शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

चार एफएसआय कशासाठी?

By admin | Updated: February 6, 2017 06:19 IST

विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलीत चुकीच्या पद्धतीने तरतुदी करण्यात आल्या आहेत. पुणेकर नागरिकांना यामुळे कोणताही फायदा होणार नसून

पुणे : विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलीत चुकीच्या पद्धतीने तरतुदी करण्यात आल्या आहेत. पुणेकर नागरिकांना यामुळे कोणताही फायदा होणार नसून, चार एफएसआय कशासाठी हवा आहे, असा सवाल नगर विकास तज्ज्ञांनी उपस्थित केला. लोकसंख्येची घनता वाढली, तर रस्ते, पाणी, वाहतुकीसारख्या सोयी सुविधांवर ताण येऊन शहर पूर्णपणे बकाल होईल, असे मत नगर विकास तज्ज्ञांनी व्यक्त केले. सजग नागरिक मंचाच्या वतीने पुण्याचा विकास आराखडा व विकास नियमावली शहराच्या हिताची आहे का? या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. २००७ ते २०२७ दरम्यान पुणे महानगरपालिकेने केलेल्या विकास आराखड्याचे विश्लेषण या चर्चेदरम्यान करण्यात आले. नगररचना तज्ज्ञ रामचंद्र गोहाड, अनिता बेनिंजर गोखले, परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ, अभियंत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रताप रावळ, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, जुगल राठी व्यासपीठावर उपस्थित होते. विकास नियंत्रण नियमात जमिनीचा वापर प्रस्तावित केला जातो. विकास नियंत्रण नियम हा विकास आराखड्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे विकास नियंत्रण सुटसुटीत करणे आवश्यक आहे. पुण्याचा विकास आराखडा तयार करताना लोकसंख्येची घनता कमी करणे, पार्किंंगचे नियोजन करणे आवश्यक असताना, चार एफएसआय देऊन १०० मीटरपेक्षा उंच इमारती कोणासाठी बांधायच्या आहेत, असा सवाल त्यांनी केला. - रामचंद्र गोहाड विकास आराखडा मंजूर करताना नागरिकांच्या हरकती, सूचना विचारात घेण्यात आल्या नाहीत. आरक्षणाची पूर्तता केल्याविषयी नोंद नाही. पूर्वी डीसी रुल्स म्हणजे घनता नियंत्रण नियम (डेन्सिटी कंट्रोल) असा अर्थ अभिप्रेत होता. तो बदलून विकास नियंत्रण नियम (डेव्हलपमेंट कंट्रोल) कधी झाला, हे कळलेच नाही. विकास आराखड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा फायदा होणार नसून, चार एफएसआय कोणासाठी आणि कशासाठी हवा आहे? - अनिता गोखले