. तर आता शौचालय उभारण्याची लाज आणि अडचण का वाटते हेच समजत नाही.पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील सांगत होते. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकारातून ‘चला गाव घडवू या’ या अभियानाअंतर्गत आज बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांची ग्रामपरिषद शारदानगर येथील डॉ. अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडली. या परिषदेस तालुक्यातून महिला सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. या वेळी ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, उपसभापती दत्तात्रेय लोंढे, सदस्या संगीता ढवाण, डॉ. प्रतिभा नेवसे, सुदर्शना तावरे, रेखा सोनवणे, संस्थेचे समन्वयक प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते. या परिषदेच्या पहिल्या सत्रात पेरे पाटील बोलत होते. ग्रामपंचायतींना थेट निधी खूप मिळणार आहे. तेव्हा गावातल्या प्रत्येक नागरिकाचे हित पाहण्याची आपली भावना असली पाहिजे. गावच्या विकासासाठी आगामी काळात आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.त्यांनी गावकारभारात आलेल्या अडचणी, त्या सोडविताना शोधलेले उपाय याबाबत चर्चा केली. जगातील देशांच्या भ्रमंतीत आलेल्या अनुभवावरून गावच्या विकासाशी घातलेली सांगड सांगता सांगता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. पेरे पाटील म्हणाले आम्ही आमच्या गावात दररोज ज्यांचे वाढदिवस आहेत, अशांची यादी फळ्यावर लिहितो. गेल्या वीस वर्षात सरपंच, उपसरपंच, सदस्य अथवा ग्रामसेवकाने एक पैचाही भ्रष्टाचार केला नाही. गावाने एकोप्याने काम केल्यास चांगले काम घडून येऊ शकते. विकास म्हणजे केवळ इमारती, रस्ते हे स्वरुप नको आहे. पंचायत समिती सभापती करण खलाटे यांनी प्रास्ताविक केले. आर. एम. पुरी यांनी सूत्रसंचालन केले.