शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

नैसर्गिक टेकडीला कृत्रिम साज हवाच कशाला! चतु:श्रृंगी टेकडीवरील वनविहाराला नागरिकांचा विरोध; नियोजन मंडळाच्या बैठकीत मिळालेली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळ बैठकीत आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी ही संकल्पना मांडली आहे. ...

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळ बैठकीत आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी ही संकल्पना मांडली आहे. पाचगांव येथील वनविहारच्या धर्तीवर या टेकड्यांचा विकास व्हावा आणि त्यासाठी निधी मिळावा, असा प्रस्ताव बैठकीत शिरोळे यांनी मांडला होता. वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्त्वतः या प्रकल्पाला मंजुरी दिली असून लवकरच त्याकरिता निधी मंजूर करण्यात येईल, असे सांगितले.

याबाबत नुकतेच इकॅालॅाजीकल सोसायटीच्या स्वाती गोळे, पर्यावरणप्रेमी पुष्कर कुलकर्णी, सुषमा दाते, सुमित्रा काळे आदींनी शिरोळे यांची भेट घेतली. त्यांना कृत्रिम बांधकाम न करता नैसर्गिकपणा टिकवला पाहिजे, अशी विनंती केली. त्यावर शिरोळे यांनी ते मान्य केले असून,पुणे इकाॅलॅाजिकल सोसायटीला मास्टर प्लान तयार करण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार लवकरच सोसायटीकडून हा प्लान देण्यात येणार आहे.

==============

टेकडीवर बांधकाम केले तर तेथील नैसर्गिकपणा नष्ट होईल. अनेक ठिकाणी झाडे लावली जात आहेत. खरंतर माळरानाचे वेगळे महत्त्व असते. ते तसेच ठेवले पाहिजे. चालण्यासाठी रस्ता बनवणे किंवा बसण्यासाठी बाक हवेत, हे टेकडीवर नकोच आहे. टेकडी जशी आहे, तशीच ठेवून तिचे संवर्धन करायला हवे.

- पुष्कर कुलकर्णी, पर्यावरणप्रेमी, चतृ:श्रृंगी टेकडी

========================

टेकडीवर ‘विकास’ कशाला ?

टेकड्यांवर बांधकाम करून त्याचे सौंदर्यीकरण कशाला करायचे ? खरंतर शहरात सर्वत्र रस्ते, बसण्यासाठी बाके आहेत. टेकडीवर याची गरज नाही. तिथे गवतावर, दगडावर बसून तेथील आनंद घेतला पाहिजे. विकासाच्या नावावर टेकडीचा नैसर्गिकपणा घालवणे अयोग्य आहे. त्याला आमचा विरोधच आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

==========================