शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मातीचे धरण का व कसे फुटले ? त्याचा कादंबरीत लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

पुणे : 'पानशेत प्रलयाविषयी माहितीपूर्ण पुस्तके आणि अहवाल आहेत; पण ललित अंगाने फारसे लेखन नाही. मातीचे धरण का व ...

पुणे : 'पानशेत प्रलयाविषयी माहितीपूर्ण पुस्तके आणि अहवाल आहेत; पण ललित अंगाने फारसे लेखन नाही. मातीचे धरण का व कसे फुटले? त्यात भ्रष्टाचार वा राजकारण होते का? तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ही युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळली? पूरग्रस्तांचे पुनर्वसन कसे झाले? आपत्तीमध्ये माणूस व समाज कसा वागतो? हे सारे कादंबरीत चित्रित केले आहे. बदलते शहर, बदलती मूल्ये, बदलती कुटुंबे यांचाही पट मांडण्यात आला आहे,’ असे लेखिका आश्लेषा महाजन यांनी सांगितले.

पानशेत धरण फुटण्याच्या घटनेला सोमवारी (दि. १२) साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आश्लेषा महाजन यांच्या '१२ जुलै, १९६१' या पानशेत धरणफुटीचा मागोवा घेणा-या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते सोमवारी झाले. या पुस्तकाची निर्मिती इंकिंग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेने केली आहे.

कुवळेकर म्हणाले, 'साठ वर्षांतला बदलता काळ विविध पात्रांच्या माध्यमातून रोचक पद्धतीने वाचकांसमोर साकारतो. विश्वासार्ह ग्रंथांचा आणि संदर्भांचा अभ्यास करून त्याचा ललित आविष्कार कादंबरीत केलेला आहे.

सहकारनगर प्रभागात शेकडो पूरग्रस्तांचे पुनर्वसन झाले असले तरी अनेक पूरग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. प्रशासकीय पातळीवर पानशेत पूरग्रस्त वास्तू हक्कासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत,' असे नगरसेविका अश्विनी कदम यांनी सांगितले.

' मुखपृष्ठकार अजय प्रभाकर आणि रेखाचित्रकार डॉ. मयूरी वाघ यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाशक आनंद लिमये यांनी प्रास्ताविक केले. राजेश मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले. आदित्य महाजन याने आभार मानले.

-----------